शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह आणि एकनाथ शिंदेंमध्ये ५० मिनिटे बैठक; रवींद्र चव्हाणांबाबत तक्रारीचा सूर, काय घडलं?
2
"एका मिनिटात खटला संपला, ठाकरेंच्या वकिलांनी कोर्टात महत्त्वाचे मुद्दे मांडलेच नाही"; पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा
3
रशियाचं भारतप्रेम वाढलं! कच्चं तेल-गॅसनंतर आता दिली 'ही' मोठी ऑफर; अमेरिकेला लागणार झटका?
4
Ashish Shelar:... तर मुंबईत अजित पवार गटाशी युती करणार नाही, आशिष शेलार यांचा इशारा!
5
नेपाळमध्ये पुन्हा भडकलं Gen Z आंदोलन, युवक रस्त्यावर उतरले; कर्फ्यू लागू, एअरपोर्ट सेवा बंद
6
Mumbai: जोडीदाराकडून आत्महत्येची वारंवार धमकी ही क्रूरताच: मुंबई उच्च न्यायालय
7
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात; Nifty २६,१०० च्या जवळ, मेटल-ऑटो शेअर्समध्ये खरेदी
8
SBI मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४१,८२६ चं फिक्स व्याज; परताव्याची गॅरंटी
9
लाल किल्ल्यापासून काश्मीरपर्यंत घुसून मारू; हल्ल्यात पाकिस्तान सहभागी असल्याची PoKची कबुली
10
आजचे राशीभविष्य - २० नोव्हेंबर २०२५, 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आज लाभदायी दिवस, शेअर-सट्टा ह्यात धनलाभ होईल
11
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
12
Dombivli: डोंबिवलीत भाजप मजबूत, मनसेच्या माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेने टाकले जाळे!
13
Ulhasnagar: पक्षांतर करणाऱ्यांच्या फोटोला आधी फासले काळे; नंतर सन्मानाने स्थान!
14
India- Israel: भारत-इस्रायलचे संबंध आणखी होणार वृद्धिंगत!
15
Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात सात नक्षलवाद्यांचा खात्मा, ५० जणांना अटक; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
16
Palghar: पालघरमध्ये शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून मुलं लपली जंगलात, मग पुढं काय घडलं?
17
SC: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे का ढकलत नाहीत? न्यायालयाकडून राज्य सरकारला जाब
18
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
19
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
20
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
Daily Top 2Weekly Top 5

राजनापूर खिनखिनीची पाणीदार गावाकडे वाटचाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:15 IST

मूर्तिजापूर : भारतीय जैन संघटनेच्या वतीने तालुक्यात गतवर्षीपासून जलसंधारणाची विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यातील तालुक्यातील राजनापूर खिनखिनी ...

मूर्तिजापूर : भारतीय जैन संघटनेच्या वतीने तालुक्यात गतवर्षीपासून जलसंधारणाची विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यातील तालुक्यातील राजनापूर खिनखिनी गावात नाला रुंदीकरणाचे काम सुरू असून, जलसंधारणाचे काम भविष्यात शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. याकामी जिल्ह्यात जेसीबी मशीन अविरत काम करीत आहेत.

जलसंधारणाच्या कामामुळे या गावची पाणीदार गावाकडे वाटचाल सुरू आहे.

भारतीय जैन संघटना ही एक सामाजिक संघटना आहे. आपत्ती व्यवस्थापन व इतर कोणत्याही नैसर्गिक आपत्तीसमयी सर्वात प्रथम मदतीला धावून येते. बीजेएसचे संस्थापक शांतिलाल मुथा यांच्या नि:स्वार्थ मार्गदर्शनाखाली बीजेएसचा चमू संपूर्ण भारतातील सामाजिक जाणिवेतून आपली जबाबदारी पार पाडत आहे. लाॅकडाऊन काळातही सर्व नियमांचे पालन करून अकोला जिल्ह्यात जलसंधारणाची कामे धडाक्याने सुरू आहेत. ‘सुजलाम् सुफलाम्’ अकोला प्रकल्पांतर्गत अकोला जिल्ह्यात भारतीय जैन संघटनेमार्फत ग्रामपंचायत स्तरावर विविध जलसंधारणाची कामे करण्याकरिता ग्रामपंचायत जलसंधारण मॉडेलअंतर्गत जेसीबी मशीन गावकऱ्यांना मोफत उपलब्ध करून दिली आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हाधिकारी, जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पंचायत समिती बीडीओ, सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक यांचे सहकार्य या कामात मिळत आहे. सद्य:स्थितीत तालुक्यातील पालकमंत्री बच्चू कडू यांनी दत्तक घेतलेल्या राजनापूर खिनखिनी येथे नाला रुंदीकरणाचे काम युद्धस्तरावर सुरू आहे.

