शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

काढणी हंगामातच पावसाचा दणका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 14:12 IST

जवळपास आताच ४० टक्क्यांच्यावर उत्पादन घटल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : ऐन खरीप हंगामातील पीक काढणीच्या हंगामातच पावसाने दणका दिल्याने सोयाबीन, कापूस, ज्वारी, फळे, भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, सणासुदीच्या दिवसांत पश्चिम विदर्भातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.जवळपास आताच ४० टक्क्यांच्यावर उत्पादन घटल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.गत आठ ते दहा दिवसांपासून पश्चिम विदर्भात मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू आहे. सद्यस्थितीत सोयाबीन काढणीचा हंगाम सुरू आहे. शेतात कपाशीचे पीकही फुलले आहे; परंतु सारखा पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांनी काढलेले सोयाबीन शेतातच सडले असून, त्याला कोंब फुटले आहेत.ज्वारी, कपाशीची बोंडे काळी पडली आहेत. कपाशी परिपक्क होण्याअगोदरच बोंडांमधून कपाशी बाहेर आली. पावसामुळे पपई, लिंबू, संत्रा फळपिकाला फटका बसला असून, पपई आणि लिंबू पिकाची फळगळ झाली आहे.अंबिया बहारातील संत्र्याचे मोठे नुकसान झाले आहे. यावर्षी पिकांच्या वाढीच्या अवस्थेतच सतत दीड महिना पाऊस सुरू राहिल्याने पिकांची वाढ खुंटली.कीड, रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांना कीड, रोगांवर नियंत्रण मिळविण्यासाठी वारंवार फवारणीचा खर्च करावा लागला. मूग, उडीद अगोदरच हातचा गेल्याने सर्व भिस्त कपाशी, सोयाबीन व तूर या पिकांवर आहे; परंतु ऐन काढणीच्या वेळेसच सतत दहा दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने शेतकºयांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला जात असल्याने सणासुदीच्या दिवसांत शेतकरी हवालदिल झाला आहे.सोयाबीनला कोंब फुटले! सोयाबीन परिपक्च झाल्यानंतर सतत आठ ते दहा दिवस पाऊस राहिल्यास सोयाबीनला कोंब फुटतातच. तोच प्रत्यय शेतकºयांना येत आहे. अनेक ठिकाणी सोयाबीन काढून शेतातच ठेवण्यात आले आहे. पावसामुळे शेतात जाता येत नसल्याने सोयाबीनला कोंब फुटले असून, प्रत खराब झाली आहे.

दहा दिवसांपासून सतत पाऊस सुरू असल्याने सोयाबीनला कोंब फुटण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हे घडले आहे. कपाशी पिवळी पडली आहे. या वातावरणाचा तूर पिकावरही कीड रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे शेतकºयांनी काढणीला आलेल्या पिकाचे संरक्षण करावे.- डॉ. दिलीप मानकर, संचालक, विस्तार, शिक्षण,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरीRainपाऊस