शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

परतीचा पाऊस लांबला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 12:39 IST

येत्या ३ आॅक्टोबरपर्यंत जिल्ह्यात तुरळक स्वरू पाचा पाऊस होण्याचीही शक्यता वर्तविली आहे.

अकोला : परतीच्या पावसाचा मुक्काम लांबल्याचा अंदाज वर्तविण्यात येत असला तरी साधारणत: ३० सप्टेंबरपर्यंत ईशान्य पाऊस आपल्याकडे पडतो. त्यामुळे येत्या ३ आॅक्टोबरनंतर परतीच्या पावसाचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता कृषी हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे.महाराष्टÑातील मराठवाडा, पश्चिम विदर्भातील एक-दोन जिल्हे सोडल्यास सर्वत्र दमदार पावसाने हजेरी लावली. वर्तमान स्थितीत उत्तर भारतात पावसाने थैमान घातले आहे. राज्यात सध्या पडणाऱ्या पावसासोबत विजांचा कडकडाट होत असल्याने हा परतीचा पाऊस असावा, असा नागरिकांचा समज आहे; परंतु हा पोष्ट मान्सून असून, ३० सप्टेंबर या स्वरू पाचा पाऊस होत असतो. त्यामुळे परतीच्या पावसाचे चित्र स्पष्ट होण्यासाठी सर्वांनाच ३ आॅक्टोबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार असल्याची माहिती पुण्याचे ज्येष्ठ कृषी हवामान शास्त्रज्ञ डॉ. आर. एन. साबळे यांनी दिली.दरम्यान, गत चोवीस तासांत रविवार, २९ सप्टेंबर रोजी सकाळी ८.३० वाजतापर्यंत विदर्भात गोंदिया येथे सर्वाधिक ७८ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. अकोला येथे २५.२ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली असून, अमरावती येथे ३.८ मि.मी. तर नागपूर येथे ९ मि.मी. पाऊस पडला. अकोला जिल्ह्यात सोमवार, ३० सप्टेंबर रोजी बºयापैकी पाऊस पडण्याचा अंदाज नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तविला असून, येत्या ३ आॅक्टोबरपर्यंत जिल्ह्यात तुरळक स्वरू पाचा पाऊस होण्याचीही शक्यता वर्तविली आहे.

पाऊस थांबला तरच कापूस हाती येणार!विदर्भात कपाशी पिकाचे क्षेत्र यावर्षी वाढले आहे; पण सतत पाऊस सुरू असल्याने पिके हातची जाण्याची शक्यता असून, सततच्या पावसामुळे कापसाची बोंडे काळवंडल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. राज्यात यावर्षी ४१ लाख ९० हेक्टरवर कपाशी असून, विदर्भात १७ लाख हेक्टरवर शेतकºयांनी पेरणी केली आहे; परंतु यावर्षी सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून सतत पाऊस सुरू असल्याने शेतकºयांना शेतीचे व्यवस्थापन करण्यास पाऊस वेळच देत नसल्याने तण आणि कि डींचा प्रादुर्भाव वाढला आहे. वातावरणात आर्द्रता असून, शेतात पाणी साचल्याने प्रचंड ओल आहे. परिणामी, कपाशीच्या मुळांना सूर्यप्रकाश व अन्नद्रव्य पोहोचत नसल्याने कपाशीची मुळे सडण्याचे प्रकार घडत आहेत. शेतातून पाण्याचा निचरा होत नसून, अनेक ठिकाणी झाडाच्या पात्या गळाल्या आहेत.

कापूस धरलेली बोंडे काळवंडताना दिसत आहेत. यावर्षी पावसाला उशिरा सुरुवात झाली.त्यानंतर चार आठवड्यांचा खंड पडला. परंतु सप्टेंबर महिन्यात सतत पाऊस सुरू असून, सर्वच पिकांना त्याची झळ बसली आहे. सोयाबीनची तर अनेक ठिकाणी पाने गळाली असून, शेंगाही गळण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे कपाशी आणि सोयाबीन पीक हातचे जाण्याची शक्यता वाढल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे.वातावरणात आर्द्रता असून, जमिनीत ओल आहे. सूर्यप्रकाशाचे तास कमी पडत आहेत. मुळांना अन्नद्रव्य पोहोचत नसल्याने कपाशी झाडाच्या खालची बोंडे काळी पडत आहेत. काही ठिकाणी कपाशीची पाने गळून पडत असल्याच्या शेतकºयांच्या तक्रारी आहेत. शेतकºयांनी यावर शिफारशीनुसार उपाययोजना करावी.- डॉ. मोहनराव खाकरे,ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ तथा माजी विद्यावेत्ता, डॉ. पंदेकृवि.

टॅग्स :AkolaअकोलाRainपाऊस