शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
4
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
5
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
6
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
7
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
8
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
9
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
10
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
11
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
12
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
14
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
15
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
16
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
17
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
18
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
19
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
20
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?

शिष्यवृत्तीची परीक्षा होऊ शकते, मग शाळेची का नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 10:46 IST

Educatino Sector News : पास करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे; परंतु या निर्णयाला काही पालकांनी विरोध केला आहे.

ठळक मुद्देसवाल पालकांसह काही शिक्षणतज्ज्ञांनी उपस्थित केला आहे.विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीती

-  नितीन गव्हाळे

अकोला : एनएमएमएससह इतर शिष्यवृत्तीच्यापरीक्षा होऊ शकतात. शालेय विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर बोलावून त्यांची शिष्यवृत्तीची परीक्षा घेण्यात येते. मग शाळेची परीक्षा का घेण्यात येत नाही, असा सवाल पालकांसह काही शिक्षणतज्ज्ञांनी उपस्थित केला आहे. पहिली ते आठवी व नववी, अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता, पास करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे; परंतु या निर्णयाला काही पालकांनी विरोध केला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्यात दररोज हजारो कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना संसर्गामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. कोरोनाची गंभीर परिस्थिती पाहता, राज्य शासनाने इयत्ता पहिली ते आठवी आणि इयत्ता नववी ते अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करून त्यांना पुढील वर्गात तसेच ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरूद्ध पालक व शिक्षणतज्ज्ञांनी नाराजी व्यक्त केली असून, शालेय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची परीक्षा घेण्यात येते. विद्यार्थी, शिक्षकांना परीक्षा केंद्रावर बोलाविण्यात येते. तेव्हा त्यांना कोरोनाचा संसर्ग होत नाही. शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्यामुळे कोरोनाचा संसर्ग कसा पसरतो, हे अनाकलनीय असल्याचे पालकांनी म्हटले आहे. परीक्षा न घेतल्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यास बाजूला सारला आहे. परीक्षाच नाहीतर अभ्यास नाही. या विचारातून मुले अभ्यासाकडे दुर्लक्ष करू शकतात आणि त्याचा शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो, अशी भीती पालकांसह शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्य शासनाने शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याविषयी विचार करावा, असेही पालकांचे म्हणणे आहे.

परीक्षेबाबत तज्ज्ञ काय म्हणतात...

शिष्यवृत्तीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असते; परंतु शालेय विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली, तर विद्यार्थीसंख्याच लाखाच्या घरात आहे. कोरोनाच्या गंभीर परिस्थितीत शालेय विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे घातक ठरेल. विद्यार्थ्यांचे आरोग्य महत्त्वाचे आहे.

-डॉ. वर्षा संजय पाठक, माजी मुख्याध्यापिका

सध्या कोरोनाची भीषण परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत शालेय विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे, म्हणजे विद्यार्थ्यांना मृत्यूच्या दारात ढकलण्यासारखे आहे. त्यामुळे सध्या परीक्षा नकोच. शिष्यवृत्तीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असते.

-प्रा. डॉ. रवींद्र भास्कर, शिक्षणतज्ज्ञ

 

एकीकडे शिष्यवृत्तीची परीक्षा घेतली जाते; परंतु शाळांच्या परीक्षा रद्द केल्या जातात. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. शिक्षकांनी वर्षभर विद्यार्थ्यांना अध्यापन केले. विद्यार्थ्यांनी अभ्यास केला; परंतु परीक्षा होत नसल्याने, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होणार आहे. त्यामुळे शासनाने परीक्षा घ्याव्यात.

-शत्रुघ्न बिरकड, अध्यक्ष, मुख्याध्यापक संघटना विदर्भ

शाळा बंद आहेत. ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. त्यामुळे मुलांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत आहे. आतातर परीक्षाच रद्द केल्या आहेत. त्यामुळे अभ्यास, दप्तर बाजूलाच ठेवले गेले. परीक्षा घेण्यात आल्या तर त्यानिमित्ताने विद्यार्थी अभ्यास करतील. परीक्षा नसल्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता खालावणार आहे.

-विभा गोपाल गावंडे, पालक

 

शिष्यवृत्तीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असते; परंतु शालेय परीक्षा घेतली, तर हजारो विद्यार्थी बाहेर पडतील. एक परीक्षा एक दिवस नव्हे, तर आठवडाभर किंवा १५ दिवस चालणार. परीक्षा देण्यासाठी शाळेत जावे लागणार. सध्या परीक्षा रद्द केल्या, हेच योग्य आहे.

-शिवदास बोंबटकार, पालक

ही ढकलगाडी काय कामाची

परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पास करणे योग्य नाही; परंतु कोरोनाची परिस्थिती पाहता, शासनाने घेतलेला निर्णय योग्य आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचारही होणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया काही पालकांनी व्यक्त केली, तर काही पालकांनी ही ढकलगाडी काय कामाची... असा प्रश्न उपस्थित करीत, शासनाने परीक्षा न घेण्याचा घेतलेला निर्णय विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम करणारा असल्याचे म्हटले आहे.

एकूण विद्यार्थी- २,३५,२१३

पहिली ते आठवी विद्यार्थीसंख्या

अकोला- ९१,६७४

अकोट- ३४,४५५

बाळापूर- २५,५२४

बार्शिटाकळी- १७,०११

मूर्तिजापूर- २०,०६३

पातूर- १७,१६५

तेल्हारा- २१,८४२

मनपा- ७,४७९

टॅग्स :examपरीक्षाStudentविद्यार्थीAkolaअकोलाScholarshipशिष्यवृत्ती