शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

विदर्भातील ५ जिल्ह्यात पावसाची तूट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 15:06 IST

अकोला: अर्धा पावसाळा संपत आला तरी विदर्भात दमदार पाऊस झाला नसून, ५ जिल्ह्यात पावसाची तूट निर्माण झाली आहे.

अकोला: अर्धा पावसाळा संपत आला तरी विदर्भात दमदार पाऊस झाला नसून, ५ जिल्ह्यात पावसाची तूट निर्माण झाली आहे. तर पाच जिल्ह्यात सामान्य (नॉर्मल) पाऊस झाला आहे. पिकांना हा तुरळक पाऊस पोषक ठरत असला तरी बऱ्याच धरणातील जलसाठा शून्य टक्के आहे. उर्वरित धरणाचा साठा संपण्याच्या मार्गावर आहे. बुलडाणा जिल्ह्याने मात्र यावर्षी सरासरी गाठली आहे.विदर्भात उशिरा २३ जून रोजी मान्सूनचे आगमन झाले. त्यानंतर पावसाने दडी मारली ती २६ जुलै रोजी पुन्हा पावसाला सुरुवात झाली; परंतु पावसात जोर नसल्याने पाच जिल्ह्यात पावसाची तूट निर्माण झाली आहे. यात यवतमाळ जिल्ह्यात ४३ टक्के सर्वाधिक तूट आहे. त्या खालोखाल वाशिम जिल्ह्यात ३६ टक्के, गोंदिया ३५ टक्के, भंडारा ३० टक्के तर वर्धा जिल्ह्यात २३ टक्के आहे. इतर पाच जिल्ह्यात नॉर्मल पाऊस असला तरी ही तूटच आहे. यामध्ये नागपूर १३ टक्के, अमरावती १८ टक्के, अकोला १३ टक्के, चंद्रपूर १२ टक्के, तर गडचिरोली जिल्ह्यात ९ टक्के तूट आहे; परंतु हवामानशास्त्र विभागाच्या दृष्टीने हा नॉर्मल पाऊस आहे.बुलडाणा जिल्ह्यात गतवर्षी सर्वात कमी पाऊस झाल्याने धरणाचा जलसाठा आटला होता. जवळपास गावामंध्ये टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात आला होता. तथापि, यावर्षी पावसाने सरासरी गाठली आहे; परंतु धरणात जलसाठा संचयित होण्यासाठी आणखी दमदार पावसाची गरज आहे. अकोला जिल्ह्यात १३ टक्के नॉर्मल पाऊस असला तरी ही तूटच आहे. या जिल्ह्यात अद्याप दमदार पाऊस पडला नसल्याने एकही धरणात अपेक्षित जलसाठा संचयित झाला नाही. तीन मध्यम प्रकल्पाचा साठा शून्य टक्के असून, ८ लाख अकोलकरांची तहान भागविणाºया काटेपूर्णा धरणात केवळ ३५ दिवस पुरेल एवढाच ३ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अमरावती विभागात ९ मोठे सिंचन प्रकल्प आहे. यातील अप्पर वर्धा प्रकल्पात १५.९३ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. पूस प्रकल्पात २०.९३ टक्के, अरुणावती ९.५७ टक्के, नळगंगा ९.३६ टक्के तर बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणाचा साठा शून्य टक्के आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाRainपाऊसVidarbhaविदर्भ