शहरं
Join us  
Trending Stories
1
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
3
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
4
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
5
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
6
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
7
एकीकडे 'घरवाली' दुसरीकडे 'बाहेरवाली'; दोघींसोबत आनंदाने जगत होता तरुण अन् एक दिवस असं काही झालं... 
8
पितृपक्ष इंदिरा एकादशी २०२५: १० राशींवर श्रीहरी प्रसन्न, शिव-गौरी-लक्ष्मी कृपा; शुभ-लाभ-पैसा!
9
'क्रिस्टल ब्लॅक पर्ल' रंगात होंडा अमेझ भारतात लॉन्च; नव्या लूकमध्ये दिसते आणखी धासू!
10
बीचवर फिरायला गेलेल्या तरुणीवर बॉयफ्रेंडसमोरच सामूहिक बलात्कार; पोलिसांनी आरोपी कसे शोधले?
11
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
12
आयटी इंजिनिअरने १० टक्के पगारवाढ मागितली, नोकरी गमावली; मग त्याला काढणाऱ्याचीही गेली...
13
भारत आणि चीनचं टेन्शन वाढवणार युरोपियन युनियन! अमेरिकेच्या समोर झुकलं का EU?
14
'ओझेम्पिक टीथ' म्हणजे काय? वजन कमी करण्याच्या औषधाचा होतोय 'असा' दुष्परिणाम
15
Nupur Bora: नुपूर बोरा आहे तरी कोण? सहा वर्षात अनेक गैरव्यवहार, घरातही सापडलं मोठं घबाड!
16
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
17
6G क्षेत्रात भारताची मोठी झेप, IIT हैदराबादने विकसित केले प्रोटोटाइप; 2030 पर्यंत लॉन्च होणार
18
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
19
बंगल्याचा हव्यास, गोविंद बरगेंचा छळ; पूजा गायकवाडचा तुरुंगातील मुक्काम वाढला
20
ITR भरण्यासाठी उरले शेवटचे काही तास! आयकर विभागाकडून करदात्यांसाठी ६ टिप्स

कविसंमेलन : ‘पण मला एका मुलीचा बाप कर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 11:16 IST

सातव्या राज्यस्तरीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनात शनिवारी दुपारच्या सत्रात कविसंमेलनाचे आयोजन केले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: पुरुषांना निसर्गाने कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्व प्रदान केले आहे; मात्र स्त्रियांना मातृत्व दिले आहे. मातृत्व जगातील सर्वात श्रेष्ठ आणि सर्वात सुंदर गोष्ट आहे. अनादी काळापासून भारतात स्त्रियांना सन्मानच मिळाला आहे; परंतु आज देशात स्त्रियांवर अत्याचार होत आहेत. भ्रूणहत्याही करण्यात येते. एवढी अपमानास्पद वागणूक स्त्रियांना मिळत आहे. यावर समर्पक अशी कविता युवा कवी गोपाल मापारी यांनी सादर केली. ‘पुण्यही माझे विधात्या पाप कर, पण मला एका मुलीचा बाप कर’ या ओळींना सभा मंडपातील उपस्थितांनी भरभरू न दाद दिली.सातव्या राज्यस्तरीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनात शनिवारी दुपारच्या सत्रात कविसंमेलनाचे आयोजन केले होते. हे संमेलन महिलांना समर्पित असल्यामुळे कविसंमेलनातदेखील कवींनी आपल्या रचनांमधून स्त्री आणि आजची परिस्थिती, यावर प्रकाशझोत टाकला. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी अरविंद भोंडे होते. यामध्ये प्रस्थापितांसह नवोदित कवींचादेखील समावेश होता. नरेंद्र इंगळे, सुरेश पाचकवडे यांच्यासह विद्या बनकर, कविता राठोड, गोपाल मापारी, वैभव भिवरकर, डॉ. विनय दांदळे, विशाल कुलट, प्रकाश सरोदे व मंदाकिनी खरडे सहभागी झाल्या होत्या. कविसंमेलनाचे बहारदार संचालन अ‍ॅड़ अनंत खेळकर यांनी केले.संमेलनाच्या सुरुवातीला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू राजेश जयपूरकर यांनी साहित्य संमेलनाला शुभेच्छा दिल्या. विद्या बनाफर यांनी मन सुन्न करणारी ‘गावाकडे चला’ ही रचना सादर केली. गाव सोडून शहरात गेलेल्या मुलाची आई किती वाट पाहत असते, याचे सुंदर वर्णन बनाफर यांनी कवितेत करू न, वृद्धांच्या समस्या मांडल्या. मंदाकिनी खरडे यांनी ‘स्वर्ग’ कविता सादर केली. डॉ. विनय दांदळे यांनी ‘पाणी’ ही कविता सादर करू न आज ग्लोबल वार्मिंगच्या युगात पाण्याची कशी बिकट समस्या निर्माण झाली, याचे विदारक दृश्य मांडले. प्रकाश सरोदे यांनी माणुसकीवर कविता सादर केली. वैभव भिवरकर या युवा कवीने प्रजासत्ताक दिनावर कविता सादर केली.‘माणसे मला न भेटली. कट्टरता भेटली गडे हो’ या ओळी भाव खाऊन गेल्या. यावर अनंत खेळकर यांनीदेखील त्यांनी प्रजासत्ताक दिनावर रचलेल्या कवितांच्या ओळी ऐकविल्या. ‘राजकारणात प्रवेशसुद्धा इन्कम सोर्स होतो... लोकशाहीच्या खचलेल्या खांद्यावर माझ्या लोकशाहीची पालखी आहे...’ या ओळीवर रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. विशाल कुलट या नवोदित कवीने ‘छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी यांच्यावरील कविता स्फूर्तीने गायिली. सुरेश पाचकवडे यांनी ‘कधी तरी उतरावे मनाच्या खोल दरीत अन् भिजावे निवांत आठवणींच्या दरीत’, अशा ओळींनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. नरेंद्र इंगळे यांनी ‘पोथी’ कविता सादर करू न अंधश्रद्धेवर प्रहार केला. संमेलनाचे अध्यक्ष अरविंद भोंडे यांनी ‘लुगडं’ ही कविता सादर करू न रसिकांच्या मनाचा ठाव घेतला.

 

टॅग्स :rashtrasant tukdoji maharaj vichar sahitya samelanराष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनAkolaअकोलाcultureसांस्कृतिक