पातूर तालुक्यात वर्षभरात २८ शेतक-यांच्या आत्महत्या
By Admin | Updated: December 26, 2014 01:05 IST2014-12-26T01:05:16+5:302014-12-26T01:05:16+5:30
फक्त ११ शेतकरी आत्महत्या मदतीस पात्र : सन २00२ पासून १८३ शेतकरी आत्महत्येच्या घटना.
_ns.jpg)
पातूर तालुक्यात वर्षभरात २८ शेतक-यांच्या आत्महत्या
संजय गोतरकर / पातूर (अकोला )
पातूर तालुक्यातील शेतकर्यांवर निसर्गाच्या अवकृपेने सतत होणारी नापिकी, शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव न मिळणे, सावकार व बँकांची कर्जफेड न होणे यामुळे तालुक्यात दरवर्षी शेतकरी आत्महत्या होत आहेत.
यावर्षी आतापर्यंत तालुक्यातील २८ शेतकर्यांनी आत्महत्या केल्या. त्यापैकी ११ शेतकरी आत्महत्या शासनाच्या मदतीच्या निकषावर पात्र ठरल्या आहेत. तब्बल १७ आत्महत्या शासनाच्या मदतीच्या निकषांवर अपात्र ठरल्याने, मृत शेतकर्यांच्या कुटुंबीयांना शासकीय मदत मिळालेली नाही.
निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी अतवृष्टी, तर कधी अत्यल्प पावसामुळे शेतकर्यांचे नियोजन कोलमडले आहे. परिणामी, कोरडवाहू शेती ही आर्थिक जुगार ठरत आहे. तालुक्यात कोरडवाहू शेतकरी प्रामुख्याने सोयाबीनचे पीक घेतो. यावर्षी अल्प पावसामुळे पिकाचा उतारा फारच अल्प आला आहे. एकरी अर्धा ते दीड क्विंटल असे उत्पादन झाल्याने आता करावे तरी काय, असा त्यांच्यापुढे प्रश्न आहे.
पातूर तालुक्यात सन २00२ ते २00१३ दरम्यान १५५ शेतकर्यांनी आत्महत्या केल्या. यामध्ये ६८ शेतकर्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळाली, तर ८७ प्रकरणे अपात्र ठरली. यावर्षी आतापर्यंत तालुक्यात २८ शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यामध्ये २१ पुरुष व सात महिला शेतकर्यांचा समावेश आहे. यापैकी ११ शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे शासनाच्या मदतीस पात्र, तर १७ प्रकरणे अपात्र ठरली आहेत.