शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

राजनापूर खिनखिनीची पाणीदार गावाकडे वाटचाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:15 IST

मूर्तिजापूर : भारतीय जैन संघटनेच्या वतीने तालुक्यात गतवर्षीपासून जलसंधारणाची विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यातील तालुक्यातील राजनापूर खिनखिनी ...

मूर्तिजापूर : भारतीय जैन संघटनेच्या वतीने तालुक्यात गतवर्षीपासून जलसंधारणाची विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यातील तालुक्यातील राजनापूर खिनखिनी गावात नाला रुंदीकरणाचे काम सुरू असून, जलसंधारणाचे काम भविष्यात शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. याकामी जिल्ह्यात जेसीबी मशीन अविरत काम करीत आहेत.

जलसंधारणाच्या कामामुळे या गावची पाणीदार गावाकडे वाटचाल सुरू आहे.

भारतीय जैन संघटना ही एक सामाजिक संघटना आहे. आपत्ती व्यवस्थापन व इतर कोणत्याही नैसर्गिक आपत्तीसमयी सर्वात प्रथम मदतीला धावून येते. बीजेएसचे संस्थापक शांतिलाल मुथा यांच्या नि:स्वार्थ मार्गदर्शनाखाली बीजेएसचा चमू संपूर्ण भारतातील सामाजिक जाणिवेतून आपली जबाबदारी पार पाडत आहे. लाॅकडाऊन काळातही सर्व नियमांचे पालन करून अकोला जिल्ह्यात जलसंधारणाची कामे धडाक्याने सुरू आहेत. ‘सुजलाम् सुफलाम्’ अकोला प्रकल्पांतर्गत अकोला जिल्ह्यात भारतीय जैन संघटनेमार्फत ग्रामपंचायत स्तरावर विविध जलसंधारणाची कामे करण्याकरिता ग्रामपंचायत जलसंधारण मॉडेलअंतर्गत जेसीबी मशीन गावकऱ्यांना मोफत उपलब्ध करून दिली आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हाधिकारी, जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पंचायत समिती बीडीओ, सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक यांचे सहकार्य या कामात मिळत आहे. सद्य:स्थितीत तालुक्यातील पालकमंत्री बच्चू कडू यांनी दत्तक घेतलेल्या राजनापूर खिनखिनी येथे नाला रुंदीकरणाचे काम युद्धस्तरावर सुरू आहे.

फोटो:

४० ग्रामपंचायत अंतर्गत जलसंधारणाची कामे

या माध्यमातून जिल्ह्यातील आतापर्यंत जवळपास ४० ग्रामपंचायतींमध्ये शेततळे, नाला खोलीकरण, जलशोषक पाणंद रस्ते, तलावातील गाळ काढणे अशी विविध जलसंधारणाची कामे करण्यात आली. उपसलेला गाळ शेतकरी आपल्या शेतात नेऊन टाकत असल्याने शेतकऱ्यांचाही जमिनीची पोत राखण्यास मदत झाली.

तीन लाख घनमीटर गाळ व मातीचा उपसा

अकोला जिल्ह्यात आतापर्यंत तीन लाखांच्या वर घनमीटर गाळ आणि मातीचा उपसा करण्यात आला आहे. शेततळ्याच्या माध्यमातून अतिरिक्त पाणी साठवण क्षमता निर्माण झाली आहे. जिल्ह्यात सगळ्यात मोठे काम मूर्तिजापूर तालुक्यात झालेले आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यासाठी दहा जेसीबी मशीन उपलब्ध असून, आठ मशीन अविरत कामात गुंतल्या आहेत. तालुक्यातील किनी फणी येथेही मोठ्या प्रमाणात कामे करण्यात आली आहेत, तर मधापुरी गावात शेततळ्यांची मोठ्या प्रमाणात निर्मिती करण्यात आली असून, येथील शेततळे मॉडेल ठरले आहे. शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेले हे तळे आता पाण्याने तुडुंब भरले असते तर तालुक्यात खापरावाडा, माना, मधापुरी, जितापूर (खेडकर), कंझरा, राजनापूर खिनखिनी येथेसुद्धा पालकमंत्री जलशोषण निर्मित पाणंद रस्ते यासारखी कामे करण्यात आली आहेत.

पिकाचे नुकसानही होणार नाही, भूजल पातळीही वाढेल

भारतीय जैन संघटनेच्या तत्त्वानुसार ‘मशीन आमची, डिझेल तुमचे’ शेतकऱ्यांच्या शेतावरचे बांध दुरुस्ती, नाला दुरुस्ती ही सर्व कामे अवघ्या अर्ध्या खर्चाच्या आतच झाली असून, शेतकऱ्यांचा आर्थिक भुर्दंड ५० टक्क्याने कमी झाला आहे. याच पद्धतीने नाल्याचे खोलीकरण सुरू असून, आतापर्यंत चार किलोमीटर काम पूर्णत्वास गेले आहे. यामुळे भविष्यात पावसाचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये शिरणार नसल्याने पिकांचे नुकसानही होणार नाही व भूजलपातळी खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

..यांची मोलाची मदत

या प्रकल्पाचे प्रकल्प प्रमुख तथा जिल्हा समन्वयक प्रा. सुभाष गादिया, व्यवस्थापक नितीन राजवैद्य यांच्यासह तालुकाध्यक्ष डॉ. सुजित बन्नोरे, तालुका सचिव नीलेश महाजन यांची या कामासाठी मोठी मदत झाली. परंतु पावसाळा तोंडावर असल्याने केवळ १० जूनपर्यंत कामे करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

‘डिझेल तुमचे, मशीन आमची’

‘डिझेल तुमचे, मशीन आमची’ या तत्त्वावर जलसंधारणाची कामे चालू आहेत. त्यासाठी संबंधित ग्रामपंचायतने ग्रामसभेत कामाचा ठराव मंजूर करून बीजेएसच्या जिल्हाध्यक्षाकडे तशी मागणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर जलसंधारणाच्या कामांना सुरुवात करण्यात येते.

-डॉ. सुजित बन्नोरे

तालुका अध्यक्ष, भारतीय जैन संघटना

गावात जलसंधारणाची कामे करण्यात आल्याने यातून शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल व गावातील भूजल पातळी वाढण्यास मदत होईल. पालकमंत्री बच्चू कडू व बीजेएस यांच्या माध्यमातून गाव पाणीदार करण्याचा मानस आहे. त्यासाठी आमचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

- प्रगती रुपेश कडू

सरपंच, राजनापूर खिनखिनी

माझ्या शेतात सातत्याने नाल्याच्या पुराचे पाणी शिरून पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असे. नाल्याचे २२ फूट खोलीकरण करण्यात आल्याने आता पिकांचे नुकसान हाेण्याचा धोका नाही. या कामामुळे नाल्या काठच्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

-सनी देशमुख,

शेतकरी राजनापूर खिनखिनी