पावसाच्या खंडाचा दशकातील विक्रम!
By Admin | Updated: July 17, 2015 01:58 IST2015-07-17T01:58:55+5:302015-07-17T01:58:55+5:30
हवामान बदलाचे परिणाम.

पावसाच्या खंडाचा दशकातील विक्रम!
- संतोष वानखडे, वाशिम
राज्यात बालकांचे अपहरण होण्याच्या घटनांमध्ये वर्षागणिक वाढ होत असल्याचे महाराष्ट्र शासनाच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या आकडेवारीवरून दिसून येते. २०१२मध्ये बालकांच्या अपहरणाचा आकडा ८९७ होता, २०१४मध्ये तो वाढून २११२वर पोहोचला आहे.
० ते १४ वर्षे वयोगटातील बालकांच्या अपहरणाच्या २०१२ साली राज्यात एकूण ८९३ घटनांची नोंद गुन्हे अन्वेषण विभागाच्या दप्तरी आहे. २०१३ साली १६९८, तर २०१४ साली तब्बल २११२ बालकांचे अपहरण झाले. या बालकांचा शोध घेण्याचे आव्हान पोलीस विभागासमोर उभे ठाकले आहे. या आव्हानातूनच राज्यात ‘आॅपरेशन मुस्कान अभियान’ जुलैपासून सुरू झाले आहे. या अभियानांतर्गत हरविलेल्या मुला-मुलींचा शोध घेतला जात आहे.
महिलांचा प्रश्नही गंभीर
राज्यात महिलांच्या अपहरणाचा आकडाही वाढत आहे. २०१२मध्ये राज्यात ११४० महिलांच्या अपहरणाच्या घटनांची नोंद आहे. २०१३मध्ये १८७४ आणि २०१४मध्ये १९०९ घटनांची नोंद गुन्हे अन्वेषण विभागाच्या दप्तरी आहे.