शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

पेरण्या खोळंबल्या; शेतकऱ्यांना दमदार सार्वत्रिक पावसाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 13:44 IST

अकोला : विदर्भात मान्सूनचा प्रवेश झाल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने जाहीर केले; पण तो गेला कु ठे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

- राजारत्न सिरसाट

अकोला : विदर्भात मान्सूनचा प्रवेश झाल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने जाहीर केले; पण तो गेला कु ठे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. १६ जून रोजी विदर्भात काही भागात पाऊस झाला, तेव्हापासून सार्वत्रिक पाऊसच झाला नसल्याने विदर्भातील ४९ लाख हेक्टरवरील पेरण्या खोळंबल्या आहेत.राज्यात १४०.६९ ला, हेक्टर तर विदर्भात यातील ४९ लाख हेक्टर खरिपाचे क्षेत्र आहे. १६ जून रोजी विदर्भासह राज्यातील काही भागात पाऊस पडला. पुन्हा पाऊस येईल, या आशेवर शेतकºयांनी बियाणे खरेदीसाठी बाजारात गर्दी केली. काही शेतकºयांनी पेरणीसुद्धा केली. १८ जूनपर्यंत १४०.६९ लाख हेक्टरपैकी ०.३९ लाख हेक्टर ०.२८ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली होती. सार्वत्रिक पाऊसच होत नसल्याने शेतकºयांनी पेरण्या थांबविल्या आहेत. अमरावती विभागात ३२ लाख हेक्टरपैकी आजमितीस केवळ ३ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. या तीन टक्क्यांमध्ये कापूस बियाणे पेरणी शेतकºयांनी केली. नागपूर विभागात तर एक टक्का पेरणी झाली नाही. नागपूर व वर्धा जिल्ह्यात काही भागात पाऊस झाल्याने शेतकºयांनी कापसाची धूळ पेरणी केली. ज्या शेतकºयांकडे संरक्षित सिंचनाची सोय आहे, त्यातील दोन-चार शेतकºयांनी भाताची रोपवाटिका टाकली.दरम्यान, राज्यातील चित्र बघितल्यास खरीप हंगामातील पूर्वमशागतीची कामे सुरू आहेत, तर कोल्हापूर विभागात भात पिकाच्या धूळवाफ पेरणीची कामे सुरू झाली. सांगली जिल्ह्यात ७,६९७ तर कोल्हापूर जिल्ह्यात ११,९०० हेक्टरवर पेरणी झाली. सांगली जिल्ह्यात यावर्षी १३७ हेक्टरवर शेतकºयांनी सोयाबीन पेरणी केली. ठाणे व पुणे विभागात १०,१२५ हेक्टरवर भात व ३२९ हेक्टरवर भात रोपवाटिकेतील पेरणीची कामे झाली, तसेच ६८६ हेक्टरवर नाचणी रोपवाटिकेतील पेरणीची कामे झाली. कोकणात ठाणे ८६ हेक्टर, पालघर १०४ हेक्टर, रायगड २,६३९ हेक्टर, रत्नागिरी ४,८४७ हेक्टर व सिंधुदुर्ग जिल्ह्यात २,४४९ हेक्टर भात रोपवाटिकेतील पेरणीची कामे झाली आहेत.

- दोन वर्षांपासून पूर्वेकडून मान्सून!अरबी समुद्राकडून येणारा मान्सून हा स्थिर व कायम असतो. तथापि, विदर्भात गत दोन वर्षांपासून बंगालच्या उपसागराकडून मान्सून प्रवेश करीत आहे. त्यामुळे शेतकºयांनी पेरणी करताना काळजी घेणे गरजेचे असल्याचे कृषी तज्ज्ञांकरवी शेतकºयांना सल्ला दिला जात आहे.- पश्चिम विदर्भात केवळ ३ टक्के कापूस बियाणे पेरणी झाली आहे.शेतकºयांना दमदार सार्वत्रिक पावसाची प्रतीक्षा आहे.सुभाष नागरे,विभागीय कृषी सह संचालक,अमरावती.

 

टॅग्स :AkolaअकोलाRainपाऊसFarmerशेतकरी