नाल्यांमधील सांडपाण्यामुळे घरात शिरतात साप; महिलांचा संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:14 IST2021-06-18T04:14:21+5:302021-06-18T04:14:21+5:30
मागील वर्षभरापासून मनपा प्रशासनाने नाले सफाई न केल्यामुळे परिसरातील नाल्यांमध्ये सांडपाणी तुंबले आहे. पावसामुळे या समस्येत अधिकच वाढ झाली ...

नाल्यांमधील सांडपाण्यामुळे घरात शिरतात साप; महिलांचा संताप
मागील वर्षभरापासून मनपा प्रशासनाने नाले सफाई न केल्यामुळे परिसरातील नाल्यांमध्ये सांडपाणी तुंबले आहे. पावसामुळे या समस्येत अधिकच वाढ झाली असून, नाल्यांचे सांडपाणीच नव्हे; तर घरांमध्ये चक्क साप शिरत असल्याची माहिती उत्तर झाेनअंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक २ मधील रहिवासी लीला खाेब्रागडे यांनी दिली. ही समस्या निकाली न काढता ‘जैसे थे’ ठेवण्याकडे मनपा प्रशासनाचा कल असल्याचा आराेप यावेळी परिसरातील असंख्य नागरिकांनी केला.
यंदा नाले सफाईसाठी मनपा प्रशासनाने तब्बल ७५ लाख रुपयांची तरतूद केली. झाेननिहाय कंत्राटदारांची नियुक्ती न करता एकाच कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली असून, मागील काही दिवसांपासून नाले सफाईला सुरुवात करण्यात आली आहे. शहराच्या प्रत्येक भागात नियाेजनपूर्वक नाले सफाई केला जात असल्याचा गवगवा बांधकाम विभागातील काही विशिष्ट कर्मचाऱ्यांकडून केला जात असला तरी परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. उत्तर झाेनअंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक २ मधील नाले सफाईकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आराेप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. ‘लाेकमत’ चमूने प्रभागातील नाल्यांची प्रत्यक्षात पाहणी केली असता तुटलेल्या नाल्या, त्यात साचलेले सांडपाणी, दुर्गंधी, काटेरी झुडपे, गवत पसरल्याचे दिसून आले.
मागील अनेक महिन्यांपासून शंकर नगर, आपातापा राेड परिसरातील माेठ्या नाल्यांची साफसफाईच न केल्यामुळे सांडपाणी तुंबले आहे. यामुळे डासांची पैदास वाढली असून, पावसाळ्यात नाल्यांचे सांडपाणी घरात शिरते. प्रशासन कागदाेपत्री नालेसफाई करीत आहे.
- अशाेक कांबळे, रहिवासी, प्रभाग २
आपातापा राेड भागात साफसफाईअभावी नाल्यांमधील सांडपाणी अंगणात साचते. नळाच्या टाक्यात घाण पाणी साचत असल्याने त्याचा उपसा करावा लागताे. त्यानंतरच नळाच्या पाण्याचा वापर करता येताे. दुर्गंधीमुळे आम्ही त्रस्त आहाेत. याकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष हाेत आहे.
- अनिल गायकवाड, रहिवासी, प्रभाग २
संत कबीर नगरमध्ये नाल्यांमधील सांडपाणी वाहून जात नसल्याने मागील काही दिवसांपासून नाल्यांतील साप, विषारी जीवजंतू घरात शिरत आहेत. यामुळे आमच्या जीविताला धाेका निर्माण झाला आहे. आमच्या जीवाचे काही बरे-वाईट झाल्यास मनपाच्या अधिकाऱ्यांना न्यायालयात खेचण्यात येईल.
- लीला खाेब्रागडे, रहिवासी, प्रभाग २
लाडीसफैल भागातील नाले सफाईकडे मनपाने पाठ फिरवल्यामुळे आराेग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. काटेरी झुडपे, गवत वाढल्याने डासांची पैदास वाढली आहे. या समस्येकडे आयुक्त नीमा अराेरा यांनी जातीने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
- सीमा काशिद, रहिवासी, प्रभाग २
प्रभागात ठिकठिकाणी नाले सफाईचा बाेजवारा उडाला असून, नागरिकांच्या अंगणात, घरात घाण पाणी शिरत असल्याची परिस्थिती आहे. ही समस्या साेडवण्यासाठी नागरिक दरराेज घरी येतात. मनपा कर्मचाऱ्यांकडून आयुक्तांची दिशाभूल केली जात आहे. प्रशासनाने दखल न घेतल्यास आंदाेलनाशिवाय पर्याय नाही.
- चांदनी रवी शिंदे, नगरसेविका, प्रभाग २