शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

एप्रिल अखेरीस विधानसभा निवडणुकीची दाट शक्यता; प्रकाश आंबेडकर यांचे सुतोवाच

By नितिन गव्हाळे | Updated: February 20, 2023 18:12 IST

शासकीय विश्रामगृहात वंचित बहुजन आघाडीने आयोजित केलेल्या पत्रपरिषदेत ते बोलत होते.

अकोला : महाराष्ट्रात सध्या सुरू असलेले राजकारण पाहता, एप्रिलअखेरीस विधानसभेची निवडणूक होण्याची दाट शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळाले आहे. अशा परिस्थितीत निवडणूक झाली तर, उद्धव ठाकरे यांच्या गटाला एक राजकीय पक्ष म्हणून निवडणुकीपासून वंचित राहावे लागण्याचीही शक्यता आहे, असे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंंबेडकर यांनी सोमवारी अकोला येथे व्यक्त केले.

शासकीय विश्रामगृहात वंचित बहुजन आघाडीने आयोजित केलेल्या पत्रपरिषदेत ते बोलत होते. प्रकाश आंबेडकर यांनी, निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय मान्य करावा लागणार असल्याचे सांगताना उद्धव ठाकरे यांच्याकडील पक्षाचे नाव व चिन्ह गेले असले तरी, आमच्या युतीवर त्याचा परिणाम होणार नाही. मी उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभा आहे.ही आमची वैयक्तिक युती आहे.

आगामी निवडणुकांसाठी युती उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेली युती ही सन २०२४ पर्यंत होणाऱ्या सर्व निवडणुकांसाठी आहे. त्यात लोकसभा, विधानसभा निवडणुकीसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुकांचा समावेश असल्याचा पुनरूचचार आंबेडकर यांनी केला़ उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांशीही माझे चांगले संबध आहेत. त्यामुळे त्यांना एकत्र आणण्यासाठी कोणताही प्रयत्न करणार नाही. त्या दोघांच्या भांडणात माझे काम नाही, असेही ते एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.

...तर एकटंच निवडणूक लढवू

आम्ही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत युती केली. त्यामुळे आम्हाला महाविकास आघाडीत घ्यायचे की नाही, याबाबतचा निर्णय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला घ्यावा लागणार आहे. महाविकास आघाडीबाबत उद्धव ठाकरे यांनी काही वेगळा निर्णय घेतला तर आम्ही पुन्हा एकला चलो रे ची भूमिका घेऊन, येत्या निवडणुकीला सामोरे जाऊ, असे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

माझे दाेन चेहरे

राजकारण, समाजकारणात वावरताना, माझे दोन चेहरे आहेत. एक भारतरत्न डॉ. बाबासाहेबांचा नातू आणि दुसरा राजकीय पक्षाचा प्रमुख. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांमधील नेत्यांशी संबंध आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेली बैठक राजकीय नसून, ती इंंदू मिलमधील डॉ. बाबासाहेबांच्या स्मारकासाठी होती.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारShiv Senaशिवसेना