शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

अधिस्विकृती समिती मार्चमध्ये घेणार कृषी विद्यापीठांचा आढावा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 14:39 IST

अकोला: राज्यातील कृषी विद्यापीठाच्या शिक्षण,संशोधन व विस्तार कार्याचा दर्जा घसरल्याने भारतीय कृषी संशोधन (आयसीएआरअ‍ॅक्रीडेशन कमेटी)परिषदेच्या केंद्रीय अधिस्विकृती समितीने दोन वर्षासाठी कृषी विद्यापीठांचे मानांकन रद्द केले होते, आता येत्या मार्च महिन्यात ही समिती येणार असून,पुन्हा आढावा घेणार असल्याने कृषी विद्यापीठांनी जय्यत तयारी केली आहे.

ठळक मुद्देअकोल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी प्रचंड मागे पडले असून, पहिल्या दहा क्रमांकात राहणारे हे विद्यापीठ मानाकंनात ४८ व्या क्रमाकांवर पोहोचले होते ही अधिस्वीकृती हटवून कृषी विद्यापीठांना संशोधनासाठीचा निधी मिळावा, यासाठीचे प्रयत्न शासनाकरवी करण्यात आले होते.कृषी विद्यापीठांसह खासगी ‘ड’ वर्गातील कृषी महाविद्यालयांचा शिक्षणाचा दर्जा सुधारण्यात यश आल्याचा दावा कृषी विद्यापीठांकडून केला जात आहे.

- राजरत्न सिरसाट

अकोला: राज्यातील कृषी विद्यापीठाच्या शिक्षण,संशोधन व विस्तार कार्याचा दर्जा घसरल्याने भारतीय कृषी संशोधन (आयसीएआरअ‍ॅक्रीडेशन कमेटी)परिषदेच्या केंद्रीय अधिस्विकृती समितीने दोन वर्षासाठी कृषी विद्यापीठांचे मानांकन रद्द केले होते, आता येत्या मार्च महिन्यात ही समिती येणार असून,पुन्हा आढावा घेणार असल्याने कृषी विद्यापीठांनी जय्यत तयारी केली आहे. दरम्यान, मागचा अनुभव बघता यावेळी कृषी विद्यापीठाचा दर्जा सुधारल्याचा दावा करण्यात येत आहे.२०१४ पर्यंत राज्यात खासगी कृषी महाविद्यालयांची संख्या भरमसाठ वाढली; पण कृषी विद्यापीठांची संचालक, विभागप्रमुख, प्राध्यापक आदी अर्ध्याच्या वर पदे रिक्त होती. शासनाने पदेच न भरल्याने शिक्षण, संशोधन व कृषी विस्तार कार्याचा ताण हा अपूर्ण मनुष्यबळावर पडला. कृषी विद्यापीठाचे शासकीय महाविद्यालय तसेच खासगी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांची परीक्षा, उत्तरपत्रिका तपासणी आदी अतिरिक्त कामे करावी लागत असल्याने शैक्षणिक गुणवत्ता ढासळली, संशोधनावरही परिणाम झाले. आयसीएआरच्या अधिस्वीकृती समितीला मागच्या दोनवर्षापुर्वी हे सर्व ठळकपणे दिसले. अकोल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी प्रचंड मागे पडले असून, पहिल्या दहा क्रमांकात राहणारे हे विद्यापीठ मानाकंनात ४८ व्या क्रमाकांवर पोहोचले होते.म्हणूनच आयसीआरने या कृषी विद्यापीठांची अधिस्वीकृती रद्द केली होती. त्याचे चांगलेच पडसाद उमटले होते. ही अधिस्वीकृती हटवून कृषी विद्यापीठांना संशोधनासाठीचा निधी मिळावा, यासाठीचे प्रयत्न शासनाकरवी करण्यात आले होते. त्याला काही प्रमाणात यशही आले. त्यांनतर राज्यातील कृषी विद्यापीठांची संचालक,अधिष्ठाता,सहयोगी अधिष्ठाता व प्राध्यापकांची रिक्तेपदे भरण्यात आली असून, ३५० प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक म्हणून करीअर अ‍ॅडव्हान्स स्कीम अंतर्गत बढती देण्यात आली.१५० पदे बढती व थेट भरतीव्दारे भरण्यात आली असून,कृषी विद्यापीठांसह खासगी ‘ड’ वर्गातील कृषी महाविद्यालयांचा शिक्षणाचा दर्जा सुधारण्यात यश आल्याचा दावा कृषी विद्यापीठांकडून केला जात आहे.कृषी विद्यापीठांच्या रिक्त जागा भरण्यात आल्या असून, शिक्षण,संशोधन व विस्तार कार्याचा दर्जा सुधारला आहे. येत्या मार्च महिन्यात अधिस्विकृती येणार आहे.त्यांच्यापुढे सविस्तर माहिती मांडण्यात येणार आहे.- डॉ. राम खर्चे ,उपाध्यक्ष,महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषद,पुणे.

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