शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

वर्‍हाडातील रसाचा गोडवा गुजरातेत भावतोय!

By admin | Updated: May 12, 2014 18:30 IST

रसवंतीतून उन्हाळ्यात होते एक ते दोन लाखांपर्यंतचा नफा

अकोला : वर्‍हाडातील अनेक शेतकरी व नागरिक गुजरातमध्ये उन्हाळ्यात रसवंती सुरू करीत असून, वर्‍हाडातील रसवंतीचा रस गुजरातमधील नागरिकांना चांगलाच भावत आहे. या कुटुंबांना दरवर्षी उन्हाळ्यातील तीन ते चार महिन्यात एक ते दोन लाख रुपयांचा नफा होत असल्यामुळे दरवर्षी गुजरातमध्ये जाऊन रसवंती सुरू करणार्‍या नागरिकांच्या संख्येत वाढच होत आहे. उन्हाळ्यात शेताची तसेच अन्य कामे नसल्यामुळे वर्‍हाडातील अकोला, वाशिम, बुलडाण्यातील हजारो कुटुंबे गुजरात, मुंबई, पुणे येथे स्थलांतर करतात. उन्हाळा संपल्यानंतर शेतीची कामे सुरू झाल्यावर ही कुटुंब परतात. गत काही वर्षांपासून अकोला जिल्ह्यातील शिर्ला, पातूर, भंडारजसह अन्य गावांतील नागरिक गुजरातमध्ये जाऊन रसवंतीचा व्यवसाय करीत आहेत. यातून त्यांना लाखो रुपये नफा मिळत असल्यामुळे दरवर्षी गुजरातमध्ये जाऊन रसवंती सुरू करण्याकरिता जाणार्‍या कुटुंबांची संख्या वाढतच आहे. ही कुटुंब छोट्या-मोठ्या शहरांमध्ये जाऊन रसवंती लावून रसाची विक्री करीत आहेत. वर्‍हाडातून दरवर्षी पती व पत्नी गुजरातमध्ये जातात. लाकडाच्या घाण्याद्वारे रस काढण्याची रसवंती टाकतात. पत्नी घाण्यात ऊस टाकून रस काढते तर पती घाणा ओढतो. गुजरातमधील नागरिक यंत्राने काढलेला रस पीत नाहीत. कारण त्यामध्ये ऑईल पडत असल्याची त्यांची समजूत आहे. तसेच बैलाच्या घाणीद्वारे काढलेला रस ते पीत नाहीत. त्यामुळे त्यांना माणसांनी घाणीचा दांडा ओढून काढलेला रस भावतो. चार ते पाच वर्षांपूर्वी शिर्ला येथील काही नागरिकांनी गुजरातमध्ये रसवंती सुरू केली होती. त्यांना मिळत असलेला प्रतिसाद पाहून त्यांनी गावातील अन्य नागरिकांना रसवंती सुरू करण्याबाबत सांगितले. त्यांनाही चांगले उत्पादन मिळाल्यामुळे ही माहिती आजूबाजूच्या गावातील नागरिकांना मिळाली. यावर्षी जवळपास दोन ते अडीच हजार कुटुंबे गुजरातमध्ये रसवंती सुरू करण्यासाठी गेली आहेत. ही कुटुंबे दरवर्षी उन्हाळ्यात एक ते दोन लाख रुपयांपर्यंत उत्पन्न घेतात. त्यानंतर शेतीची कामे सुरू झाल्यावर परत येतात. दरवर्षी गुजरातमध्ये जाणार्‍या नागरिकांच्या संख्येत वाढच होत आहे. सध्या पातूर तालुक्यातील गावांमधील कुटुंब गुजरातमध्ये गेली आहेत.