संग्राम प्रकल्पाची श्रेणी घसरली
By Admin | Updated: February 18, 2015 01:24 IST2015-02-18T01:24:15+5:302015-02-18T01:24:15+5:30
कामगिरी मूल्यांकनात अमरावती विभाग मागे.

संग्राम प्रकल्पाची श्रेणी घसरली
बुलडाणा : नागरिकांना तात्काळ सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी ग्रामपंचायतींचे कामकाज संगणकीकृत करण्यात येत आहे. त्यासाठी राज्य शासनाने ह्यसंग्राम सॉफ्टह्ण हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू केला आहे. शासनाच्या ग्रामविकास विभागाच्यावतीने याबाबत मूल्यांकन केले असता, अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये या प्रकल्पाची अंमलबाजावणीची मंद गतीने सुरू असल्याचे स्पष्ट झाले असून, त्याअनुषंगाने कामकाजात सुधारणा करण्यासाठी या जिल्ह्यांना फेब्रुवारी २0१५ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
शासनाकडून ग्रामविकासाच्या विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी ग्रामपंचायतस्तरावरून होत असते. शासनाच्या योजनांची अंमलबजावणी व सद्यस्थितीत सुरू असलेल्या कामांसह, जन्मनोंदणी, मृत्यू नोंदणी, रहिवासी दाखला, नोकरी, व्यवसायासाठी नाहरकत दाखला, मालमत्ता आकारणी प्रमाणपत्र, नादेय प्रमाणपत्र, बेरोजगार प्रमाणपत्र, वीज जोडणीचे नाहरकत प्रमाणपत्र, जॉबकार्ड, शौचालय दाखला, नळजोडणीसाठी परवानगी प्रमाणपत्र, चारित्र्याचा दाखला आदी महत्त्वूपर्ण दाखले नागरिकांना तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने ई-पंचायतअंतर्गत ह्यसंग्राम सॉफ्टह्ण ही आज्ञावली विकसित केली आहे. त्यासाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना संगणक पुरविण्यात आले आहेत. मानधनावर संगणक परिचालकही नियुक्ती करण्यात आले आहेत; मात्र ग्रामपंचायत प्रशासनाच्या वेळकाढू धोरणामुळे ह्यसंग्राम सॉफ्टह्ण आज्ञावलीचे १ ते २७ प्रकारचे लेखे ऑनलाइन करणे आणि जन्म-मृत्यू व विवाह नोंदणीची कामे मंदगतीने सुरू आहेत. नोव्हेंबर २0१४ मध्ये या जिल्ह्यांच्या कामगिरीचे मुल्यांकन करण्यात आले होते. त्यानुसार अमरावती विभागातील पाचही जिल्हे संग्राम सॉफ्टच्या अंमलबजावणीत पिछाडीवर असल्याचे स्पष्ट झाले. या जिल्ह्यांना कामगिरीत सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात आले असून, त्यासाठी फेब्रुवारी २0१५ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
*या आज्ञावलीच्या अंमलबजावणीत राज्यात वाशीम जिल्हा २९ व्या क्रमाकांवर आहे. अकोला जिल्हा २८, बुलडाणा २६, अमरावती २४ आणि यवतमाळ जिल्हा २३ व्या क्रमांकावर आहे. या जिल्ह्यांमध्ये प्रमाणित अभिलेखे संग्राम सॉफ्टमध्ये भरण्याची कारवाई अत्यंत मंदगतीने होत आहे. अमरावती विभागातील जिल्ह्यांतर्गत विवाहाच्या नोंदी अल्पप्रमाणात नोंदविल्या गेल्या.