शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

संघर्ष नेतृत्वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 18:40 IST

गोपीनाथजी यांच्यापेक्षा पंकजांचा संघर्ष हा वेगळ्या पातळीवरचा असला तरी धग तीच आहे.

ठळक मुद्देमुंडे यांनी राज्यभर मिळविलेला जनाधार हा केवळ एका समाजाच्या भरवशावर नव्हता मुंडे यांचे हे मोठेपण भाजपमध्ये अनेकदा अडचणीचे ठरले व संघर्षाची भूमिका जाहीरपणेसुद्धा घ्यावी लागलीआता तसाच संघर्ष त्यांची कन्या आमदार पंकजा यांना वारसाहक्काने मिळाला आहे.

- राजेश शेगोकार

अकोला -भारतीय जनता पार्टीला बहुजन चेहरा देऊन ग्रामीण भागापर्यंत पोहोचविण्याचे काम करणाऱ्या नेत्यांमध्ये दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे नाव अग्रक्रमाने घेतल्या जाते. मुंडे यांनी राज्यभर मिळविलेला जनाधार हा केवळ एका समाजाच्या भरवशावर नव्हता. वंजारी समाजाचे ते एकमेव नेतृत्व होतेच, मात्र केवळ त्याच समाजापुरते न राहता त्यांनी अठरापगड जातींना जवळ केल्याने ‘लोकनेते’ ठरले. मुंडे यांचे हे मोठेपण भाजपमध्ये अनेकदा अडचणीचे ठरले व त्यामुळे त्यांना प्रत्येकवेळी संघर्षाची भूमिका जाहीरपणेसुद्धा घ्यावी लागली व आता तसाच संघर्ष त्यांची कन्या आमदार पंकजा यांना वारसाहक्काने मिळाला आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पंकजांनी त्यांचा वारसा हाती घेतला, त्याचा विस्तार केला; मात्र संघर्ष काही त्यांची पाठ सोडेना. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळी पूर्वी त्यांनी बुलडाण्यातील सिंदखेडराजा येथून संघर्ष यात्रा काढली अन् भविष्यात राज्याचे नेतृत्व करायचे आहे, असे स्पष्ट संकेतच दिले. याच संकेतांमुळे पुढील पाच वर्षात सत्तेत राहूनही त्यांचा संघर्ष आणखी वाढला असून, आता हा संघर्ष नेतृत्वाच्या मुद्यावर येऊन ठेपला आहे.खरेतर गोपीनाथजी यांच्यापेक्षा पंकजांचा संघर्ष हा वेगळ्या पातळीवरचा असला तरी धग तीच आहे. समाज, पक्ष व राजकारण या तिन्ही पातळीवर पंकजांनी आपले नेतृत्व आता पणाला लावले असल्याचे चित्र परवा गोपीनाथ गडावर स्पष्ट झाले. गोपीनाथजी यांच्या नंतरची पंकजांची खरी कसोटी आता सुरू झाली, असे म्हणता येईल. आता भाजपाची सत्ता नाही, पक्षाला थेट आव्हान देत त्यांनी पक्षातील निर्णय प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांनी उभे केलेले आव्हान हे गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर एकसंघ वंजारी समाजाचे नेतृत्व कोणाकडे? या प्रश्नाचाही गुंता वाढला आहे.पंकजा सध्या तरी मुंडे साहेबांच्या अनेक आठवणींना उजाळा देत भावनिक वातावरण तयार करीत असल्या तरी आपल्याच पक्षाच्या विरोधात त्यांनी आक्रमकपणे घेतलेली भूमिका ही केंद्रीय नेतृत्व कशा पद्धतीने हाताळते, यावरही त्यांच्या राजकीय भविष्याचा निर्णय होणार आहे. २०१४ मध्ये बुलडाण्यातील सिंदखेड राजामध्ये संघर्ष यात्रेसाठी भरपावसात जमलेली गर्दी पंकजांचा उत्साह वाढविणारी होती. इतर कुणाच्याही भाषणाला या गर्दीने प्रतिसाद दिला नाही; पक्षाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी भाषणाला माईक हाती घेतल्यावरही गर्दीतून आवाज थांबत नव्हते, अखेर पंकजा उभ्या राहिल्या अन् त्यांनी कार्यकर्त्यांना शांत केले. त्यानंतर देवेंद्र यांनी तडफदार भाषण करून लोकांना जिंकून घेतले. या भाषणातून भविष्यातील या नव्या नेतृत्वाला पसंती दिल्याचे प्रत्यंतरच उपस्थितांनी दिले. त्यांनी ही यात्रा विदर्भातून सुरू करत मराठवाड्यात नेली होती. आता २६ जानेवारीपासून मराठवाड्याच्या औरंगाबाद येथे उपोषण करून त्या आपला राज्यव्यापी दौरा सुरू करणार आहेत. पहिल्या संघर्ष यात्रेत नितीन गडकरींचा फोटो कुठेही नव्हता, तेव्हा त्या गर्दीतील कुणालाही ते खटकलेही नव्हते कारण बीड अन् नागपूरमधील शीतयुद्ध कोणापासून लपलेही नव्हते, यावेळी संघर्षाचा अन् नाराजीचा रोख नागपूरवरच आहे, त्यामुळे संघर्षाचे आणखी एक वर्तृळ तयार झाले आहे. फक्त या वर्तृळाचा चक्र व्यूह होऊ नये एवढेच !

 

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेGopinath Mundeगोपीनाथ मुंडेBJPभाजपा