शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

उन्हाचा कडाका वाढला; कमाल तापमान पोहोचले ४० अंशावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 13:45 IST

अकोला: मागील २४ तासांत अकोला जिल्ह्याचे कमाल तापमान ४०.२ अशांवर पोहोचले आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सूर्य आग ओकू लागला असून, सोमवारच्या उन्हाने अकोलेकरांना याची जाणीव करू न दिली.

अकोला: मागील २४ तासांत अकोला जिल्ह्याचे कमाल तापमान ४०.२ अशांवर पोहोचले आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सूर्य आग ओकू लागला असून, सोमवारच्या उन्हाने अकोलेकरांना याची जाणीव करू न दिली. उन्हाचा कडाका बघता टोप्या, शेले, गॉगल्सची मागणी वाढली.मार्च महिना संपताना कमाल तापमानात आणखी वाढ झाली आहे. मागील २४ तासांत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने ४०.२ अंश तापमानाची नोंद केली. तर अकोला शहरात हेच तापमान ३९.६ अंशावर होते. सोमवारी विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली. तर काही भागात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली.मागील दोन दिवसांत उन्हाची तीव्रता अधिकच वाढली आहे. त्यामुळे बाहेर पडल्यांनतर अकोलेकरांना सोमवारी चांगलाच उन्हाचा सामना करावा लागला. त्यामुळे कामगारांसह अनेकांना काम करण्याचा उत्साह टिकवून ठेवणे कठीण होऊ लागले आहे. दुपारच्या वेळात बाहेर पडणाऱ्यांची संख्या सोमवारी काही प्रमाणात रोडावल्याची दिसली. सायंकाळी ६ वाजेपर्यंत ऊन होते व पुढे यापेक्षा वाढणार असल्याने नागरिकांनी यापासून बचाव करण्यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे.उकाड्याच्या त्रासातून सुटका करण्यासाठी नागरिक थंड पेये, आईस्क्रीम, कलिंगड आदींचा आधार घेत आहेत. दिवसभर उन्हाच्या झळा असह्य होत असतानाच रात्रीही आर्द्रता वाढलेली असल्याने घामाच्या धारा वाहत असतात. त्यातच उष्णतेचे अनेक विकार वाढतात. नागरिकांना ‘नको हा उन्हाळा’ म्हणायची वेळ येते. त्यातच दिवसेंदिवस पाण्याची टंचाईही भासू लागली आहे. शहरांमध्ये आता उन्हाळी सुटीसाठी तसेच लग्नसराईसाठी पाहुणे मंडळी येणार असल्याने असल्याने खासगी टँकरद्वारे पाणी विकत घेण्याची मागणी वाढत आहे. दुर्गम तसेच ग्रामीण भागातील ग्रामस्थांची तर पाण्यासाठी पायपीट सुरू आहे. आताच उकाडा एवढा वाढू लागला असल्याने आणखी तीन महिने हा उकाडा कसा सहन करायचा, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाTemperatureतापमान