शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

१३९ घरांमध्ये पोहोचलेली सारकिन्हीची शाळा;  पालक झाले रचनावादी​​​​​​​

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 16:53 IST

सारकिन्हीची शाळा प्रयोगशील शिक्षणाचं माहेरघर ठरलं आहे. घराघरात चालणाऱ्या १३९ शाळा, रचनावादी झालेले पालक.

ठळक मुद्देस्वत:च अभ्यासाला बसणारे विद्यार्थी आणि सतत झटणारे शिक्षक हेच या शाळेचं भांडवल आहे. बह्मासिंग राठोड व त्यांच्या टीमने पालकांसोबत संवाद साधून शैक्षणिक साहित्य तयार करून मुलांचा शैक्षणिक दर्जा उंचावला.

- नितीन गव्हाळे

अकोला: सारकिन्ही हे बार्शीटाकळी तालुक्यातील छोटसं गाव. काटेपूर्णाच्या पायथ्याशी वसलेल्या गावात बहुसंख्य कष्टकरी शेतकरी, शेतमजूर. मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यायला पुरेसा वेळही नाही. आपल्या मुलांना बाहेरगावच्या कॉन्व्हेंट, खासगी शाळेत घालून मोकळे झाले की आपली जबाबदारी संपली ही भावना. अशा परिस्थितीत ब्रह्मसिंग राठोड नावाच्या ध्येयवेड्या शिक्षकाचा गावात प्रवेश झाला आणि शाळाच नाही तर अख्खं गाव बदलून गेलं. या शिक्षकाने १३९ घरांनाच शाळा बनवून टाकलं.सारकिन्हीची शाळा प्रयोगशील शिक्षणाचं माहेरघर ठरलं आहे. घराघरात चालणाऱ्या १३९ शाळा, रचनावादी झालेले पालक. सायंकाळी टीव्ही बंद करून स्वत:च अभ्यासाला बसणारे विद्यार्थी आणि सतत झटणारे शिक्षक हेच या शाळेचं भांडवल आहे. बह्मासिंग राठोड व त्यांच्या टीमने पालकांसोबत संवाद साधून शैक्षणिक साहित्य तयार करून मुलांचा शैक्षणिक दर्जा उंचावला. गावातून सहा आॅटोरिक्षांमध्ये बसून विद्यार्थी तालुक्याच्या ठिकाणी कॉन्व्हेंटमध्ये जायचे. जिल्हा परिषदेची शाळा म्हटली की, शिक्षणाचा दर्जा सुमारच असणार, हा विचार या शिक्षकांनी खोडून काढला. आता सहापैकी पाच आॅटोरिक्षा बंद झाले. कॉन्व्हेंटमध्ये जाणारी मुले जिल्हा परिषद शाळेकडे वळू लागली. शिक्षणाच्या दर्जाने पालक प्रभावित झाले. एवढेच नाही तर यावर्षीच कॉन्व्हेंटमधील परगावातील २१ विद्यार्थी सारकिन्हीतील शाळेत दाखल झाली. शिक्षण शाळेपुरते मर्यादित न ठेवता, शिक्षणाला घराघरात पोहोचण्याचे कार्य ब्रह्मासिंग राठोड व सहकाºयांनी केले. प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरी साहित्याचा संच देण्यात आला. त्यामुळे १३९ घराघरात शाळा सुरू झाली. त्या साहित्याद्वारे मुले स्वत:च शिकतात आणि पालकही त्यांना शिकवितात. अशाप्रकारे शाळा आणि समाज यांच्या संवाद सेतू तयार झाला आणि सारकिन्ही गाव घराघरांत शाळा असलेले महाराष्ट्रातील अभिनव ज्ञानरचनावादी गाव बनले.

पालक शाळेला धान्य भेट देतात...गावातील गरीब पालक शाळेला भरीव सहकार्य करतात. पैसे नसल्यास, धान्य शाळेला भेट देऊन शाळेच्या विकासात हातभार लावतातच. हे त्यांचे शाळेप्रती औदार्य नाही तर प्रेम आहे.चिमुकल्या मुलीने खाऊचे पैसे दिलेघरी पाहुणे म्हणून आलेल्या एका ८0 वर्षाच्या गृहस्थाने चिमुकल्या मुलीला खाऊ म्हणून पैसे दिले; परंतु या मुलीने मिळालेले खाऊचे पैसे शाळेला भेट देऊन टाकले. या पैशातून खाऊ खाऊन ती बलशाली होणार नाही; परंतु आपल्या गावातील विद्यार्थ्यांची पिढी बलशाली होईल, असा संदेशच तिने कृतीतून दिला.

 

टॅग्स :AkolaअकोलाdigitalडिजिटलSchoolशाळाBarshitakliबार्शिटाकळी