शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

सुखद धक्का...सातपुड्याच्या पायथ्याशी कोरड्या विहिरींना फुटला पाण्याचा झरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 14:33 IST

अचानक जमिनीमधून पाण्याची वाढत असलेली पातळी पाहता दुष्काळात हे नैसर्गिक जलसाठे दिलासा देणारे ठरत आहेत.

- विजय शिंदेअकोट: प्रखर ऊन व अंगाची लाही लाही होत असताना भूगर्भात खोलवर गेलेली पाण्याची पातळी त्यामुळे ओढावलेला दुष्काळ, अशी परिस्थिती जिल्ह्यात आहे. अशा स्थितीत सातपुड्याच्या पायथ्याशी मोठ्या प्रमाणात नैसर्गिक जलसाठे आढळून येत आहेत. अचानक जमिनीमधून पाण्याची वाढत असलेली पातळी पाहता दुष्काळात हे नैसर्गिक जलसाठे दिलासा देणारे ठरत आहेत.अकोट तालुक्यालगत सातपुड्याच्या पर्वतरांगा आहेत. या पर्वतातून बऱ्याचदा मोठ्या प्रमाणात पावसाळ्याच्या दिवसांत आलेल्या पाण्यामुळे नदी-नाल्यांना पूर येतो. सातपुड्यातून येणाºया पाण्याचा ओघ पाहता परिसरात पोपटखेडसह इतर धरणांची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठाही होतो. तरीसुद्धा गेल्या काही वर्षांपासून अकोट तालुक्यातील भूगर्भातील पाण्याची पातळी खोलवर गेल्याने तालुक्यात टँकर लावण्याची परिस्थिती प्रथमच ओढावली आहे. अशा स्थितीत अचानक सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या काही पट्ट्यात भूगर्भातील पाणीसाठ्यात अचानक वाढ झाली आहे. प्रथमच जितापूर रूपागड परिसरात वन विभागाच्या कार्यक्षेत्रात कूपनलिका करताना मोठ्या प्रमाणात जलसाठा आढळून आला आहे. हा जलसाठा अविरतपणे धो-धो वाहत आहे. विशेष म्हणजे, जितापूर रूपागडच नव्हे, तर पिंप्री खुर्द येथील रामकृष्ण पडोळे यांच्या एदलापूर शेतशिवारात कोरड्या पडलेल्या विहिरीला अचानकपणे पाणी लागले आहे. पडोळे यांच्या शेतातील विहीर कोरडी पडली. त्यामुळे यांनी बोअरवेल केले. बोअरवेलमधूनसुद्धा पाहिजे त्या प्रमाणात पाणी मिळत नव्हते. विहीर कोरडी पडल्याने विहिरीत काडीकचरा टाकला जात होता; परंतु अचानक कोरड्या विहिरीतून कबुतरे उडायला लागल्याने पाहिले असता विहिरीत भरपूर पाणीसाठा वर येत असल्याचे आढळून आले. चक्क विहिरीला २० ते २५ फूट पाणी लागले. याशिवाय कासोद येथील गजानन महल्ले यांच्या शेतातील विहीर पाण्याने तुडुंब भरली. शिवाय, संजय तळोकार यांच्या शेतातील कोरड्या विहिरीलाही मोठ्या प्रमाणात पाणी लागले व या परिसरातून वाहत असलेल्या नाल्यात जागोजागी नैसर्गिकपणे जलसाठा बाहेर येऊ लागला आहे. अकोट तालुक्यात खारपाणपट्ट्याची व्याप्ती वाढत असताना सातपुड्याच्या पायथ्याशी गोड्या पाण्याचे साठे आढळत आहेत. त्यामुळे भूगर्भातील एखाद्या पाण्याच्या खाडीला वाट मिळाली की काय, अशी चर्चा आता होत असताना नैसर्गिक जलसाठे हे संशोधनाचा विषय झाला आहे. विशेषत: उन्हाळ्याच्या दिवसांत आढळून येत असलेले हे जलसाठे पाहण्याकरिता नागरिकांची गर्दी होत आहे. अशातच हौशी नागरिक कुटुंबासह या स्थळी जाऊन सहलीचा आनंद घेत असल्याचे चित्र आहे. 

 

टॅग्स :akotअकोटAkolaअकोलाWaterपाणी