शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

‘स्वाभिमानी’ची विदर्भ मोहीम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 14:22 IST

स्वाभिमानीचे संस्थापक अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी विदर्भ कार्यकारिणीची बैठक घेऊन गांधी जयंतीपासून राज्यव्यापी आंदोलनाची तयारी सुरू केली आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक आंदोलन करून आपली पाळेमुळे घट्ट केली आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गत लोकसभा निवडणूक लढविली. राजकीय समीकरणे बदलविणारी ठरणार असल्याने स्वाभिमानीच्या विदर्भ मोहिमेकडे अनेकांचे लक्ष आहे.

- राजेश शेगोकार 

अकोला : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अलीकडच्या काळात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक आंदोलन करून आपली पाळेमुळे घट्ट केली आहेत. पश्चिम महाराष्ट्रतील पक्ष अशी ओळख पुसून काढण्यासाठी या आंदोलनाचा मोठा ुफायदा झाला असून, आता लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. राज्यातील सहा लोकसभा मतदारसंघांवर त्यांनी लक्ष केंद्रित केले असून, त्यामध्ये विदर्भातील वर्धा व बुलडाणा या दोन मतदारसंघांचा समावेश आहे. त्याच अनुषंगाने परवा वर्धेत स्वाभिमानीचे संस्थापक अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी विदर्भ कार्यकारिणीची बैठक घेऊन गांधी जयंतीपासून राज्यव्यापी आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. संघटना म्हणून विदर्भात कार्यविस्तार करतानाच लोकसभा निवडणुकीच्या मोर्चेबांधणीच्याच दृष्टीने ही ‘विदर्भ मोहीम’ असल्याचे स्पष्ट संकेत आहेत.भाजपा-शिवसेनेसोबत महायुतीमध्ये सहभागी होत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गत लोकसभा निवडणूक लढविली. महायुतीची सत्ता येताच स्वाभिमानीला सदाभाऊ खोत यांच्या रूपाने विधान परिषदेची एक जागा, मंत्रिमंडळात स्थान तसेच रविकांत तुपकर यांना महामंडळ देऊन सत्तेत वाटाही मिळाला; मात्र शेतकºयांच्या प्रश्नांवर सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सरकारच्या विरोधात थेट रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले. दरम्यानच्या काळात कृषी राज्यमंत्री झालेले सदाभाऊ खोत व खासदार शेट्टी यांचे संबंध ताणल्या गेल्यामुळे सदाभाऊंची पक्षातून हकालपट्टी केली. तुपकरांनी महामंडळाचा राजीनामा दिला व स्वाभिमानी शेतकरी संघटना महायुतीमधून बाहेर पडली. सत्तेतून बाहेर पडताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाची तीव्रता वाढविली. दूध आंदोलनाची यशस्वी परिणती हा स्वाभिमानीचा आणखी एक विजय होता. अशा अनेक आंदोलनामधून स्वाभिमानी शेतकरी संघटना राज्यभर पोहोचली, त्यामुळे संघटनेच्या कार्यकर्त्यांचा विश्वास दुणावला असल्याने आता लोकसभेची तयारी सुरू केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना सध्या सहा जागांची तयारी करीत असली तरी हातकणंगले, माढा, वर्धा व बुलडाणा या चार मतदारसंघांबाबत संघटना प्रचंड आशावादी आहे. बुलडाण्यात स्वाभिमानीच्यावतीने प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांना तर वर्धेत माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांना उमेदवारी दिली जाणार आहे. त्याच अनुषंगाने परवा वर्धेत राज्यव्यापी आंदोलनाचा बिगुल फुंकल्या गेला आहे. गांधी जयंतीपासून विदर्भात कापूस व सोयाबीन परिषदांचे आयोजन केले जाणार असून, त्याचा समारोप अमरावती जिल्ह्यात होणार आहे. त्यानंतर या आंदोलनाची व्याप्ती विदर्भाबाहेर नेण्याची रणनीती स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आहे. काँग्रेस आघाडीसोबत किंंवा सेना स्वतंत्र लढत असेल तर त्यांच्यासोबत निवडणूक लढविण्याचा पर्याय खुला ठेवत स्वबळावरच मोर्चेबांधणी करण्यासाठी या विदर्भ मोहिमेचा जास्तीत जास्त फायदा करून घेण्याचाच स्वाभिमानीचा प्रयत्न राहणार आहे. विदर्भाचा विचार केला तर वर्धा अन् बुलडाणा या लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानीची लढत ही राजकीय समीकरणे बदलविणारी ठरणार असल्याने स्वाभिमानीच्या विदर्भ मोहिमेकडे अनेकांचे लक्ष आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाbuldhanaबुलडाणाSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाRaju Shettyराजू शेट्टीVidarbhaविदर्भ