शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

दुष्काळी मदतीचे प्रस्ताव सादर करण्याकडे तहसीलदारांचा कानाडोळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 12:35 IST

- संतोष येलकर अकोला : जिल्ह्यातील दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या पाच तालुक्यातील पिकांचे नुकसान आणि दुष्काळग्रस्त शेतकºयांसाठी आवश्यक मदतनिधीचे ...

- संतोष येलकर

अकोला : जिल्ह्यातील दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या पाच तालुक्यातील पिकांचे नुकसान आणि दुष्काळग्रस्त शेतकºयांसाठी आवश्यक मदतनिधीचे प्रस्ताव १९ नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी १६ नोव्हेंबर रोजी तहसीलदारांना दिला होता; मात्र मुदत संपून नऊ दिवसांचा कालावधी उलटला असला तरी, २७ नोव्हेंबरपर्यंत एकाही तालुक्यातून मदतनिधी मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाला नाही. त्यामुळे दुष्काळी मदतनिधीचे प्रस्ताव सादर करण्यात संबंधित पाचही तहसीलदारांकडून कानाडोळा करण्यात येत असल्याचे वास्तव समोर येत आहे.पावसातील खंड, जमिनीतील आर्द्रतेचे कमी प्रमाण आणि त्यामुळे खरीप पिकांच्या उत्पादनात घट झाल्याने, जिल्ह्यातील अकोला, बार्शीटाकळी, तेल्हारा, बाळापूर व मूर्तिजापूर इत्यादी पाच तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. दुष्काळी परिस्थितीत खरीप पिकांचे नुकसान झाल्याने, शेतकरी संकटात सापडला आहे. त्यानुषंगाने दुष्काळग्रस्त पाच तालुक्यांतील शेतकºयांसाठी मदतनिधी मागणीचे प्रस्ताव १९ नोव्हेंबरपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी गत १६ नोव्हेंबर रोजी दुष्काळग्रस्त पाचही तालुक्यांच्या तहसीलदारांना दिला होता. त्यानुसार प्रस्ताव सादर करण्यासाठी देण्यात आलेली मुदत संपून नऊ दिवसांचा कालावधी उलटून गेला; मात्र २७ नोव्हेंबरपर्यंत एकाही तालुक्यातून दुष्काळी मदतनिधी मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाला नाही. त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकºयांसाठी मदतनिधी मागणीचे प्रस्ताव सादर करण्याच्या कामात संबंधित तहसीलदारांकडून कानाडोळा करण्यात करण्यात येत असल्याची बाब समोर येत आहे.दुष्काळी मदतीच्या प्रतीक्षेत असे आहेत शेतकरी!तालुका शेतकरीअकोला ६५७३०बार्शीटाकळी ४०६४६तेल्हारा २७४९०बाळापूर २२२२८मूूर्तिजापूर ३८६८०.......................................एकूण १९४७७४शासनाकडे केव्हा सादर होणार प्रस्ताव !जिल्ह्यातील पाच तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या मदतीसाठी आवश्यक असलेल्या मदतनिधीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे सादर करण्यात येणार आहे. त्यासाठी तालुक्यातील महसूल मंडळनिहाय पीक नुकसानाचे क्षेत्र आणि दुष्काळग्रस्त शेतकºयांसाठी आवश्यक असलेला मदतनिधी यासंबंधीचे प्रस्ताव सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकाºयांना दिला; मात्र दुष्काळग्रस्त पाचपैकी एकाही तालुक्यातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला नाही. त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकºयांसाठी मदतनिधीचा प्रस्ताव शासनाकडे केव्हा सादर होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पीक नुकसानाचे असे आहे वास्तव!जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त पाच तालुक्यांत ३ लाख १७ हजार २८४ हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये अकोला तालुक्यात ८६ हजार ६२३ हेक्टर, बार्शीटाकळी तालुक्यात ५१ हजार ५६२ हेक्टर, तेल्हारा तालुक्यात ५३ हजार ३६ हेक्टर, बाळापूर तालुक्यात ६० हेक्टर ५९१ हेक्टर व मूर्तिजापूर तालुक्यात ६५ हजार ४७२ हेक्टरवरील पीक नुकसानाचा समावेश आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाdroughtदुष्काळ