शहरं
Join us  
Trending Stories
1
आयएसआय आणि 'तामिळनाडू'चा उल्लेख! बिहारच्या राजगीर आयुध कारखान्याला बॉम्बने उडवण्याची धमकी
2
इलेक्ट्रिक फटाक्यांनी लावली नाईट क्लबला आग; मालकांसह ४ कर्मचाऱ्यांवर अटकेची तलवार, गोवा पोलीस दिल्लीत दाखल!
3
इंडिगोचे विमान संकट! दिल्ली, बेंगळुरू, चेन्नईत शेकडो फ्लाईट्स रद्द; वाचा, प्रवाशांना कधी मिळणार दिलासा?
4
महिलांवरील अत्याचाराविरोधात ठाकरे सरकारनं आणलेलं 'शक्ती विधेयक' केंद्र सरकारनं नाकारलं, कारण...
5
ईव्हीएमच्या स्ट्राँगरूमवर कार्यकर्त्यांचाही वॉच; राष्ट्रवादी काँग्रेसने बसवले जिंतूरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे
6
घर घेताना 'हा' खर्च कायम विसरून जातात लोक; नंतर होते मोठी डोकेदुखी, जाणून घ्या महत्त्वाची माहिती
7
मोदी अन् नितीश सरकारमधील मंत्री पगारासोबत पेन्शनही घेतात; RTI मधून खुलासा, ८ जणांची डबल कमाई
8
Tarot Card: हा आठवडा अडलेली कामे पूर्णत्त्वास नेणारा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
9
बंगालमध्ये बाबरी मशीद उभारण्यासाठी किती मिळाली देणगी?; पैसे मोजण्यासाठी मागवली मशीन, Video पाहा
10
Stock Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; निफ्टी ५० अंकांनी घसरला, Indigo चा शेअर आपटला
11
Pune Crime: "दीदी, तुला या पहिल्या आणि शेवटच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा", पोलीस कर्मचाऱ्याच्या पोस्टने खळबळ
12
IndiGo Flights : 'इंडिगो'वर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, याचिकेत काय आहेत प्रवाशांच्या मागण्या?
13
मातृभाषेसोबतच आणखी एक भारतीय भाषा शिकवा; यूजीसीचं सर्व राज्यांना पत्र, नियमावली जारी
14
Shocking: महागड्या फोनसाठी वडिलांसोबत वाद; १७ वर्षीय मुलाची १४० फूट खोल बोअरवेलमध्ये उडी!
15
ट्रम्प यांनी दिलेला युद्धबंदीचा आदेश; अवघ्या ४५ दिवसांच मोडला! थायलंडचे कंबोडियावर हवाई हल्ले
16
फक्त ७.१०% च्या व्याजदरावर 'इकडे' मिळतंय होमलोन; ₹८० लाखांच्या कर्जासाठी किती हमी मंथली सॅलरी, EMI किती?
17
Donald Trump: "मी ८ युद्धे थांबवली, पण रशिया-युक्रेन संघर्ष थांबवणं सोपं नाही..." ट्रम्प असं का म्हणाले?
18
Russia Attack Ukraine: ६५३ ड्रोन्स, ५१ मिसाईल; युक्रेन हादरले! रशियाचा मोठा हवाई हल्ला
19
घरबसल्या श्रीमंत व्हाल! 'या' सरकारी योजनेत गुंतवणूक करा आणि मिळवा ₹४० लाखांपेक्षा अधिक टॅक्स फ्री रक्कम
20
Goa Fire :  कुटुंबाचा आधार गेला! पैसे कमावण्यासाठी गोव्यात आलेले दोन भाऊ; क्लबच्या आगीत झाला मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मूर्तिजापूर तालुक्यात सोयाबीन पिकावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 18:39 IST

Soybean crop in Murtijapur taluka : सोयाबीनच्या परीपक्व शेंगा जाळल्याने शेतकऱ्यांवर पुन्हा नैसर्गिक संकट ओढवले आहे. 

-संजय उमक मूर्तिजापूर : तालुक्यात आतापर्यंत झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे हजारो हेक्टर वरील खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याची झळ संपत नाही तोच सोयाबीन पिकावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे असल्याने शेकडो हेक्टर वरील सोयाबीनच्या परीपक्व शेंगा जाळल्याने शेतकऱ्यांवर पुन्हा नैसर्गिक संकट ओढवले आहे.            २३-२४ जुलै व ६-७ सप्टेंबर रोजी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे यामध्ये हजारो हेक्टर क्षेत्रात खरीप पिके पाण्याखाली आली होती. २३ - २४ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे काही भागात नदी काठावरील गावातील शेतीत पुराचे पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, तालुक्यात ७२ हजार ६९८ पेरणी लक्षांक होता जवळपास हा लक्षांक पुर्ण झाला असून ७ हजार ५२६ हेक्टरवर प्रत्यक्ष पेरणी करण्यात आली. यातील २३ - २४ जुलै झालेल्या अतिवृष्टीमुळे व नदी काठावर असलेल्या शेतजमीनत पुराचे पाणी शिरले होते त्यात शेती खरडून गेल्याने  अंतिम अहवालात नुसार ७० गावातील ६३१.१५ हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. यात १ हजार ७०४ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तर ६-७ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे तालुक्यातील सर्व आठ महसूल मंडळांत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात ४४३ हेक्टर वरील शेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असला तरी प्रत्यक्षात यापेक्षा कितीतरी जास्त हेक्टरवरील खरीप पिकाचे नुकसान झाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी कपाशी पेरा ११ हजार ६३५ हेक्टर होता त्या पेक्षा यावर्षी कपाशी पेऱ्यात निम्म्याने घट झाल्याने तो केवळ ६ हजार ८७२ हेक्टरवर आला आहे. सोयाबीनची गतवर्षी ४३ हजार ८४० हेक्टरवर पेरणी झाली होती यावर्षी ती ४७ हजार १७७ हेक्टर झाली. तुर ११ हजार १५६ पेरणी झाली आहे. परंतू सततच्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, तुर, कपाशी या मुख्य पिकाचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीच्या संकटातून शेतकरी जात नाही तोच भरीस भर तालुक्यात सोयाबीन पिकावर अज्ञात रोगाने आक्रमन केले आहे. सोयाबीनला आलेल्या शेंगा त्या परीपक्व अवस्थेत असताना सुकल्या आहेत यामुळे पुन्हा शेतकरी नैसर्गिक संकटात सापडला असून शेतकऱ्याच्या हाता तोंडाशी आलेला घास तोही या अज्ञात रोगाने हिसकावून घेतला आहे. यात हजारो हेक्टर वरील सोयाबीन पिकाचे नुकसान झाले असल्याने सदर पिकाचे सर्वेक्षण करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे. 

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरagricultureशेतीFarmerशेतकरी