शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

अकोला जिल्ह्यात पावसाअभावी केवळ १.३८ टक्के क्षेत्रात पेरणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 11:07 IST

Sowing in only 1.38 per cent in Akola District : अद्यापही सार्वत्रिक पावसाची प्रतीक्षा असून शेतकरी चिंतित आहे.

अकोला : यंदा जिल्ह्यात मान्सूनचे आगमन लवकर झाले; परंतु बहुतांश तालुक्यात पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने जिल्ह्यात केवळ १.३८ टक्के क्षेत्रात पेरणी झाली आहे. अद्यापही सार्वत्रिक पावसाची प्रतीक्षा असून शेतकरी चिंतित आहे. जिल्ह्यातील ४ लाख ८३ हजार हेक्टर क्षेत्रात खरिपाच्या पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. जवळपास शेतकऱ्यांनी बियाणे, खते खरेदी केली असून आता दमदार पावसाची प्रतीक्षा सुरू आहे. आज ना उद्या पाऊस पडेल, या अपेक्षेने शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. पाऊसच नसल्याने जमिनीत ओल मुरलेली नाही. यावर्षी जिल्ह्यात केवळ ५०.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे. त्यामुळे अपेक्षित पेरणीही झाली नाही. आतापर्यंत जिल्ह्यात केवळ १.३८ टक्के म्हणजेच ६ हजार ६७८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक सिंचन क्षेत्र उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांचा समावेश आहे. शेतकऱ्यांना अद्यापही सार्वत्रिक पावसाची प्रतीक्षा लागली आहे.

अकोला, मूर्तिजापूर व बाळापूर तालुक्यात अत्यल्प पेरणी

पावसाअभावी जिल्ह्यात केवळ १.३८ टक्के क्षेत्रात पेरणी झाली आहे. यामध्ये अकोला ०.०४ टक्के, मूर्तिजापूर ०.०५ टक्के, बाळापूर ०.२ टक्के क्षेत्रात पेरणी झाली आहे. पातूर सर्वाधिक ४ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

 

जिल्ह्यात केवळ ५०.३ मिमी पाऊस

मान्सूनचे आगमन झाल्यानंतरही शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. मागील १५ दिवसांत जिल्ह्यात केवळ ५०.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी ७७.० टक्के पाऊस झाला होता.

अकोट तालुक्यात सर्वात कमी पाऊस

मागील १५ दिवसांमध्ये झालेल्या पावसात अकोट तालुक्यात सर्वात कमी २७.३ मिमी नोंद झाली आहे. तर मूर्तिजापूर तालुक्यात सर्वाधिक ८५.३ मिमी पावसाची नोंद झाली. त्यापाठोपाठ पातूर तालुक्यात ८१.९ मिमी पाऊस झाला.

 

आतापर्यंत झालेला पाऊस

५०.३ मिमी

आतापर्यंत झालेल्या पेरणी

१.३८ टक्के

पेरणीची घाई नको!

इतर जिल्ह्यांमध्ये बऱ्यापैकी पाऊस पडत आहे; परंतु अकोला जिल्ह्यात पावसाची दमदार सुरुवात झाली नाही. सध्या पेरणीसाठी लगबग सुरू असून शेतकऱ्यांनी ८० ते १०० मिमी इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असा आवाहन कृषी विभागाने केले आहे. अपुऱ्या ओलाव्यावर पेरणी केल्यानंतर पावसाचा खंड झाल्यास पेरणी वाया जाऊ शकते.

 

यंदा कपाशी पेरणीचे नियोजन केले आहे; परंतु पाहिजे त्या प्रमाणात पाऊस झाला नाही. त्यामुळे पेरणी रखडली आहे. अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

- किशोर मोरे, शेतकरी

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीRainपाऊस