शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

भाजपमधील मतभेद झाकण्यासाठी आघाडीच्या एकीवर स्तुतिसुमने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2020 4:20 AM

महाविकास आघाडीचे अ‍ॅड. अभिजित वंजारी यांनी भाजपचे महापौर संदीप जोशी यांचा १८ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. असा एकतर्फी ...

महाविकास आघाडीचे अ‍ॅड. अभिजित वंजारी यांनी भाजपचे महापौर संदीप जोशी यांचा १८ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. असा एकतर्फी निकाल भाजपला तर सोडा; पण काँग्रेसलाही अपेक्षित नव्हता. हे यश मिळविण्यासाठी वंजारी यांनी घेतलेले परिश्रम नक्कीच नाकारता येणार नाही. मात्र, पक्षांतर्गत धुसफुसीवर पांघरूण घालण्यासाठी या विजयाला बहुजनवादाचा सदरा चढविण्याचेही काम जोरात सुरू आहे. मात्र, यापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी आ. अनिल सोले हे भाजपकडून लढले तेव्हा यांच्या विरोधात हा बहुजनवाद का चालला नाही, यावर आत्मचिंतन करण्याची गरज आहे. संदीप जोशी यांच्या प्रचाराची धुरा खांद्यावर घेतलेले खा. रामदास तडस, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, खा. सुनील मेंढे, आ. परिणय फुके, आ. पंकज भोयर, आ. दादाराव केचे, वर्धेचे नगराध्यक्ष अतुल तराळे आदी नेते बहुजन समाजातीलच आहेत. जनतेची नाडी ओळखणाऱ्या नेत्यांना हवेचा अंदाज कसा आला नाही, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

घातपात झाल्याची भावना

- भाजपची संघटनात्मक बांधणी, कार्यकर्त्यांचे नेटवर्क व दिग्गज नेत्यांची फौज पाहता पदवीधरमध्ये पराभव होणे शक्य नाही. मात्र, त्यानंतरही चक्कर आणणारा निकाल आला. जवळच्यांनीच घातपात केला. अपेक्षित साथ मिळाली नाही, अशी भावना जोशी समर्थकांमध्ये आहे. पक्षशिस्तीचा भंग नको म्हणून ते उघडपणे बोलणे टाळत आहेत.

गडकरी समर्थकांचाच पत्ता कट का?

- गेल्या विधानसभा निवडणुकीपासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या समर्थकांचाच पत्ता का कट केला जात आहे, यावरही आता भाजपमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे. लोकमतशी बोलताना भाजपचे एक ज्येष्ठ नेते म्हणाले, विधानसभा निवडणुकीत चंद्रशेखर बावनकुळे (कामठी), सुधाकर कोहळे (दक्षिण नागपूर) यांचे तिकीट ऐनवेळी का कापण्यात आले, याचे उत्तर अजून मिळालेले नाही. भंडारा जिल्ह्यात भाजपचे तीन आमदार होते. या तीनही आमदारांचे तिकीट कुणाच्या लॉबिंगमुळे व कुणाला खूश करण्यासाठी कापण्यात आले, यावर निकालानंतरही चिंतन झाले नाही. एवढ्यावरच हे सर्व थांबले नाही. आता पदवीधरमध्ये गडकरी यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे अनिल सोले यांचे तिकीट कापले. हे करताना गडकरींना खरोखर विश्वासात घेतले गेले का, असा प्रश्न या नेत्याने उपस्थित केला. एकूणच आजवरच्या घडामोडींमुळे नाराज असलेले गडकरी समर्थक आता पदवीधरच्या निकालाचे निमित्त साधून भावना मोकळ्या करू लागले आहेत.