फोटो:

४० ग्रामपंचायत अंतर्गत जलसंधारणाची कामे

या माध्यमातून जिल्ह्यातील आतापर्यंत जवळपास ४० ग्रामपंचायतींमध्ये शेततळे, नाला खोलीकरण, जलशोषक पाणंद रस्ते, तलावातील गाळ काढणे अशी विविध जलसंधारणाची कामे करण्यात आली. उपसलेला गाळ शेतकरी आपल्या शेतात नेऊन टाकत असल्याने शेतकऱ्यांचाही जमिनीची पोत राखण्यास मदत झाली.

तीन लाख घनमीटर गाळ व मातीचा उपसा

अकोला जिल्ह्यात आतापर्यंत तीन लाखांच्या वर घनमीटर गाळ आणि मातीचा उपसा करण्यात आला आहे. शेततळ्याच्या माध्यमातून अतिरिक्त पाणी साठवण क्षमता निर्माण झाली आहे. जिल्ह्यात सगळ्यात मोठे काम मूर्तिजापूर तालुक्यात झालेले आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यासाठी दहा जेसीबी मशीन उपलब्ध असून, आठ मशीन अविरत कामात गुंतल्या आहेत. तालुक्यातील किनी फणी येथेही मोठ्या प्रमाणात कामे करण्यात आली आहेत, तर मधापुरी गावात शेततळ्यांची मोठ्या प्रमाणात निर्मिती करण्यात आली असून, येथील शेततळे मॉडेल ठरले आहे. शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेले हे तळे आता पाण्याने तुडुंब भरले असते तर तालुक्यात खापरावाडा, माना, मधापुरी, जितापूर (खेडकर), कंझरा, राजनापूर खिनखिनी येथेसुद्धा पालकमंत्री जलशोषण निर्मित पाणंद रस्ते यासारखी कामे करण्यात आली आहेत.

पिकाचे नुकसानही होणार नाही, भूजल पातळीही वाढेल

भारतीय जैन संघटनेच्या तत्त्वानुसार ‘मशीन आमची, डिझेल तुमचे’ शेतकऱ्यांच्या शेतावरचे बांध दुरुस्ती, नाला दुरुस्ती ही सर्व कामे अवघ्या अर्ध्या खर्चाच्या आतच झाली असून, शेतकऱ्यांचा आर्थिक भुर्दंड ५० टक्क्याने कमी झाला आहे. याच पद्धतीने नाल्याचे खोलीकरण सुरू असून, आतापर्यंत चार किलोमीटर काम पूर्णत्वास गेले आहे. यामुळे भविष्यात पावसाचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये शिरणार नसल्याने पिकांचे नुकसानही होणार नाही व भूजलपातळी खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

..यांची मोलाची मदत

या प्रकल्पाचे प्रकल्प प्रमुख तथा जिल्हा समन्वयक प्रा. सुभाष गादिया, व्यवस्थापक नितीन राजवैद्य यांच्यासह तालुकाध्यक्ष डॉ. सुजित बन्नोरे, तालुका सचिव नीलेश महाजन यांची या कामासाठी मोठी मदत झाली. परंतु पावसाळा तोंडावर असल्याने केवळ १० जूनपर्यंत कामे करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

‘डिझेल तुमचे, मशीन आमची’

‘डिझेल तुमचे, मशीन आमची’ या तत्त्वावर जलसंधारणाची कामे चालू आहेत. त्यासाठी संबंधित ग्रामपंचायतने ग्रामसभेत कामाचा ठराव मंजूर करून बीजेएसच्या जिल्हाध्यक्षाकडे तशी मागणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर जलसंधारणाच्या कामांना सुरुवात करण्यात येते.

-डॉ. सुजित बन्नोरे

तालुका अध्यक्ष, भारतीय जैन संघटना

गावात जलसंधारणाची कामे करण्यात आल्याने यातून शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल व गावातील भूजल पातळी वाढण्यास मदत होईल. पालकमंत्री बच्चू कडू व बीजेएस यांच्या माध्यमातून गाव पाणीदार करण्याचा मानस आहे. त्यासाठी आमचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

- प्रगती रुपेश कडू

सरपंच, राजनापूर खिनखिनी

माझ्या शेतात सातत्याने नाल्याच्या पुराचे पाणी शिरून पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असे. नाल्याचे २२ फूट खोलीकरण करण्यात आल्याने आता पिकांचे नुकसान हाेण्याचा धोका नाही. या कामामुळे नाल्या काठच्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

-सनी देशमुख,

शेतकरी राजनापूर खिनखिनी