शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

दुष्काळी मदतीचे प्रस्ताव सादर करण्याकडे तहसीलदारांचा कानाडोळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 12:35 IST

- संतोष येलकर अकोला : जिल्ह्यातील दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या पाच तालुक्यातील पिकांचे नुकसान आणि दुष्काळग्रस्त शेतकºयांसाठी आवश्यक मदतनिधीचे ...

- संतोष येलकर

अकोला : जिल्ह्यातील दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या पाच तालुक्यातील पिकांचे नुकसान आणि दुष्काळग्रस्त शेतकºयांसाठी आवश्यक मदतनिधीचे प्रस्ताव १९ नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी १६ नोव्हेंबर रोजी तहसीलदारांना दिला होता; मात्र मुदत संपून नऊ दिवसांचा कालावधी उलटला असला तरी, २७ नोव्हेंबरपर्यंत एकाही तालुक्यातून मदतनिधी मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाला नाही. त्यामुळे दुष्काळी मदतनिधीचे प्रस्ताव सादर करण्यात संबंधित पाचही तहसीलदारांकडून कानाडोळा करण्यात येत असल्याचे वास्तव समोर येत आहे.पावसातील खंड, जमिनीतील आर्द्रतेचे कमी प्रमाण आणि त्यामुळे खरीप पिकांच्या उत्पादनात घट झाल्याने, जिल्ह्यातील अकोला, बार्शीटाकळी, तेल्हारा, बाळापूर व मूर्तिजापूर इत्यादी पाच तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. दुष्काळी परिस्थितीत खरीप पिकांचे नुकसान झाल्याने, शेतकरी संकटात सापडला आहे. त्यानुषंगाने दुष्काळग्रस्त पाच तालुक्यांतील शेतकºयांसाठी मदतनिधी मागणीचे प्रस्ताव १९ नोव्हेंबरपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी गत १६ नोव्हेंबर रोजी दुष्काळग्रस्त पाचही तालुक्यांच्या तहसीलदारांना दिला होता. त्यानुसार प्रस्ताव सादर करण्यासाठी देण्यात आलेली मुदत संपून नऊ दिवसांचा कालावधी उलटून गेला; मात्र २७ नोव्हेंबरपर्यंत एकाही तालुक्यातून दुष्काळी मदतनिधी मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाला नाही. त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकºयांसाठी मदतनिधी मागणीचे प्रस्ताव सादर करण्याच्या कामात संबंधित तहसीलदारांकडून कानाडोळा करण्यात करण्यात येत असल्याची बाब समोर येत आहे.दुष्काळी मदतीच्या प्रतीक्षेत असे आहेत शेतकरी!तालुका शेतकरीअकोला ६५७३०बार्शीटाकळी ४०६४६तेल्हारा २७४९०बाळापूर २२२२८मूूर्तिजापूर ३८६८०.......................................एकूण १९४७७४शासनाकडे केव्हा सादर होणार प्रस्ताव !जिल्ह्यातील पाच तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या मदतीसाठी आवश्यक असलेल्या मदतनिधीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे सादर करण्यात येणार आहे. त्यासाठी तालुक्यातील महसूल मंडळनिहाय पीक नुकसानाचे क्षेत्र आणि दुष्काळग्रस्त शेतकºयांसाठी आवश्यक असलेला मदतनिधी यासंबंधीचे प्रस्ताव सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकाºयांना दिला; मात्र दुष्काळग्रस्त पाचपैकी एकाही तालुक्यातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला नाही. त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकºयांसाठी मदतनिधीचा प्रस्ताव शासनाकडे केव्हा सादर होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पीक नुकसानाचे असे आहे वास्तव!जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त पाच तालुक्यांत ३ लाख १७ हजार २८४ हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये अकोला तालुक्यात ८६ हजार ६२३ हेक्टर, बार्शीटाकळी तालुक्यात ५१ हजार ५६२ हेक्टर, तेल्हारा तालुक्यात ५३ हजार ३६ हेक्टर, बाळापूर तालुक्यात ६० हेक्टर ५९१ हेक्टर व मूर्तिजापूर तालुक्यात ६५ हजार ४७२ हेक्टरवरील पीक नुकसानाचा समावेश आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाdroughtदुष्काळ