शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

आलेगावात पाण्याची भीषण टंचाई; ग्रामपंचायत कार्यालयावर महिलांचा घागर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 21:55 IST

आलेगाव (अकोला): येथे गेल्या एक महिन्यापासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी वॉर्ड क्र. चारमधील मुस्लीम महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयवर १७ फेब्रुवारी घागर मोर्चा काढला. 

ठळक मुद्देग्रामस्थांसह पाळीव जनावराला पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे

लोकमत न्यूज नेटवर्कआलेगाव (अकोला): येथे गेल्या एक महिन्यापासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी वॉर्ड क्र. चारमधील मुस्लीम महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयवर १७ फेब्रुवारी घागर मोर्चा काढला. ग्रामपंचायत सरपंचपती गजेंद्र तेलगोटे यांना निवेदन देऊन सात दिवसांत पाण्याची समस्या सोडवावी, अन्यथा आम्ही आंदोलन करू, असा इशारा दिला आहे. आंदोलनामध्ये अनुचित प्रकार घडल्यास त्याची जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनाची राहील, असे निवेदनामध्ये नमूद केले आहे. तसेच चोंढी, निर्गुणा प्रकल्पाचे पाणी शासन व प्रशासनाने पारस येथील औष्णिक केंद्राला दिल्यामुळे गावामध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली व ग्रामस्थांसह पाळीव जनावराला पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. अशा विविध समस्या परिसरात निर्माण झाल्याचे महिलांनी सांगितले, तसेच ग्रामपंचायत प्रशासनाने मस्तानशाह चौकामध्ये ५0 फुटावर दोन हातपंप उभारले; परंतु ज्या ठिकाणी पाण्याच्या गंभीर समस्या आहेत, तेथे एकही हातपंप नाही. त्यामुळे पाण्याच्या समस्येसाठी नागरिकांना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. या समस्येची संबंधित प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन पाणी समस्या सोडवावी, अशी मागणी होत आहे. 

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणagitationआंदोलन