शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

पेरण्या खोळंबल्या; शेतकऱ्यांना दमदार सार्वत्रिक पावसाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 13:44 IST

अकोला : विदर्भात मान्सूनचा प्रवेश झाल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने जाहीर केले; पण तो गेला कु ठे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

- राजारत्न सिरसाट

अकोला : विदर्भात मान्सूनचा प्रवेश झाल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने जाहीर केले; पण तो गेला कु ठे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. १६ जून रोजी विदर्भात काही भागात पाऊस झाला, तेव्हापासून सार्वत्रिक पाऊसच झाला नसल्याने विदर्भातील ४९ लाख हेक्टरवरील पेरण्या खोळंबल्या आहेत.राज्यात १४०.६९ ला, हेक्टर तर विदर्भात यातील ४९ लाख हेक्टर खरिपाचे क्षेत्र आहे. १६ जून रोजी विदर्भासह राज्यातील काही भागात पाऊस पडला. पुन्हा पाऊस येईल, या आशेवर शेतकºयांनी बियाणे खरेदीसाठी बाजारात गर्दी केली. काही शेतकºयांनी पेरणीसुद्धा केली. १८ जूनपर्यंत १४०.६९ लाख हेक्टरपैकी ०.३९ लाख हेक्टर ०.२८ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली होती. सार्वत्रिक पाऊसच होत नसल्याने शेतकºयांनी पेरण्या थांबविल्या आहेत. अमरावती विभागात ३२ लाख हेक्टरपैकी आजमितीस केवळ ३ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. या तीन टक्क्यांमध्ये कापूस बियाणे पेरणी शेतकºयांनी केली. नागपूर विभागात तर एक टक्का पेरणी झाली नाही. नागपूर व वर्धा जिल्ह्यात काही भागात पाऊस झाल्याने शेतकºयांनी कापसाची धूळ पेरणी केली. ज्या शेतकºयांकडे संरक्षित सिंचनाची सोय आहे, त्यातील दोन-चार शेतकºयांनी भाताची रोपवाटिका टाकली.दरम्यान, राज्यातील चित्र बघितल्यास खरीप हंगामातील पूर्वमशागतीची कामे सुरू आहेत, तर कोल्हापूर विभागात भात पिकाच्या धूळवाफ पेरणीची कामे सुरू झाली. सांगली जिल्ह्यात ७,६९७ तर कोल्हापूर जिल्ह्यात ११,९०० हेक्टरवर पेरणी झाली. सांगली जिल्ह्यात यावर्षी १३७ हेक्टरवर शेतकºयांनी सोयाबीन पेरणी केली. ठाणे व पुणे विभागात १०,१२५ हेक्टरवर भात व ३२९ हेक्टरवर भात रोपवाटिकेतील पेरणीची कामे झाली, तसेच ६८६ हेक्टरवर नाचणी रोपवाटिकेतील पेरणीची कामे झाली. कोकणात ठाणे ८६ हेक्टर, पालघर १०४ हेक्टर, रायगड २,६३९ हेक्टर, रत्नागिरी ४,८४७ हेक्टर व सिंधुदुर्ग जिल्ह्यात २,४४९ हेक्टर भात रोपवाटिकेतील पेरणीची कामे झाली आहेत.

- दोन वर्षांपासून पूर्वेकडून मान्सून!अरबी समुद्राकडून येणारा मान्सून हा स्थिर व कायम असतो. तथापि, विदर्भात गत दोन वर्षांपासून बंगालच्या उपसागराकडून मान्सून प्रवेश करीत आहे. त्यामुळे शेतकºयांनी पेरणी करताना काळजी घेणे गरजेचे असल्याचे कृषी तज्ज्ञांकरवी शेतकºयांना सल्ला दिला जात आहे.- पश्चिम विदर्भात केवळ ३ टक्के कापूस बियाणे पेरणी झाली आहे.शेतकºयांना दमदार सार्वत्रिक पावसाची प्रतीक्षा आहे.सुभाष नागरे,विभागीय कृषी सह संचालक,अमरावती.

 

टॅग्स :AkolaअकोलाRainपाऊसFarmerशेतकरी