शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

मोफत पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना मिळालीच नाहीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 14:10 IST

अकोला : सर्व शिक्षा अभियानांतर्गत बाळापूर तालुक्यातील सेमी इंग्लिशच्या इयत्ता १ ते ३ आणि ५ ते ८ मधील विद्यार्थ्यांना हिंदी (सुलभभारती)चे पुस्तक अद्यापही वाटप झालेले नाही.

ठळक मुद्देसर्व शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना दरवर्षी मोफत पुस्तके दिली जातात. बाळापूर तालुक्यातील पहिली ते तिसरी, पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना हिंदी विषयाचे पुस्तक मिळालेले नाही.

अकोला : सर्व शिक्षा अभियानांतर्गत बाळापूर तालुक्यातील सेमी इंग्लिशच्या इयत्ता १ ते ३ आणि ५ ते ८ मधील विद्यार्थ्यांना हिंदी (सुलभभारती)चे पुस्तक अद्यापही वाटप झालेले नाही. विशेष म्हणजे, त्याऐवजी हिंदी माध्यमाचे सुगम भारती पुस्तक मिळाले, तर पहिली व तिसरीसाठी पुस्तकांची मागणीच न केल्याने हा घोळ झाल्याची माहिती आहे.सर्व शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना दरवर्षी मोफत पुस्तके दिली जातात. चालू वर्षात सत्राचे दोन महिने उलटले, तरीही बाळापूर तालुक्यातील पहिली ते तिसरी, पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना हिंदी विषयाचे पुस्तक मिळालेले नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर उंंचावण्यासाठी सर्व माध्यमांची पाठ्यपुस्तके मोफत दिली जातात. त्याचवेळी जिल्हा परिषद शाळा कॉन्व्हेंटसोबत स्पर्धा करीत आहेत. त्यासाठी या शाळांना सेमी इंग्लिश दर्जा मिळताच विद्यार्थ्यांचा ओढा या शाळांमध्ये वाढला आहे; मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे बाळापूर तालुक्यातील सर्व शाळांतील इयत्ता पाचवी ते आठवीच्या हिंदी (सुलभभारती) विषयापासून वंचित आहेत. प्रशासनाच्या चुकीमुळे विद्यार्थ्यांना हिंदी माध्यमासाठी असलेल्या सुगम भारती या पुस्तकाचे वाटप करण्यात आले. तसेच पहिली ते तिसरीच्या पुस्तकांची प्रशासनाने मागणीच केली नाही. त्यामुळे विद्यार्थी शालेय सत्र सुरू होऊन दोन महिने उलटले, तरीही वंचित आहेत. विद्यार्थ्यांची ही समस्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी सोडवावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष मारोती वरोकार यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

टॅग्स :AkolaअकोलाSchoolशाळाStudentविद्यार्थी