शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

काचेच्या घरात राहणाऱ्यांची एकमेकांवर दगडफेक; भारिप-राष्ट्रवादीमध्ये आरोपांचे सत्र 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 12:55 IST

अकोल्यात भारिप-बमंस व राष्टÑवादी काँग्रेस यांच्यामध्ये सुरू असलेली आरोपांंची दगडफेक ही काचेच्या घरात राहणºयांनी एकमेकांवर केलेली दगडफेक अशीच आहे.

ठळक मुद्दे राष्टÑवादीचे नेते शरद पवार हे जातीयवादी आहेत, अशी बोचरी टीका अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी केली. साहजिकच पवारांनी तत्परतेने पलटवार करून आंबेडकरांना त्यांच्या दोन निवडणुकांचे स्मरण करून दिले. पवार हे धादांत खोटे बोलत आहेत. अशी भूमिका आंबेडकरांनी घेतल्यावर सध्या राज्यभर आरोप-प्रत्यारोपाचे मोहळ उठले आहे.

- राजेश शेगोकार

अकोला: जिनके घर शिशे के होते है, वो दूसरो पे पत्थर नही मारा करते...हिंदी चित्रपटातील हा संवाद दार्शनिक ठरला आहे. राजकारण या क्षेत्राला तर तो चपखलपणे आरसा दाखवितो. हा संवाद आठवण्याचे कारण म्हणजे सध्या अकोल्यात भारिप-बमंस व राष्टÑवादी काँग्रेस यांच्यामध्ये सुरू असलेली आरोपांंची दगडफेक ही काचेच्या घरात राहणºयांनी एकमेकांवर केलेली दगडफेक अशीच आहे. या आरोपांच्या सत्राला निमित्त ठरले ते राष्टÑवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व भारिप-बमंचे सर्वेसर्वा अ‍ॅड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांनी एकमेकांवर केलेले आरोपअ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएम सोबत आघाडी जाहीर करताच काँग्र्रेसने आघाडीसाठी आंबेडकरांची गळाभेट घेतली. यावेळी आंबेडकरांनी काँग्रेस सोबत आघाडी करू; पण राष्टÑवादी सोबत नाही. राष्टÑवादीचे नेते शरद पवार हे जातीयवादी आहेत, अशी बोचरी टीका केली. साहजिकच पवारांनी तत्परतेने पलटवार करून आंबेडकरांना त्यांच्या दोन निवडणुकांचे स्मरण करून दिले. ज्यावेळी आंबेडकरांनी पाठिंबा घेतला त्यावेळी आम्ही जातीयवादी नव्हतो का? असा सवाल उपस्थित केल्यावर पवार हे धादांत खोटे बोलत आहेत. अशी भूमिका आंबेडकरांनी घेतल्यावर सध्या राज्यभर आरोप-प्रत्यारोपाचे मोहळ उठले आहे. अकोला ही आंबेडकरांची राजकीय राजधानी त्याला अपवाद कशी ठरेल. अकोल्यात राष्टÑवादीच्या झाडून सर्व नेत्यांनी एकत्र येत आंबेडकरच खोटे असे हे पत्रकार परिषदेत ठासून सांगितले. या पत्रकार परिषदेत माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांची भूमिका अतिशय आक्रमक होती, त्यामुळे त्यांनाच टार्गेट करीत दुसºया दिवशी भारिपचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे यांनी प्रत्युत्तर देत राष्टÑवादीच्या नेत्यांची वैचारिक पातळीच काढली. या पृष्ठभूमीवर पश्चिम वºहाडाच्या राजकारणाचा आढावा घेतला तर या दोन्ही पक्षांनी कधी ना कधी एकमेकांना सहकार्य करून सत्ता उपभोगल्याचे स्पष्ट होते.अकोला जिल्हा परिषदेच्या इतिहासाचा धांडोळा घेतला तर भारिप-बमसंला कधीही एकहाती सत्ता मिळालेली नाही. प्रत्येक वेळी त्यांना कुठल्या ना कुठल्या पक्षाचा टेकू घ्यावा लागला, तर कधी अपक्षांना हाताशी घ्यावे लागले. यामध्ये भारिपाला काँग्रेस सोबत राष्टÑवादीचेही वावडे नव्हतेच. सध्याही अकोला जिल्हा परिषदेत भारिपला राष्टÑवादीचा टेकू आहेच. इतकेच नव्हे तर पुंडलिकराव अरबट यांच्या रूपाने सभापती पदही राष्टÑवादीला दिले आहे. शरद पवार जातीयवादी आहेत, तर मग त्यांचा पक्ष जिल्हा परिषेदच्या सत्तेत भारिपला कसा चालतो? या प्रश्नाचा दगड राष्टÑवादीने भारिपच्या घरावर मारला आहे. दुसरीकडे माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांच्यासह राष्ट्रवादीवर भारिपने आगपाखड केली आहे. गुलाबराव गावंडे हे शिवसेनेचे विदर्भातील सर्वाधिक आक्रमक नेते. थेट बाळासाहेबांचे लाडके अशी त्यांची ओळख व ख्याती होती. त्यांनीही सेनेला सोडचिठ्ठी देत राष्टÑवादी पुन्हा सेना व आता पुन्हा राष्टÑवादी अशी संगीत खुर्ची खेळली आहे. राष्टÑवादीतील अनेक नेते पक्षांतर करून आले आहेत, तर काहींची छुपी युती लपलेली नाही. अर्थात काही सन्माननीय अपवाद आहेतही; मात्र सरसकट साधन शुचिता कुठल्याच पक्षात नसल्याने राष्ट्रवादीने फेकलेले आरोपांचे दगड हे साहजिकच त्यांच्याच काचेच्या घरावर पडले आहेत.या आरोप सत्रामुळे सध्या राजकारणाचा पेंडुलम हलता आहे. जनतेचे मनोरंजन होत आहे. उद्या राष्टÑवादीला सोबत घेत काँग्रेसने आंबेडकरांची आघाडीसाठी मनधरणी करून त्यांना मनवले, तर याच नेत्यांची मोठी अडचण होणार आहे. आज एमेकांवर दगडफेक करणाºयांनाच उद्या तुझ्या गळा माझ्या गळा गुुंफू ‘मतां’च्या माळा म्हणत गळाभेट घ्यावी लागणार आहे. कारण राजकारणात कोणीच कोणाचा कायम शत्रू अन् मित्र असत नाही.

 

टॅग्स :AkolaअकोलाPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघ