शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

अकोला जिल्ह्यात पावसाअभावी केवळ १.३८ टक्के क्षेत्रात पेरणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 11:07 IST

Sowing in only 1.38 per cent in Akola District : अद्यापही सार्वत्रिक पावसाची प्रतीक्षा असून शेतकरी चिंतित आहे.

अकोला : यंदा जिल्ह्यात मान्सूनचे आगमन लवकर झाले; परंतु बहुतांश तालुक्यात पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने जिल्ह्यात केवळ १.३८ टक्के क्षेत्रात पेरणी झाली आहे. अद्यापही सार्वत्रिक पावसाची प्रतीक्षा असून शेतकरी चिंतित आहे. जिल्ह्यातील ४ लाख ८३ हजार हेक्टर क्षेत्रात खरिपाच्या पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. जवळपास शेतकऱ्यांनी बियाणे, खते खरेदी केली असून आता दमदार पावसाची प्रतीक्षा सुरू आहे. आज ना उद्या पाऊस पडेल, या अपेक्षेने शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. पाऊसच नसल्याने जमिनीत ओल मुरलेली नाही. यावर्षी जिल्ह्यात केवळ ५०.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे. त्यामुळे अपेक्षित पेरणीही झाली नाही. आतापर्यंत जिल्ह्यात केवळ १.३८ टक्के म्हणजेच ६ हजार ६७८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक सिंचन क्षेत्र उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांचा समावेश आहे. शेतकऱ्यांना अद्यापही सार्वत्रिक पावसाची प्रतीक्षा लागली आहे.

अकोला, मूर्तिजापूर व बाळापूर तालुक्यात अत्यल्प पेरणी

पावसाअभावी जिल्ह्यात केवळ १.३८ टक्के क्षेत्रात पेरणी झाली आहे. यामध्ये अकोला ०.०४ टक्के, मूर्तिजापूर ०.०५ टक्के, बाळापूर ०.२ टक्के क्षेत्रात पेरणी झाली आहे. पातूर सर्वाधिक ४ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

 

जिल्ह्यात केवळ ५०.३ मिमी पाऊस

मान्सूनचे आगमन झाल्यानंतरही शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. मागील १५ दिवसांत जिल्ह्यात केवळ ५०.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी ७७.० टक्के पाऊस झाला होता.

अकोट तालुक्यात सर्वात कमी पाऊस

मागील १५ दिवसांमध्ये झालेल्या पावसात अकोट तालुक्यात सर्वात कमी २७.३ मिमी नोंद झाली आहे. तर मूर्तिजापूर तालुक्यात सर्वाधिक ८५.३ मिमी पावसाची नोंद झाली. त्यापाठोपाठ पातूर तालुक्यात ८१.९ मिमी पाऊस झाला.

 

आतापर्यंत झालेला पाऊस

५०.३ मिमी

आतापर्यंत झालेल्या पेरणी

१.३८ टक्के

पेरणीची घाई नको!

इतर जिल्ह्यांमध्ये बऱ्यापैकी पाऊस पडत आहे; परंतु अकोला जिल्ह्यात पावसाची दमदार सुरुवात झाली नाही. सध्या पेरणीसाठी लगबग सुरू असून शेतकऱ्यांनी ८० ते १०० मिमी इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असा आवाहन कृषी विभागाने केले आहे. अपुऱ्या ओलाव्यावर पेरणी केल्यानंतर पावसाचा खंड झाल्यास पेरणी वाया जाऊ शकते.

 

यंदा कपाशी पेरणीचे नियोजन केले आहे; परंतु पाहिजे त्या प्रमाणात पाऊस झाला नाही. त्यामुळे पेरणी रखडली आहे. अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

- किशोर मोरे, शेतकरी

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीRainपाऊस