खरीप हंगामात सूक्ष्म नियोजनावर लक्ष द्या!
By Admin | Updated: May 26, 2015 02:37 IST2015-05-26T02:37:47+5:302015-05-26T02:37:47+5:30
खरीप हंगामपूर्व शेतकरी मेळाव्यात कृषी शास्त्रज्ञांचा सल्ला.

खरीप हंगामात सूक्ष्म नियोजनावर लक्ष द्या!
अकोला : पाऊस उशिरा किंवा लवकर येईल पण, त्या अगोदर शेतकर्यांनी येत्या खरीप हंगामात सूक्ष्म नियोजनावर लक्ष देण्याची गरज असून, बीजप्रकिया, माती परीक्षण करू न घ्यावे, योग्य बियाणे निवडावे, पीक संरक्षणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन करण्याची नितांत गरज असल्याचा सल्ला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी शास्त्रज्ञांनी सोमवारी पश्चिम विदर्भातील शेतकर्यांना दिला. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातर्फे सोमवार, २५ मे रोजी कृषी महाविद्यालयाच्या डॉ.के.आर. ठाकरे सभागृहात विभागीय खरीप हंगामपूर्व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ह्य खरीप हंगामात घ्यावयाची काळजीह्ण या विषयावर शेतकर्यांना मार्गदर्शन केले व सल्ला दिला. कृषी विद्या पीठाचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या मेळाव्याला कृषी विद्या पीठाचे संशोधन संचालक डॉ. डी.एम. मानकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ. पी.जी. इंगोले, अधिष्ठाता कृषी डॉ.व्ही.एम. भाले, प्रगतिशील शेतकरी मोहन जायले, नामदेवराव अढाऊ यांची प्रमुख उपस्थिती हो ती. याप्रसंगी डॉ. दाणी यांनी शेतकर्यांनी या भागात कापसाची धूळपेरणी करणे उपयुक्त असल्याचे सांगितले. सोयाबीन बीजप्रक्रिया करणे आवश्यक असल्याचे सांगताना गादीवाफा, सरी वरंबा यासह इतर सुधारित कृषी तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर दिला.