शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

‘स्वाभिमानी’ची विदर्भ मोहीम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 14:22 IST

स्वाभिमानीचे संस्थापक अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी विदर्भ कार्यकारिणीची बैठक घेऊन गांधी जयंतीपासून राज्यव्यापी आंदोलनाची तयारी सुरू केली आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक आंदोलन करून आपली पाळेमुळे घट्ट केली आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गत लोकसभा निवडणूक लढविली. राजकीय समीकरणे बदलविणारी ठरणार असल्याने स्वाभिमानीच्या विदर्भ मोहिमेकडे अनेकांचे लक्ष आहे.

- राजेश शेगोकार 

अकोला : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अलीकडच्या काळात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक आंदोलन करून आपली पाळेमुळे घट्ट केली आहेत. पश्चिम महाराष्ट्रतील पक्ष अशी ओळख पुसून काढण्यासाठी या आंदोलनाचा मोठा ुफायदा झाला असून, आता लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. राज्यातील सहा लोकसभा मतदारसंघांवर त्यांनी लक्ष केंद्रित केले असून, त्यामध्ये विदर्भातील वर्धा व बुलडाणा या दोन मतदारसंघांचा समावेश आहे. त्याच अनुषंगाने परवा वर्धेत स्वाभिमानीचे संस्थापक अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी विदर्भ कार्यकारिणीची बैठक घेऊन गांधी जयंतीपासून राज्यव्यापी आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. संघटना म्हणून विदर्भात कार्यविस्तार करतानाच लोकसभा निवडणुकीच्या मोर्चेबांधणीच्याच दृष्टीने ही ‘विदर्भ मोहीम’ असल्याचे स्पष्ट संकेत आहेत.भाजपा-शिवसेनेसोबत महायुतीमध्ये सहभागी होत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गत लोकसभा निवडणूक लढविली. महायुतीची सत्ता येताच स्वाभिमानीला सदाभाऊ खोत यांच्या रूपाने विधान परिषदेची एक जागा, मंत्रिमंडळात स्थान तसेच रविकांत तुपकर यांना महामंडळ देऊन सत्तेत वाटाही मिळाला; मात्र शेतकºयांच्या प्रश्नांवर सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सरकारच्या विरोधात थेट रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले. दरम्यानच्या काळात कृषी राज्यमंत्री झालेले सदाभाऊ खोत व खासदार शेट्टी यांचे संबंध ताणल्या गेल्यामुळे सदाभाऊंची पक्षातून हकालपट्टी केली. तुपकरांनी महामंडळाचा राजीनामा दिला व स्वाभिमानी शेतकरी संघटना महायुतीमधून बाहेर पडली. सत्तेतून बाहेर पडताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाची तीव्रता वाढविली. दूध आंदोलनाची यशस्वी परिणती हा स्वाभिमानीचा आणखी एक विजय होता. अशा अनेक आंदोलनामधून स्वाभिमानी शेतकरी संघटना राज्यभर पोहोचली, त्यामुळे संघटनेच्या कार्यकर्त्यांचा विश्वास दुणावला असल्याने आता लोकसभेची तयारी सुरू केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना सध्या सहा जागांची तयारी करीत असली तरी हातकणंगले, माढा, वर्धा व बुलडाणा या चार मतदारसंघांबाबत संघटना प्रचंड आशावादी आहे. बुलडाण्यात स्वाभिमानीच्यावतीने प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांना तर वर्धेत माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांना उमेदवारी दिली जाणार आहे. त्याच अनुषंगाने परवा वर्धेत राज्यव्यापी आंदोलनाचा बिगुल फुंकल्या गेला आहे. गांधी जयंतीपासून विदर्भात कापूस व सोयाबीन परिषदांचे आयोजन केले जाणार असून, त्याचा समारोप अमरावती जिल्ह्यात होणार आहे. त्यानंतर या आंदोलनाची व्याप्ती विदर्भाबाहेर नेण्याची रणनीती स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आहे. काँग्रेस आघाडीसोबत किंंवा सेना स्वतंत्र लढत असेल तर त्यांच्यासोबत निवडणूक लढविण्याचा पर्याय खुला ठेवत स्वबळावरच मोर्चेबांधणी करण्यासाठी या विदर्भ मोहिमेचा जास्तीत जास्त फायदा करून घेण्याचाच स्वाभिमानीचा प्रयत्न राहणार आहे. विदर्भाचा विचार केला तर वर्धा अन् बुलडाणा या लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानीची लढत ही राजकीय समीकरणे बदलविणारी ठरणार असल्याने स्वाभिमानीच्या विदर्भ मोहिमेकडे अनेकांचे लक्ष आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाbuldhanaबुलडाणाSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाRaju Shettyराजू शेट्टीVidarbhaविदर्भ