शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

सुखद धक्का...सातपुड्याच्या पायथ्याशी कोरड्या विहिरींना फुटला पाण्याचा झरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 14:33 IST

अचानक जमिनीमधून पाण्याची वाढत असलेली पातळी पाहता दुष्काळात हे नैसर्गिक जलसाठे दिलासा देणारे ठरत आहेत.

- विजय शिंदेअकोट: प्रखर ऊन व अंगाची लाही लाही होत असताना भूगर्भात खोलवर गेलेली पाण्याची पातळी त्यामुळे ओढावलेला दुष्काळ, अशी परिस्थिती जिल्ह्यात आहे. अशा स्थितीत सातपुड्याच्या पायथ्याशी मोठ्या प्रमाणात नैसर्गिक जलसाठे आढळून येत आहेत. अचानक जमिनीमधून पाण्याची वाढत असलेली पातळी पाहता दुष्काळात हे नैसर्गिक जलसाठे दिलासा देणारे ठरत आहेत.अकोट तालुक्यालगत सातपुड्याच्या पर्वतरांगा आहेत. या पर्वतातून बऱ्याचदा मोठ्या प्रमाणात पावसाळ्याच्या दिवसांत आलेल्या पाण्यामुळे नदी-नाल्यांना पूर येतो. सातपुड्यातून येणाºया पाण्याचा ओघ पाहता परिसरात पोपटखेडसह इतर धरणांची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठाही होतो. तरीसुद्धा गेल्या काही वर्षांपासून अकोट तालुक्यातील भूगर्भातील पाण्याची पातळी खोलवर गेल्याने तालुक्यात टँकर लावण्याची परिस्थिती प्रथमच ओढावली आहे. अशा स्थितीत अचानक सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या काही पट्ट्यात भूगर्भातील पाणीसाठ्यात अचानक वाढ झाली आहे. प्रथमच जितापूर रूपागड परिसरात वन विभागाच्या कार्यक्षेत्रात कूपनलिका करताना मोठ्या प्रमाणात जलसाठा आढळून आला आहे. हा जलसाठा अविरतपणे धो-धो वाहत आहे. विशेष म्हणजे, जितापूर रूपागडच नव्हे, तर पिंप्री खुर्द येथील रामकृष्ण पडोळे यांच्या एदलापूर शेतशिवारात कोरड्या पडलेल्या विहिरीला अचानकपणे पाणी लागले आहे. पडोळे यांच्या शेतातील विहीर कोरडी पडली. त्यामुळे यांनी बोअरवेल केले. बोअरवेलमधूनसुद्धा पाहिजे त्या प्रमाणात पाणी मिळत नव्हते. विहीर कोरडी पडल्याने विहिरीत काडीकचरा टाकला जात होता; परंतु अचानक कोरड्या विहिरीतून कबुतरे उडायला लागल्याने पाहिले असता विहिरीत भरपूर पाणीसाठा वर येत असल्याचे आढळून आले. चक्क विहिरीला २० ते २५ फूट पाणी लागले. याशिवाय कासोद येथील गजानन महल्ले यांच्या शेतातील विहीर पाण्याने तुडुंब भरली. शिवाय, संजय तळोकार यांच्या शेतातील कोरड्या विहिरीलाही मोठ्या प्रमाणात पाणी लागले व या परिसरातून वाहत असलेल्या नाल्यात जागोजागी नैसर्गिकपणे जलसाठा बाहेर येऊ लागला आहे. अकोट तालुक्यात खारपाणपट्ट्याची व्याप्ती वाढत असताना सातपुड्याच्या पायथ्याशी गोड्या पाण्याचे साठे आढळत आहेत. त्यामुळे भूगर्भातील एखाद्या पाण्याच्या खाडीला वाट मिळाली की काय, अशी चर्चा आता होत असताना नैसर्गिक जलसाठे हे संशोधनाचा विषय झाला आहे. विशेषत: उन्हाळ्याच्या दिवसांत आढळून येत असलेले हे जलसाठे पाहण्याकरिता नागरिकांची गर्दी होत आहे. अशातच हौशी नागरिक कुटुंबासह या स्थळी जाऊन सहलीचा आनंद घेत असल्याचे चित्र आहे. 

 

टॅग्स :akotअकोटAkolaअकोलाWaterपाणी