शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

परतीचा पाऊस लांबला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 12:39 IST

येत्या ३ आॅक्टोबरपर्यंत जिल्ह्यात तुरळक स्वरू पाचा पाऊस होण्याचीही शक्यता वर्तविली आहे.

अकोला : परतीच्या पावसाचा मुक्काम लांबल्याचा अंदाज वर्तविण्यात येत असला तरी साधारणत: ३० सप्टेंबरपर्यंत ईशान्य पाऊस आपल्याकडे पडतो. त्यामुळे येत्या ३ आॅक्टोबरनंतर परतीच्या पावसाचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता कृषी हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे.महाराष्टÑातील मराठवाडा, पश्चिम विदर्भातील एक-दोन जिल्हे सोडल्यास सर्वत्र दमदार पावसाने हजेरी लावली. वर्तमान स्थितीत उत्तर भारतात पावसाने थैमान घातले आहे. राज्यात सध्या पडणाऱ्या पावसासोबत विजांचा कडकडाट होत असल्याने हा परतीचा पाऊस असावा, असा नागरिकांचा समज आहे; परंतु हा पोष्ट मान्सून असून, ३० सप्टेंबर या स्वरू पाचा पाऊस होत असतो. त्यामुळे परतीच्या पावसाचे चित्र स्पष्ट होण्यासाठी सर्वांनाच ३ आॅक्टोबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार असल्याची माहिती पुण्याचे ज्येष्ठ कृषी हवामान शास्त्रज्ञ डॉ. आर. एन. साबळे यांनी दिली.दरम्यान, गत चोवीस तासांत रविवार, २९ सप्टेंबर रोजी सकाळी ८.३० वाजतापर्यंत विदर्भात गोंदिया येथे सर्वाधिक ७८ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. अकोला येथे २५.२ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली असून, अमरावती येथे ३.८ मि.मी. तर नागपूर येथे ९ मि.मी. पाऊस पडला. अकोला जिल्ह्यात सोमवार, ३० सप्टेंबर रोजी बºयापैकी पाऊस पडण्याचा अंदाज नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तविला असून, येत्या ३ आॅक्टोबरपर्यंत जिल्ह्यात तुरळक स्वरू पाचा पाऊस होण्याचीही शक्यता वर्तविली आहे.

पाऊस थांबला तरच कापूस हाती येणार!विदर्भात कपाशी पिकाचे क्षेत्र यावर्षी वाढले आहे; पण सतत पाऊस सुरू असल्याने पिके हातची जाण्याची शक्यता असून, सततच्या पावसामुळे कापसाची बोंडे काळवंडल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. राज्यात यावर्षी ४१ लाख ९० हेक्टरवर कपाशी असून, विदर्भात १७ लाख हेक्टरवर शेतकºयांनी पेरणी केली आहे; परंतु यावर्षी सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून सतत पाऊस सुरू असल्याने शेतकºयांना शेतीचे व्यवस्थापन करण्यास पाऊस वेळच देत नसल्याने तण आणि कि डींचा प्रादुर्भाव वाढला आहे. वातावरणात आर्द्रता असून, शेतात पाणी साचल्याने प्रचंड ओल आहे. परिणामी, कपाशीच्या मुळांना सूर्यप्रकाश व अन्नद्रव्य पोहोचत नसल्याने कपाशीची मुळे सडण्याचे प्रकार घडत आहेत. शेतातून पाण्याचा निचरा होत नसून, अनेक ठिकाणी झाडाच्या पात्या गळाल्या आहेत.

कापूस धरलेली बोंडे काळवंडताना दिसत आहेत. यावर्षी पावसाला उशिरा सुरुवात झाली.त्यानंतर चार आठवड्यांचा खंड पडला. परंतु सप्टेंबर महिन्यात सतत पाऊस सुरू असून, सर्वच पिकांना त्याची झळ बसली आहे. सोयाबीनची तर अनेक ठिकाणी पाने गळाली असून, शेंगाही गळण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे कपाशी आणि सोयाबीन पीक हातचे जाण्याची शक्यता वाढल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे.वातावरणात आर्द्रता असून, जमिनीत ओल आहे. सूर्यप्रकाशाचे तास कमी पडत आहेत. मुळांना अन्नद्रव्य पोहोचत नसल्याने कपाशी झाडाच्या खालची बोंडे काळी पडत आहेत. काही ठिकाणी कपाशीची पाने गळून पडत असल्याच्या शेतकºयांच्या तक्रारी आहेत. शेतकºयांनी यावर शिफारशीनुसार उपाययोजना करावी.- डॉ. मोहनराव खाकरे,ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ तथा माजी विद्यावेत्ता, डॉ. पंदेकृवि.

टॅग्स :AkolaअकोलाRainपाऊस