शहरं
Join us  
Trending Stories
1
२४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, दुबार मतदारावरही उचललं पाऊल
2
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
3
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
4
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
5
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
6
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
7
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?
8
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
10
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
11
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
12
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
13
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
14
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
15
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
16
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
17
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
18
Election: निवडणुकीच्या प्रचारात शब्द जपून वापरा नाही तर...; केंद्रीय मंत्र्याविरोधात गुन्हा दाखल
19
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
20
देशातील १ टक्के श्रीमंत लोकांच्या संपत्तीत ६२ टक्क्यांनी वाढ; हैराण करणारा रिपोर्ट आला समोर

सुखद धक्का...सातपुड्याच्या पायथ्याशी कोरड्या विहिरींना फुटला पाण्याचा झरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 14:33 IST

अचानक जमिनीमधून पाण्याची वाढत असलेली पातळी पाहता दुष्काळात हे नैसर्गिक जलसाठे दिलासा देणारे ठरत आहेत.

- विजय शिंदेअकोट: प्रखर ऊन व अंगाची लाही लाही होत असताना भूगर्भात खोलवर गेलेली पाण्याची पातळी त्यामुळे ओढावलेला दुष्काळ, अशी परिस्थिती जिल्ह्यात आहे. अशा स्थितीत सातपुड्याच्या पायथ्याशी मोठ्या प्रमाणात नैसर्गिक जलसाठे आढळून येत आहेत. अचानक जमिनीमधून पाण्याची वाढत असलेली पातळी पाहता दुष्काळात हे नैसर्गिक जलसाठे दिलासा देणारे ठरत आहेत.अकोट तालुक्यालगत सातपुड्याच्या पर्वतरांगा आहेत. या पर्वतातून बऱ्याचदा मोठ्या प्रमाणात पावसाळ्याच्या दिवसांत आलेल्या पाण्यामुळे नदी-नाल्यांना पूर येतो. सातपुड्यातून येणाºया पाण्याचा ओघ पाहता परिसरात पोपटखेडसह इतर धरणांची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठाही होतो. तरीसुद्धा गेल्या काही वर्षांपासून अकोट तालुक्यातील भूगर्भातील पाण्याची पातळी खोलवर गेल्याने तालुक्यात टँकर लावण्याची परिस्थिती प्रथमच ओढावली आहे. अशा स्थितीत अचानक सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या काही पट्ट्यात भूगर्भातील पाणीसाठ्यात अचानक वाढ झाली आहे. प्रथमच जितापूर रूपागड परिसरात वन विभागाच्या कार्यक्षेत्रात कूपनलिका करताना मोठ्या प्रमाणात जलसाठा आढळून आला आहे. हा जलसाठा अविरतपणे धो-धो वाहत आहे. विशेष म्हणजे, जितापूर रूपागडच नव्हे, तर पिंप्री खुर्द येथील रामकृष्ण पडोळे यांच्या एदलापूर शेतशिवारात कोरड्या पडलेल्या विहिरीला अचानकपणे पाणी लागले आहे. पडोळे यांच्या शेतातील विहीर कोरडी पडली. त्यामुळे यांनी बोअरवेल केले. बोअरवेलमधूनसुद्धा पाहिजे त्या प्रमाणात पाणी मिळत नव्हते. विहीर कोरडी पडल्याने विहिरीत काडीकचरा टाकला जात होता; परंतु अचानक कोरड्या विहिरीतून कबुतरे उडायला लागल्याने पाहिले असता विहिरीत भरपूर पाणीसाठा वर येत असल्याचे आढळून आले. चक्क विहिरीला २० ते २५ फूट पाणी लागले. याशिवाय कासोद येथील गजानन महल्ले यांच्या शेतातील विहीर पाण्याने तुडुंब भरली. शिवाय, संजय तळोकार यांच्या शेतातील कोरड्या विहिरीलाही मोठ्या प्रमाणात पाणी लागले व या परिसरातून वाहत असलेल्या नाल्यात जागोजागी नैसर्गिकपणे जलसाठा बाहेर येऊ लागला आहे. अकोट तालुक्यात खारपाणपट्ट्याची व्याप्ती वाढत असताना सातपुड्याच्या पायथ्याशी गोड्या पाण्याचे साठे आढळत आहेत. त्यामुळे भूगर्भातील एखाद्या पाण्याच्या खाडीला वाट मिळाली की काय, अशी चर्चा आता होत असताना नैसर्गिक जलसाठे हे संशोधनाचा विषय झाला आहे. विशेषत: उन्हाळ्याच्या दिवसांत आढळून येत असलेले हे जलसाठे पाहण्याकरिता नागरिकांची गर्दी होत आहे. अशातच हौशी नागरिक कुटुंबासह या स्थळी जाऊन सहलीचा आनंद घेत असल्याचे चित्र आहे. 

 

टॅग्स :akotअकोटAkolaअकोलाWaterपाणी