शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

१३९ घरांमध्ये पोहोचलेली सारकिन्हीची शाळा;  पालक झाले रचनावादी​​​​​​​

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 16:53 IST

सारकिन्हीची शाळा प्रयोगशील शिक्षणाचं माहेरघर ठरलं आहे. घराघरात चालणाऱ्या १३९ शाळा, रचनावादी झालेले पालक.

ठळक मुद्देस्वत:च अभ्यासाला बसणारे विद्यार्थी आणि सतत झटणारे शिक्षक हेच या शाळेचं भांडवल आहे. बह्मासिंग राठोड व त्यांच्या टीमने पालकांसोबत संवाद साधून शैक्षणिक साहित्य तयार करून मुलांचा शैक्षणिक दर्जा उंचावला.

- नितीन गव्हाळे

अकोला: सारकिन्ही हे बार्शीटाकळी तालुक्यातील छोटसं गाव. काटेपूर्णाच्या पायथ्याशी वसलेल्या गावात बहुसंख्य कष्टकरी शेतकरी, शेतमजूर. मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यायला पुरेसा वेळही नाही. आपल्या मुलांना बाहेरगावच्या कॉन्व्हेंट, खासगी शाळेत घालून मोकळे झाले की आपली जबाबदारी संपली ही भावना. अशा परिस्थितीत ब्रह्मसिंग राठोड नावाच्या ध्येयवेड्या शिक्षकाचा गावात प्रवेश झाला आणि शाळाच नाही तर अख्खं गाव बदलून गेलं. या शिक्षकाने १३९ घरांनाच शाळा बनवून टाकलं.सारकिन्हीची शाळा प्रयोगशील शिक्षणाचं माहेरघर ठरलं आहे. घराघरात चालणाऱ्या १३९ शाळा, रचनावादी झालेले पालक. सायंकाळी टीव्ही बंद करून स्वत:च अभ्यासाला बसणारे विद्यार्थी आणि सतत झटणारे शिक्षक हेच या शाळेचं भांडवल आहे. बह्मासिंग राठोड व त्यांच्या टीमने पालकांसोबत संवाद साधून शैक्षणिक साहित्य तयार करून मुलांचा शैक्षणिक दर्जा उंचावला. गावातून सहा आॅटोरिक्षांमध्ये बसून विद्यार्थी तालुक्याच्या ठिकाणी कॉन्व्हेंटमध्ये जायचे. जिल्हा परिषदेची शाळा म्हटली की, शिक्षणाचा दर्जा सुमारच असणार, हा विचार या शिक्षकांनी खोडून काढला. आता सहापैकी पाच आॅटोरिक्षा बंद झाले. कॉन्व्हेंटमध्ये जाणारी मुले जिल्हा परिषद शाळेकडे वळू लागली. शिक्षणाच्या दर्जाने पालक प्रभावित झाले. एवढेच नाही तर यावर्षीच कॉन्व्हेंटमधील परगावातील २१ विद्यार्थी सारकिन्हीतील शाळेत दाखल झाली. शिक्षण शाळेपुरते मर्यादित न ठेवता, शिक्षणाला घराघरात पोहोचण्याचे कार्य ब्रह्मासिंग राठोड व सहकाºयांनी केले. प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरी साहित्याचा संच देण्यात आला. त्यामुळे १३९ घराघरात शाळा सुरू झाली. त्या साहित्याद्वारे मुले स्वत:च शिकतात आणि पालकही त्यांना शिकवितात. अशाप्रकारे शाळा आणि समाज यांच्या संवाद सेतू तयार झाला आणि सारकिन्ही गाव घराघरांत शाळा असलेले महाराष्ट्रातील अभिनव ज्ञानरचनावादी गाव बनले.

पालक शाळेला धान्य भेट देतात...गावातील गरीब पालक शाळेला भरीव सहकार्य करतात. पैसे नसल्यास, धान्य शाळेला भेट देऊन शाळेच्या विकासात हातभार लावतातच. हे त्यांचे शाळेप्रती औदार्य नाही तर प्रेम आहे.चिमुकल्या मुलीने खाऊचे पैसे दिलेघरी पाहुणे म्हणून आलेल्या एका ८0 वर्षाच्या गृहस्थाने चिमुकल्या मुलीला खाऊ म्हणून पैसे दिले; परंतु या मुलीने मिळालेले खाऊचे पैसे शाळेला भेट देऊन टाकले. या पैशातून खाऊ खाऊन ती बलशाली होणार नाही; परंतु आपल्या गावातील विद्यार्थ्यांची पिढी बलशाली होईल, असा संदेशच तिने कृतीतून दिला.

 

टॅग्स :AkolaअकोलाdigitalडिजिटलSchoolशाळाBarshitakliबार्शिटाकळी