शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

अल्पवयीन मुला-मुलीचे प्रेम प्रकरण पाहून पोलीसही अवाक्!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 1:12 PM

अकोला: चित्रपटातील प्रेम दृश्य, प्रणय दृश्य, प्रेमकथांचा युवा पिढीवर विपरीत परिणाम होत आहे. खेळण्या-बागडण्याच्या, शिकण्याच्या वयातील कोवळी मुले-मुली प्रेमाच्या आकर्षणाला बळी पडत आहेत.

अकोला: चित्रपटातील प्रेम दृश्य, प्रणय दृश्य, प्रेमकथांचा युवा पिढीवर विपरीत परिणाम होत आहे. खेळण्या-बागडण्याच्या, शिकण्याच्या वयातील कोवळी मुले-मुली प्रेमाच्या आकर्षणाला बळी पडत आहेत. कोवळ्या वयात घरून पळून जाण्याचे, संसार थाटण्याचे स्वप्न रंगवित असल्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. असाच प्रकार शुक्रवारी रामदासपेठ पोलीस ठाण्यात घडून आला. चिमुरड्या मुलीने प्रियकराला लिहिलेले भावनिक पत्र वाचून पोलीससुद्धा चक्रावून गेले. त्यामुळे अद्याप वेळ गेलेली नाही, माय-बापांनो, मुली सांभाळा..., अशी म्हणण्याची वेळ पोलिसांवर आली आहे.शुक्रवारी दुपारी मोठ्या उमरीतील आई-वडिलांनी पोलिसांत धाव घेत, एक अल्पवयीन मुलगा त्यांच्या मुलीला त्रास देतो, शाळेजवळ जाऊन छेड काढतो, अशी तक्रार दिली. पोलिसांनी त्या मुलाला पकडून आणल्यानंतर त्याला समज दिली तर त्याने मुलगीच आपल्याला रात्री-मध्यरात्री फोन करते. भेटायला बोलावते. प्रेमपत्र लिहिते, अशी माहिती दिली. एवढेच नाही, तर त्याने मुलीचे मॅसेज, तिने लिहिलेले पत्रसुद्धा दाखविले. इयत्ता आठवी-नववीत शिकणाऱ्या मुलीने प्रियकराला पिल्लू...लव्ह यू...तू जेवण कर...नाहीतर मीसुद्धा जेवण करणार नाही....आपण पळून जाऊ, खोली करू... संसार थाटू असे एक नाही, तर अनेक भावनिक पत्र लिहिलेले पाहून पोलीससुद्धा चक्रावून गेले होते. आपली मुले-मुली शाळेत, शिकवणीला जातात की नाही, मोबाइलवर कुणाशी बोलतात, त्यांचे मित्र-मैत्रिणी कोण, याकडे आई-वडील कधी लक्षच देत नाहीत. पालकांना मुला-मुलींच्या या प्रकरणांची माहिती मिळाल्यावर, त्यांना धक्का बसतो; परंतु तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते आणि नंतर पश्चात्ताप करण्याशिवाय दुसरे गत्यंतर राहत नाही. सध्या समाजात घडणारी कोवळ्या वयातील प्रेम प्रकरणे ही पोलिसांसाठी नित्याची डोकेदुखीच बनली आहेत. पोलिसांनी संबंधित मुलीच्या आई-वडिलांचे, मुलीचे समुपदेशन करून मुलांवर लक्ष ठेवण्यास बजावले आणि त्या अल्पवयीन प्रियकराच्या आई-वडिलांनासुद्धा बोलावून त्यांना समज दिली आणि त्या प्रियकरावर प्रतिबंधित कारवाई करून त्याला सोडून दिले. या घटनेमुळे कोवळ्या वयात एकमेकांविषयी वाढत असणारे शारीरिक आकर्षण, ओढ, सोबत जगण्या-मरण्याच्या आणाभाका याची पाळेमुळे किती खोलवर रुजत आहेत, हे अधोरेखित होते.

पिल्लू तू जेवला नाहीस!कोवळ्या मनावर कोणते संस्कार होत आहेत, याचीसुद्धा पालकांना जाणीव नाही. १३-१४ वर्षे वयाची मुलगी तिच्या प्रियकराला भावनिक पत्र लिहिते आणि त्यात पिल्लू तुला काय झालं. राग आला, तू बोलत का नाहीस. पिल्लू जेवला नाहीस...! असं म्हणते. तोपर्यंतही पालकांना काहीच कळू नये. यावरून पालक किती दुर्लक्ष करतात, हे दिसून येते. लक्षात येईपर्यंत काळजाचा तुकडा भुर्रकन उडून गेलेला असतो.शाळा-महाविद्यालयांसमोर टपोरी मुलांचा वावरशहरातील अनेक शाळा-महाविद्यालयांसमोर टपोरी मुले उभी राहतात. मुलींची छेड काढतात. त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढतात. आकर्षणामुळे काही मुलीसुद्धा भरकटत जातात. शाळा-महाविद्यालयांनीसुद्धा वेळीच याकडे लक्ष देऊन पोलिसांत तक्रार करावी.आई-वडिलांनी मुला-मुलींबाबत दक्ष राहून ती काय करतात, कुठे जातात, मोबाइलवर कुणाशी बोलतात, त्यांचे मित्र-मैत्रिणी कोण आहेत, मुलांना काय अडचणी आहेत, हे जाणून घ्यावे, त्यांचे मित्र बनून संवाद साधला पाहिजे.-शैलेश सपकाळ,ठाणेदार,रामदासपेठ पोलीस स्टेशन.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टRamdas Peth Police Stationरामदासपेठ पोलीस स्टेशन