शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

रेल्वेस्थानकाच्या सुरक्षेत वाढ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2017 01:21 IST

‘आरपीएफ’ सतर्क : नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: रेल्वेत जागा मिळविण्यासाठी प्रवासी रेल्वे पोलिसांच्या देखत स्वत:चा जीव धोक्यात घालत आहेत, अशा आशयाचे वृत्त मंगळवारी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच अकोला रेल्वे पोलीस (आरपीएफ) यंत्रणा खडबडून जागी झाली. मध्य रेल्वेच्या भुसावळ येथील अधिकाऱ्यांनीसुद्धा या वृत्ताची दखल घेतली असून, रेल्वेस्थानकाच्या सुरक्षेत वाढ करण्याचे निर्देश त्यांनी अकोला ‘आरपीएफ’ला दिले आहेत. उन्हाळ्याच्या सुट्या व लग्नसराईची धूम यामुळे अकोला मार्गे जाणाऱ्या जवळपास सर्वच रेल्वे गाड्यांना प्रवाशांची तुफान गर्दी आहे. आरक्षण मिळत नसल्याने, प्रवाशांना रेल्वे डब्यामध्ये जागा मिळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असली तरी, अनेक महाभाग गाडीमध्ये जागा मिळावी यासाठी रेल्वे रूळ ओलांडून फलाटाच्या विरुद्ध दिशेने जाऊन उभे राहतात. मध्यभागी असलेल्या रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या गाड्या, वर असलेली हाय टेंशन तार अशा अनेक धोक्यांची कल्पना असली तरी त्याकडे कानाडोळा केला जातो. यामध्ये अनेक महिलादेखील आपल्या लहानग्यांसह हा धोका पत्करतात. गाडी स्थानकात प्रवेश करतेवेळी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना पिटाळून लावणे शक्य होत नसल्याने, गस्तीवरील रेल्वे पोलिसांनासुद्धा अशा प्रसंगी बघ्याची भूमिका घ्यावी लागत असल्याची शोकांतिका रेल्वे पोलिसांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हजारो रेल्वे प्रवाशांवर आजतागायत दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. रेल्वे पोलीस जागरूक राहत असले तरी, प्रवाशांची मानसिकता बदलणे अशक्य असल्याची स्पष्टोक्ती त्यांनी यावेळी दिली. दिवस आणि रात्र पाळीत प्रत्यक्ष गस्त, विशेष पथके, मोबाइल अ‍ॅप, हेल्पलाइन या सर्व माध्यमातून अकोला रेल्वेस्थानकाच्या सुरक्षेचे कवच वाढविले असले तरी, अधिक व्यापक उपाययोजना करण्याचे निर्देश भुसावळ अधिकाऱ्यांनी दिले असल्याची प्रतिक्रिया आरपीएफ अधिकाऱ्यांनी लोकमतला दिली. क्षमतेपेक्षा भार अधिक- पूर्वीच्या तुलनेत अकोला मार्गे जाणाऱ्या प्रवासी गाड्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झालीच आहे, शिवाय रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे प्रमाणदेखील प्रचंड वाढले आहे. तुलनात्मकदृष्ट्या बघितल्यास अकोला मार्गे जाणाऱ्या बहुतांश प्रवासी गाड्या या क्षमतेपेक्षा अधिक भार वाहत आहेत. - रेल्वे प्रशासनाने या मार्गावर खच्चून भरून जाणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये एकतर डबे वाढवावेत किंवा पॅसेंजर गाड्या वाढविल्यास जागा मिळविण्याकरिता प्रवाशांना धावपळ करावी लागणार नाही आणि अपघातांचे प्रमाणदेखील कमी होईल.