शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! अंगणवाडीतील बालकांना मुदतबाह्य पोषण आहाराचे वाटप, पालकांनी केली तक्रार, मूर्तिजापूर येथील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 18:58 IST

एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत अंगणवाडीत धडे घेणाऱ्या बालकांना कालबाह्य पोषण आहाचे वाटप करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तालुक्यात असे प्रकार वारंवार घडत असल्याने हा चिंतेचा विषय झाला आहे.

-संजय उमकअकोला -  एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत अंगणवाडीत धडे घेणाऱ्या बालकांना कालबाह्य पोषण आहाचे वाटप करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तालुक्यात असे प्रकार वारंवार घडत असल्याने हा चिंतेचा विषय झाला आहे.

ग्रामीण व शहरी भागातील  प्रत्येक बालक सुदृढ व सक्षम व्हावा आणि त्याचे आरोग्य सुधारावे, यासाठी शासन अंगणवाडीच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणात खर्च करते; पण मूर्तिजापूर तालुक्यातील परिस्थिती काही वेगळेच सांगून जाते. सक्षम व सुदृढ बनवणारी यंत्रणाच आता झाल्या प्रकारावरुन लक्षात येते. राज्य भारत सरकारच्या उपक्रमांतर्गत मूर्तिजापूर येथील एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प  कार्यालयाच्या माध्यमातून अंगणवाडीतील बालकांना पोषण आहाराचे वाटप करण्यात येते परंतु मूर्तिजापूर शहरातील वसंत नगर स्थित अंगणवाडी क्रमांक ६ मधिल बालकांना मुदत बाह्य पोषण आहाराचे वितरण करण्यात आले. सीलबंद पाकीटात असलेल्या पोषण आहाराचे वितरण बालकांना करण्यात आले आहे. सदर पाकिटावर पॅकेजिंग तारीख ९ सप्टेंबर २०२१ असून पॅक केल्याच्या तारखेपासून ४ चार महीने पर्यंत वापरण्याची सुचना ठळक व स्पष्ट लिहिलेली असताना देखील या अंगणवाडीतून २४ मार्च रोजी मुदत संपलेल्या पोषण आहाराचे वितरण करण्यात आल्याचे समोर आले आहे. या संदर्भात सविश रविंद्र गवई यांनी चौकशी करुन कारवाई करण्यासाठी महिला व बालविकास आयुक्त व एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी मूर्तिजापूर यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. वितरीत करण्यात आलेला आहारचे अनेक बालकांनी सेवन केले आहे. केवळ काही जागृक पालकांच्या घडलेला प्रकार लक्षात आला, ज्या बालकांनी आहाराचे सेवन केले अशा बालकांच्या प्रकृतीचे काय असाही प्रश्न निर्माण झाला आहे.  तालुक्यातील १९० अंगणवाड्या आहेत परंतु हा प्रकल्प चालविण्यासाठी कर्मचारी संख्या अत्यंत तोकडी आहे.  या कार्यालयाला एकूण १० कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे; मात्र १० कर्मचाऱ्यांचा भार केवळ ४ ते ५ कर्मचारी सांभाळत आहेत. अतिरिक्त भार सांभाळताना अशा अनेक अक्षम्य चुका होत आहेत.  मुदत बाह्य पोषण आहाराचे आहाराचे वाटप करण्यात आले आहे, हे खरे आहे, सदर प्रकार अंगणवाडी सेविकेच्या चुकीने घडला. वितरीत करण्यात आलेल्या आहाराचे पॅकेट्स परत मागविण्यात आले आहे. - पी. के. राठोड, बालविकास प्रकल्प अधिकारी, मूर्तिजापूर

टॅग्स :AkolaअकोलाHealthआरोग्यMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार