शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... 
2
चीनच्या माजी मंत्र्यांनी भ्रष्टाचार करून अब्जावधी रुपये कमावले, आता न्यायालयाने दिली मृत्युदंडाची शिक्षा
3
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; Gold पुन्हा ऑल टाइम हायवर, चांदी २००० रुपयांनी वधारली
4
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले; "तुम्ही किती किट आणले..."
5
दिवाळीला बायकोला द्या स्कूटर गिफ्ट! ८०,००० रुपयांपर्यंतच्या बजेटमध्ये मिळतायेत बेस्ट पर्याय
6
शेतकरी संकटात, पुरामुळे संसार उद्ध्वस्त; विशेष अधिवेशन बोलवा, विरोधकांचं राज्यपालांना पत्र
7
बिहारमध्ये नीतीश कुमारांच्या पक्षाला किती जागा मिळणार? तेजस्वी कमाल करणार? भाजपचं काय होणार? नव्या सर्व्हेचा धक्कादायक अंदाज!
8
Chaitanyananda Saraswati : "मी फोनचा पासवर्ड विसरलो, मला भीती वाटतेय"; मुलींना छळणाऱ्या चैतन्यनंदची हात जोडून विनंती
9
"फक्त कॅमेऱ्यांसाठी सगळे राष्ट्रवादाचे नाटक सुरू"; संजय राऊतांनी सुनावले, 'तो' व्हिडीओ केला शेअर
10
GST नंतर आता तुमचा EMI स्वस्त होणार? RBI च्या पतधोरण समितीची बैठक आजपासून, रेपो दरात किती कपात
11
एक वेळ अशी आली... लोक गरबा खेळायचे सोडून मोठ्या स्क्रीनवर मॅच पाहू लागले; कॅमेऱ्यात टिपला गेला तो क्षण...
12
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
13
९ कंपन्यांचे IPO आजपासून झाले खुले, गुंतवणूकीचा विचार करताय का? पाहा GMP सह अन्य डिटेल्स
14
विम्यासाठी भयंकर कट! आधी आई, मग पत्नी, आता वडिलांचा मृत्यू...; पैशांसाठी लेक झाला हैवान
15
दुकाने,रस्ते बंद, इंटरनेटही बंद, लोक रस्त्यावर उतरली; पीओकेमधील जनता पाकिस्तान सरकारवर का नाराज आहेत?
16
Dussehra 2025: आपट्याचे पान देऊन 'सोनं लुटणं' म्हणण्याचा प्रघात कसा रूढ झाला माहितीय?
17
"राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू", भाजप प्रवक्त्याचे टीव्हीवरील चर्चेत विधान, काँग्रेसचे अमित शाहांना पत्र
18
ऑफ-रोड आणि लक्झरीची बादशाह! अभिषेक शर्माला मिळालेल्या चायनीज SUV कारची ८ खास वैशिष्ट्ये
19
Mumbai Metro 3: भुयारी मेट्रोचे प्रवेशद्वार छताविना; हुतात्मा चौक स्थानकात पाणी शिरण्याचा धोका, एमएमआरसीवर टीकास्त्र
20
Atlanta Electricals Ltd Listing: ₹८५७ वर लिस्ट झाला हा आयपीओ; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना तुफान फायदा, झाले मालामाल

पेरण्या खोळंबल्या; शेतकऱ्यांना दमदार सार्वत्रिक पावसाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 13:44 IST

अकोला : विदर्भात मान्सूनचा प्रवेश झाल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने जाहीर केले; पण तो गेला कु ठे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

- राजारत्न सिरसाट

अकोला : विदर्भात मान्सूनचा प्रवेश झाल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने जाहीर केले; पण तो गेला कु ठे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. १६ जून रोजी विदर्भात काही भागात पाऊस झाला, तेव्हापासून सार्वत्रिक पाऊसच झाला नसल्याने विदर्भातील ४९ लाख हेक्टरवरील पेरण्या खोळंबल्या आहेत.राज्यात १४०.६९ ला, हेक्टर तर विदर्भात यातील ४९ लाख हेक्टर खरिपाचे क्षेत्र आहे. १६ जून रोजी विदर्भासह राज्यातील काही भागात पाऊस पडला. पुन्हा पाऊस येईल, या आशेवर शेतकºयांनी बियाणे खरेदीसाठी बाजारात गर्दी केली. काही शेतकºयांनी पेरणीसुद्धा केली. १८ जूनपर्यंत १४०.६९ लाख हेक्टरपैकी ०.३९ लाख हेक्टर ०.२८ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली होती. सार्वत्रिक पाऊसच होत नसल्याने शेतकºयांनी पेरण्या थांबविल्या आहेत. अमरावती विभागात ३२ लाख हेक्टरपैकी आजमितीस केवळ ३ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. या तीन टक्क्यांमध्ये कापूस बियाणे पेरणी शेतकºयांनी केली. नागपूर विभागात तर एक टक्का पेरणी झाली नाही. नागपूर व वर्धा जिल्ह्यात काही भागात पाऊस झाल्याने शेतकºयांनी कापसाची धूळ पेरणी केली. ज्या शेतकºयांकडे संरक्षित सिंचनाची सोय आहे, त्यातील दोन-चार शेतकºयांनी भाताची रोपवाटिका टाकली.दरम्यान, राज्यातील चित्र बघितल्यास खरीप हंगामातील पूर्वमशागतीची कामे सुरू आहेत, तर कोल्हापूर विभागात भात पिकाच्या धूळवाफ पेरणीची कामे सुरू झाली. सांगली जिल्ह्यात ७,६९७ तर कोल्हापूर जिल्ह्यात ११,९०० हेक्टरवर पेरणी झाली. सांगली जिल्ह्यात यावर्षी १३७ हेक्टरवर शेतकºयांनी सोयाबीन पेरणी केली. ठाणे व पुणे विभागात १०,१२५ हेक्टरवर भात व ३२९ हेक्टरवर भात रोपवाटिकेतील पेरणीची कामे झाली, तसेच ६८६ हेक्टरवर नाचणी रोपवाटिकेतील पेरणीची कामे झाली. कोकणात ठाणे ८६ हेक्टर, पालघर १०४ हेक्टर, रायगड २,६३९ हेक्टर, रत्नागिरी ४,८४७ हेक्टर व सिंधुदुर्ग जिल्ह्यात २,४४९ हेक्टर भात रोपवाटिकेतील पेरणीची कामे झाली आहेत.

- दोन वर्षांपासून पूर्वेकडून मान्सून!अरबी समुद्राकडून येणारा मान्सून हा स्थिर व कायम असतो. तथापि, विदर्भात गत दोन वर्षांपासून बंगालच्या उपसागराकडून मान्सून प्रवेश करीत आहे. त्यामुळे शेतकºयांनी पेरणी करताना काळजी घेणे गरजेचे असल्याचे कृषी तज्ज्ञांकरवी शेतकºयांना सल्ला दिला जात आहे.- पश्चिम विदर्भात केवळ ३ टक्के कापूस बियाणे पेरणी झाली आहे.शेतकºयांना दमदार सार्वत्रिक पावसाची प्रतीक्षा आहे.सुभाष नागरे,विभागीय कृषी सह संचालक,अमरावती.

 

टॅग्स :AkolaअकोलाRainपाऊसFarmerशेतकरी