शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

आरटीई : रिक्त जागांसाठी सोडतीची पालकांना प्रतीक्षा

By atul.jaiswal | Updated: May 27, 2019 14:32 IST

या जागा रिक्त जागांसाठी दुसरी सोडत कधी काढण्यात येते याकडे जिल्ह्यातील पालकांचे लक्ष लागलेले आहे.

अकोला: दुर्बल व वंचित घटकांसाठी राखीव असलेल्या ‘आरटीई’च्या २५ टक्के राखीव जागांवर पहिल्या सोडतीत निवड झालेल्या १८६५ विद्यार्थ्यांपैकी १३९0 विद्यार्थ्यांनी इंग्रजी व मराठी माध्यमांच्या राखीव जागांवर प्रवेश घेतला असून, ५१0 जागा उरल्या आहेत. या जागा रिक्त जागांसाठी दुसरी सोडत कधी काढण्यात येते याकडे जिल्ह्यातील पालकांचे लक्ष लागलेले आहे.जिल्ह्यातील दुर्बल व वंचित घटकांसाठी आरटीई नोंदणीकृत २0७ शाळांमध्ये एकूण २३७५ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या राखीव जागांसाठी ‘आरटीई’ अंतर्गत प्राथमिक शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांचे आॅनलाइन अर्ज मागविले होते. पालकांच्या मागणीनुसार अर्ज भरण्यासाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानुसार जिल्ह्यात दुर्बल व वंचित घटकांतील तब्बल ६ हजार ४१४ पालकांनी आपल्या पाल्यांचे अर्ज भरले होते. पहिल्या फेरीत १८६५ पाल्यांची इंग्रजी व मराठी शाळांमधील राखीव जागांसाठी निवड करण्यात आली. प्रवेशासाठी १० मेपर्यंत मुदत देण्यात आली होती. आता ही मुदत संपली असून, अजुनही ५१0 रिक्त आहेत. या जागा भरण्यासाठी सोडत कधी काढण्यात येणार, असा सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे. निवड झालेल्या १८६५ विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत १३९0 विद्यार्थ्यांचे जिल्ह्यातील व शहरातील नामांकित इंग्रजी व मराठी माध्यमांच्या शाळेत प्रवेश झाले आहेत. (प्रतिनिधी)

टॅग्स :AkolaअकोलाRight To Educationशिक्षण हक्क कायदाSchoolशाळाStudentविद्यार्थी