शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

काढणी हंगामातच पावसाचा दणका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 14:12 IST

जवळपास आताच ४० टक्क्यांच्यावर उत्पादन घटल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : ऐन खरीप हंगामातील पीक काढणीच्या हंगामातच पावसाने दणका दिल्याने सोयाबीन, कापूस, ज्वारी, फळे, भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, सणासुदीच्या दिवसांत पश्चिम विदर्भातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.जवळपास आताच ४० टक्क्यांच्यावर उत्पादन घटल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.गत आठ ते दहा दिवसांपासून पश्चिम विदर्भात मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू आहे. सद्यस्थितीत सोयाबीन काढणीचा हंगाम सुरू आहे. शेतात कपाशीचे पीकही फुलले आहे; परंतु सारखा पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांनी काढलेले सोयाबीन शेतातच सडले असून, त्याला कोंब फुटले आहेत.ज्वारी, कपाशीची बोंडे काळी पडली आहेत. कपाशी परिपक्क होण्याअगोदरच बोंडांमधून कपाशी बाहेर आली. पावसामुळे पपई, लिंबू, संत्रा फळपिकाला फटका बसला असून, पपई आणि लिंबू पिकाची फळगळ झाली आहे.अंबिया बहारातील संत्र्याचे मोठे नुकसान झाले आहे. यावर्षी पिकांच्या वाढीच्या अवस्थेतच सतत दीड महिना पाऊस सुरू राहिल्याने पिकांची वाढ खुंटली.कीड, रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांना कीड, रोगांवर नियंत्रण मिळविण्यासाठी वारंवार फवारणीचा खर्च करावा लागला. मूग, उडीद अगोदरच हातचा गेल्याने सर्व भिस्त कपाशी, सोयाबीन व तूर या पिकांवर आहे; परंतु ऐन काढणीच्या वेळेसच सतत दहा दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने शेतकºयांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला जात असल्याने सणासुदीच्या दिवसांत शेतकरी हवालदिल झाला आहे.सोयाबीनला कोंब फुटले! सोयाबीन परिपक्च झाल्यानंतर सतत आठ ते दहा दिवस पाऊस राहिल्यास सोयाबीनला कोंब फुटतातच. तोच प्रत्यय शेतकºयांना येत आहे. अनेक ठिकाणी सोयाबीन काढून शेतातच ठेवण्यात आले आहे. पावसामुळे शेतात जाता येत नसल्याने सोयाबीनला कोंब फुटले असून, प्रत खराब झाली आहे.

दहा दिवसांपासून सतत पाऊस सुरू असल्याने सोयाबीनला कोंब फुटण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हे घडले आहे. कपाशी पिवळी पडली आहे. या वातावरणाचा तूर पिकावरही कीड रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे शेतकºयांनी काढणीला आलेल्या पिकाचे संरक्षण करावे.- डॉ. दिलीप मानकर, संचालक, विस्तार, शिक्षण,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरीRainपाऊस