शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

पटसंख्या घसरणार : शिक्षक अतिरिक्त ठरण्याचा धोका वाढला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 10:16 IST

शाळांमधील पटसंख्या घसरणार असल्याची भीती असल्याने, शाळांमधील शिक्षकांना अतिरिक्त ठरण्याचा धोका वाढला आहे.

- नितीन गव्हाळे  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत असल्यामुळे जिल्ह्यातील मजूर मोठ्या प्रमाणात स्थलांतरित होत आहेत. जिल्ह्यातील एमआयडीसी, उद्योगधंद्यांच्या ठिकाणी स्थायिक झालेले मजूर कुटुंबासह त्यांच्या गावी परतत आहेत. त्याचा परिणाम जिल्हा परिषद, नगर परिषदेच्या शाळांसह खासगी शाळांवर होणार आहे. शाळांमधील पटसंख्या घसरणार असल्याची भीती असल्याने, शाळांमधील शिक्षकांना अतिरिक्त ठरण्याचा धोका वाढला आहे.कोरोना संकटामुळे अनेक रोजगार, उद्योगधंदे बंद पडले आहेत. एमआयडीसीतील कारखाने बंद, डाळ गिरणी उद्योग बंद पडला आहे. यासोबतच इतर किरकोळ व्यवसायसुद्धा बंद पडले आहेत. हाताला काम नसल्यामुळे हजारो मजूर कुटुंबासह आपल्या गावी परतत आहेत. हजारो मजूर उद्योगधंद्यानिमित्त अकोल्यात आले होते. कामधंद्यानिमित्त मजूर वर्ग अकोल्यात स्थायिक झाला होता. मुलांना शाळेत घातले होते; परंतु कोरोनामुळे सर्वांच्या हातचा रोजगार हिरावल्या गेला. बेरोजगार झालेल्या मजुरांनी मुलाबाळांसह घरचा रस्ता पकडला आहे. त्यामुळे साहजिकच शाळांमधील पटसंख्या घसरणार आहे. विद्यार्थी मोठ्या प्रमाणात स्थलांतरित होत असल्याने, त्यांच्या शिक्षणाबरोबरच अतिरिक्त होणाऱ्या शिक्षकांच्या समायोजनाचा मोठा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. रोजगाराच्या निमित्ताने अकोल्यात स्थायिक झालेले मजूर, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आदी राज्यांमध्ये परतले आहेत. या मजुरांची मुले प्रामुख्याने जिल्हा परिषद, नगर परिषद, खासगी अनुदानित शाळांमध्ये शिक्षण घेत होती. मजुरांबरोबर त्यांची मुलेही परत गेली आहेत. त्यामुळे मराठी, हिंदी माध्यमांच्या शाळांमधील विद्यार्थी संख्याही कमी होण्याची शक्यता आहे.मजूर, त्यांची मुले परत येण्याविषयी साशंकता!विद्यार्थी संख्येच्या आधारावर शाळांमध्ये शिक्षकांची नियुक्ती केली जाते. विद्यार्थीच नाहीत तर शिकविणार कोणाला? त्यामुळे शाळांमधील शिक्षक अतिरिक्त होण्याचा धोका वाढला आहे. प्रामुख्याने अकोला जिल्ह्यात रोजगारासाठी आलेले मजूर, कामगारांची मुले हिंदी, मराठी व सेमी इंग्रजी, इंग्रजी माध्यमांच्या जिल्हा परिषद, नगर परिषद शाळांसोबतच अनुदानित खासगी शाळांमध्ये शिक्षण घेतात. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे हजारो मजूर त्यांच्या गावी परत जात आहेत. त्यातील किती मजूर व त्यांची मुले परत येतील. याविषयी साशंकता आहे.जिल्हा परिषद शाळांसोबतच खासगी अनुदानित शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात मजूर, कामगारांची मुले शिक्षण घेतात; परंतु कोरोनामुळे मजूर, कामगार स्थलांतरित होत आहेत. त्यामुळे अनेक शाळांमधील पटसंख्येवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत.- प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारी, प्राथमिक

 

टॅग्स :AkolaअकोलाSchoolशाळाTeacherशिक्षकStudentविद्यार्थी