अकोट तालुक्यात पाणंद रस्ते चिखलमय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:42 AM2021-09-02T04:42:06+5:302021-09-02T04:42:06+5:30

शेतकऱ्यांना कधी नैसर्गिक, तर कधी मानवनिर्मित संकटांचा सामना करावा लागतो. पावसाळ्यात पीक पेरणी, शेती मशागत, शेतमाल घरी आणणे आदींसाठी ...

Panand roads in Akot taluka are muddy! | अकोट तालुक्यात पाणंद रस्ते चिखलमय!

अकोट तालुक्यात पाणंद रस्ते चिखलमय!

Next

शेतकऱ्यांना कधी नैसर्गिक, तर कधी मानवनिर्मित संकटांचा सामना करावा लागतो. पावसाळ्यात पीक पेरणी, शेती मशागत, शेतमाल घरी आणणे आदींसाठी शेतात जाण्याकरिता खडीकरणाचा पाणंद रस्ता असावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असते; मात्र दीर्घ कालावधीनंतरही पाणंद रस्त्यांचा प्रश्न निकाली निघत नसल्याने रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. चिखलमय रस्त्यावरून शेतात जाताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे पाणंद रस्ते चिखलमय झाले. निजामपूर-टाकळी बु. परिसरातील शेतकऱ्यांना चिखल तुडवत शेतात जावे लागत आहे. निजामपूर येथे शेतात बैल गाडीत खते घेऊन जाताना चिखलात बैल गाडी फसल्याने शेतकऱ्यांची मोठी पंचाईत झाली. पाणंद रस्ते चिखलमय होत असल्याने शेतकऱ्यांना चिखलातून शेतात जाण्याची वेळ आली आहे. पाणंद रस्ते चिखलमुक्त करण्यासाठी शासनाने पुरेशा प्रमाणात निधी पुरवावा, पाणंद रस्त्यांचे मजबुतीकरण व खडीकरण करण्यासाठी पुरेशा प्रमाणात निधीची तरतूद नसल्याने निजामपूर येथील शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

-----------------------------

गेल्या अनेक वर्षांपासून निजामपूर-टाकळी बु. शेतरस्त्यांबाबत अनेक वर्षांपासून गावातील नागरिक प्रशासन लोकप्रतिनिधींना वारंवार सांगून सुद्धा शेतकऱ्यांच्या समस्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यांचे या दुर्लक्षामुळे सकाळी एक शेतकरी बैल गाडीने शेतात खते घेऊन जात असताना चिखलमय शेतरस्त्यात फसली. शेतकऱ्यास मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला, तरी संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन समस्या दूर करावी.

- प्रमोद की. बगाडे, शेतकरी, निजामपूर.

Web Title: Panand roads in Akot taluka are muddy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.