शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वेदना मांडण्यासाठी नागपूरला निघालेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 13:44 IST

मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतच आंदोलन करणाऱ्यांना अडवून ताब्यात घेण्यात आले.

मनोज भिवगडे

मूर्तिजापूर : कर्जमाफी आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांच्या मागण्यांसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी आज, २८ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील शासकीय निवासस्थानी जाण्यासाठी निघाले होते. मात्र, मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतच त्यांना अडवून ताब्यात घेण्यात आले.

या शेतकरी शिष्टमंडळाने आत्महत्याग्रस्त गावांतील माती मुख्यमंत्री फडणवीस यांना भेट देऊन त्यांच्या समस्या थेट मांडण्याचा निर्धार केला होता. चंद्रशेखर गवळी, राहुल वानखडे, सैय्यद रियाज, अरविंद तायडे, शुभम जवजाळ, निलेश गुल्हाने, प्रवीण खोत, रामदास भगत, संतोष रुद्रकार, योगेश ठाकरे, श्रीकृष्ण खोत, चेतन ठाकरे, नितीन खेडकर, सोपान तराळ, अमोल डोंगरदिवे, किरण ओळंबे, गजानन चारथळ, रमेश चींचे आणि अरविंद राठोड आदी शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते.

शेतकऱ्यांनी आरोप केला की, शासनाने कर्जमाफीचे आश्वासन दिले असले तरी प्रत्यक्षात त्याची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे कर्जवसुलीच्या कारवायांमुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या तोंडावर मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. सरकारने दिलेल्या आश्वासनांवर पाणी फिरले असून, प्रशासनाकडून दडपशाही सुरू असल्याचा आरोप संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर गवळी यांनी केला आहे.

पोलिसांनी अडविल्यानंतर शेतकऱ्यांनी पोलीस स्टेशनमध्येच ठिय्या देत घोषणाबाजी केली. शासनाच्या दडपशाहीच्या निषेधार्थ त्यांनी जोरदार आंदोलन केले. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, लोकशाहीच्या चौकटीत राहून मुख्यमंत्री फडणवीस यांना थेट त्यांच्या समस्या सांगण्याचा आमचा प्रयत्न होता, परंतु ताब्यात घेऊन सरकारने आमचा लोकशाही हक्क दडपल्याचा आरोप त्यांनी केला. 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरीnagpurनागपूर