शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

वर्‍हाडातील रसाचा गोडवा गुजरातेत भावतोय!

By admin | Updated: May 12, 2014 18:30 IST

रसवंतीतून उन्हाळ्यात होते एक ते दोन लाखांपर्यंतचा नफा

अकोला : वर्‍हाडातील अनेक शेतकरी व नागरिक गुजरातमध्ये उन्हाळ्यात रसवंती सुरू करीत असून, वर्‍हाडातील रसवंतीचा रस गुजरातमधील नागरिकांना चांगलाच भावत आहे. या कुटुंबांना दरवर्षी उन्हाळ्यातील तीन ते चार महिन्यात एक ते दोन लाख रुपयांचा नफा होत असल्यामुळे दरवर्षी गुजरातमध्ये जाऊन रसवंती सुरू करणार्‍या नागरिकांच्या संख्येत वाढच होत आहे. उन्हाळ्यात शेताची तसेच अन्य कामे नसल्यामुळे वर्‍हाडातील अकोला, वाशिम, बुलडाण्यातील हजारो कुटुंबे गुजरात, मुंबई, पुणे येथे स्थलांतर करतात. उन्हाळा संपल्यानंतर शेतीची कामे सुरू झाल्यावर ही कुटुंब परतात. गत काही वर्षांपासून अकोला जिल्ह्यातील शिर्ला, पातूर, भंडारजसह अन्य गावांतील नागरिक गुजरातमध्ये जाऊन रसवंतीचा व्यवसाय करीत आहेत. यातून त्यांना लाखो रुपये नफा मिळत असल्यामुळे दरवर्षी गुजरातमध्ये जाऊन रसवंती सुरू करण्याकरिता जाणार्‍या कुटुंबांची संख्या वाढतच आहे. ही कुटुंब छोट्या-मोठ्या शहरांमध्ये जाऊन रसवंती लावून रसाची विक्री करीत आहेत. वर्‍हाडातून दरवर्षी पती व पत्नी गुजरातमध्ये जातात. लाकडाच्या घाण्याद्वारे रस काढण्याची रसवंती टाकतात. पत्नी घाण्यात ऊस टाकून रस काढते तर पती घाणा ओढतो. गुजरातमधील नागरिक यंत्राने काढलेला रस पीत नाहीत. कारण त्यामध्ये ऑईल पडत असल्याची त्यांची समजूत आहे. तसेच बैलाच्या घाणीद्वारे काढलेला रस ते पीत नाहीत. त्यामुळे त्यांना माणसांनी घाणीचा दांडा ओढून काढलेला रस भावतो. चार ते पाच वर्षांपूर्वी शिर्ला येथील काही नागरिकांनी गुजरातमध्ये रसवंती सुरू केली होती. त्यांना मिळत असलेला प्रतिसाद पाहून त्यांनी गावातील अन्य नागरिकांना रसवंती सुरू करण्याबाबत सांगितले. त्यांनाही चांगले उत्पादन मिळाल्यामुळे ही माहिती आजूबाजूच्या गावातील नागरिकांना मिळाली. यावर्षी जवळपास दोन ते अडीच हजार कुटुंबे गुजरातमध्ये रसवंती सुरू करण्यासाठी गेली आहेत. ही कुटुंबे दरवर्षी उन्हाळ्यात एक ते दोन लाख रुपयांपर्यंत उत्पन्न घेतात. त्यानंतर शेतीची कामे सुरू झाल्यावर परत येतात. दरवर्षी गुजरातमध्ये जाणार्‍या नागरिकांच्या संख्येत वाढच होत आहे. सध्या पातूर तालुक्यातील गावांमधील कुटुंब गुजरातमध्ये गेली आहेत.