शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वेदना मांडण्यासाठी नागपूरला निघालेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 13:44 IST

मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतच आंदोलन करणाऱ्यांना अडवून ताब्यात घेण्यात आले.

मनोज भिवगडे

मूर्तिजापूर : कर्जमाफी आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांच्या मागण्यांसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी आज, २८ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील शासकीय निवासस्थानी जाण्यासाठी निघाले होते. मात्र, मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतच त्यांना अडवून ताब्यात घेण्यात आले.

या शेतकरी शिष्टमंडळाने आत्महत्याग्रस्त गावांतील माती मुख्यमंत्री फडणवीस यांना भेट देऊन त्यांच्या समस्या थेट मांडण्याचा निर्धार केला होता. चंद्रशेखर गवळी, राहुल वानखडे, सैय्यद रियाज, अरविंद तायडे, शुभम जवजाळ, निलेश गुल्हाने, प्रवीण खोत, रामदास भगत, संतोष रुद्रकार, योगेश ठाकरे, श्रीकृष्ण खोत, चेतन ठाकरे, नितीन खेडकर, सोपान तराळ, अमोल डोंगरदिवे, किरण ओळंबे, गजानन चारथळ, रमेश चींचे आणि अरविंद राठोड आदी शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते.

शेतकऱ्यांनी आरोप केला की, शासनाने कर्जमाफीचे आश्वासन दिले असले तरी प्रत्यक्षात त्याची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे कर्जवसुलीच्या कारवायांमुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या तोंडावर मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. सरकारने दिलेल्या आश्वासनांवर पाणी फिरले असून, प्रशासनाकडून दडपशाही सुरू असल्याचा आरोप संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर गवळी यांनी केला आहे.

पोलिसांनी अडविल्यानंतर शेतकऱ्यांनी पोलीस स्टेशनमध्येच ठिय्या देत घोषणाबाजी केली. शासनाच्या दडपशाहीच्या निषेधार्थ त्यांनी जोरदार आंदोलन केले. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, लोकशाहीच्या चौकटीत राहून मुख्यमंत्री फडणवीस यांना थेट त्यांच्या समस्या सांगण्याचा आमचा प्रयत्न होता, परंतु ताब्यात घेऊन सरकारने आमचा लोकशाही हक्क दडपल्याचा आरोप त्यांनी केला. 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरीnagpurनागपूर