शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

सवर्ण आरक्षणामुळे शिक्षक भरतीवर होणार परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 15:48 IST

अकोला : केंद्र शासनाने सवर्णांना दहा टक्के आरक्षणाचा निर्णय घेतला. त्यामुळे शाळांना पुन्हा एकदा नव्याने बिंदूनामावली तयार करावी लागत असून, त्याचा थेट परिणाम शिक्षक भरतीवर दिसून येणार आहे.

ठळक मुद्दे२२ जानेवारीला निघणार होती शिक्षक पदभरतीची जाहिरात.सवर्णांना दहा टक्के आरक्षण देण्याचा केंद्र शासनाचा निर्णय.शाळांना पुन्हा एकदा नव्याने बिंदूनामावली तयार करावी लागणार.

अकोला : पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील रिक्त पदे भरण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्या अनुषंगाने शिक्षण विभागाकडून २२ जानेवारी रोजी पदभरतीची जाहिरात काढण्याचे प्रस्तावित होते; मात्र अशातच केंद्र शासनाने सवर्णांना दहा टक्के आरक्षणाचा निर्णय घेतला. त्यामुळे शाळांना पुन्हा एकदा नव्याने बिंदूनामावली तयार करावी लागत असून, त्याचा थेट परिणाम शिक्षक भरतीवर दिसून येणार आहे.राज्यातील शिक्षकांचे समायोजन पूर्ण झाल्यामुळे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती करण्याचा निर्णय शासनाने घेतला. मराठा आरक्षणामुळे १७ जानेवारीपर्यंत नव्याने बिंदूनामावली तयार करून माहिती भरण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शाळांनी माहिती सादर केली होती. रिक्त पदांची संपूर्ण माहिती मिळाल्याने राज्य शासनातर्फे २२ जानेवारीला शिक्षक भरतीची जाहिरात काढण्याचे नियोजित होते. या निर्णयामुळे राज्यभरातील शिक्षक उमेदवारांमध्ये उत्सुकता वाढली होती; परंतु केंद्र शासनाने सवर्णांसाठी दहा टक्के आरक्षणाची घोषणा केली. दोन्ही सदनात विधेयक मंजूर झाल्याने दहा टक्के सवर्णांना आरक्षण लागू होणार आहे. या नवीन कायद्यानुसार राज्यातील सर्वच शाळांना बिंदूनामावलीमध्ये जागांचा समावेश करावा लागणार आहे. या धोरणामुळे शिक्षक भरती रखडणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. रिक्त पदांमुळे शाळांवर शिकवायला शिक्षकच नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. शाळांची पटसंख्याही गत आठ वर्षांपासून घसरत गेली आहे. राज्यभरात शिक्षकांच्या हजारो जागा रिक्त असताना शिक्षक भरतीवर संकट येत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.आठ वर्षांपासून शिक्षक भरतीच नाहीमागील आठ वर्षांपासून शिक्षक भरतीच झाली नाही. त्यामुळे डी.एड्., बी.एड्., बेरोजगार नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. राज्यभरात भरतीच न झाल्याने शिक्षकांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांप्रमाणे संस्थांमध्येही हीच स्थिती आहे.

सवर्ण आरक्षणानुसार बिंदूनामावलीबाबत अद्याप कुठलेही आदेश मिळाले नाही. मराठा आरक्षणानंतर बिंदूनामावलीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, पवित्र पोर्टलवर टाकण्यात येत आहे. त्यामुळे शासनाच्या सूचनांनंतरच स्पष्ट चित्र समजेल.- प्रकाश मुकुंद,शिक्षणाधिकारी, माध्यमिक,अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाTeacherशिक्षकreservationआरक्षण