शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
3
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
4
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
5
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

ग्रामविकास अधिका-यानेच केली स्वच्छता, सफाई कामगार स्वच्छता करीत नसल्याचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 5:07 PM

स्थनिक ग्रामपंचायतच्या दुर्लक्षामुळे अनेक वार्डात अस्वच्छता निर्माण झाली आहे. यासंदर्भात महिलांनी ग्रामपंचायतकडे समस्या मांडताच नवनियुक्त ग्रामविकास अधिकारी अशोक बुरकुल यांनी हातात फावडे व टोपले घेऊन स्वत:च सफाई  करण्याचा अभिनव उपक्रम राबविला.

डोणगांव : स्थनिक ग्रामपंचायतच्या दुर्लक्षामुळे अनेक वार्डात अस्वच्छता निर्माण झाली आहे. यासंदर्भात महिलांनी ग्रामपंचायतकडे समस्या मांडताच नवनियुक्त ग्रामविकास अधिकारी अशोक बुरकुल यांनी हातात फावडे व टोपले घेऊन स्वत:च सफाई  करण्याचा अभिनव उपक्रम राबविला. याठिकाणी सफाई कामगारही वेळेवर आले नाही; परंतू त्यांची वाट न बघता ग्रामविकास अधिका-यांनी केलेल्या या स्वच्छतेच्या उपक्रमामुळे ग्रामपंचायतचे चित्र बदलले आहे.   महाराष्ट्र शासन जनतेच्या आरोग्यासाठी स्वच्छतेसाठी करोडो रुपये खर्चून स्वच्छता अभियान राबवित असतानाच डोणगांवमध्ये ग्रामपंचायतच्या दुर्लक्षितपणामुळे प्रत्येक वार्डात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. महिलांनी ग्रामपंचायत गाठून समस्या मांडताच नवनियुक्त ग्रामविकास अधिकारी अशोक बुरकुल यांनी ग्रामपंचायतचे उपसरपंच जुबेरखान, सदस्य साबीरभाई, कासम बागवान यांच्यासह आठवडी बाजार वार्ड नं.सहा ची पाहणी केली. त्यावेळेस त्यांना अस्वच्छता आढळून आली. यावर ग्रामविकास अधिका-यांनी ग्रामपंचायतचे कर्मचारी व कचरा गाडी बोलावून घेतली सफाई कामगार न आल्याने जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी स्वत: ग्रामविकास अधिकारी अशोक बुरकुल यांनी हातात फावडे व टोपले घेऊन स्वत:च सफाई कामगारांची भूमिका बजावली. ग्रामविकास अधिकाºयांनी रस्त्यावरील घाण उचलून गाडीत टाकल्याने ग्रामपंचायत कर्मचारी प्रदीप परमाळे, जीवन खडसे, श्याम खोटे, सचिन पहाडे सह कासम बागवान यांनीही ग्रामविकास अधिका-यास सहाय्य केले.  त्यानंतर कोणीही रस्त्यावर घाण टाकू नका व स्वच्छता अभियानास सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी गावक-यांना केले. आठवडी बाजारात रस्त्यावर बसून अनेक व्यापा-यांनी अतिक्रमण केल्याने अडथळा निर्माण झाल्याची बाब लक्षात येताच त्यांनी स्वत: कर्मचा-यासह जाऊन अडथळ्याचे अतिक्रमण काढून रस्त्यावर दुकाने थाटल्यास कारवाई केल्या जाईल, अशी सुचनाही रस्त्यावर बसणा-यांना केल्या. त्यामुळे अचानक मरगळ आलेल्या ग्रामपंचायतला ग्रामविकास अधिकाºयाने केलेल्या कामामुळे हुरुप आल्याचे दिसून येत आहे.

अन्यथा सफाई कामगारांवर कारवाईडोणगाव आठवडी बाजार व प्रत्येक वार्डात सफाई कामगाराच्या दुर्लक्षामुळे अस्वच्छता निर्माण झाल्याने आपण सफाई कामगारांना नोटीस दिल्या असून दोन दिवसात सफाई कामगारांनी सफाई न केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करणार असल्याचे ग्रामसेवक बुरकुल यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :Akolaअकोला