शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील संत्रा फळ पीक धोक्यात; फळ गळती सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 14:03 IST

अकोला : यावर्षी पाऊस कमी झाल्याने विदर्भातील फळ पिकांना झळ पोहोचत असून, मृग बहारातील संत्रा फळ गळती सुरू झाली आहे, तसेच रोगराई वाढत असल्याने यावर्षीही संत्रा उत्पादक शेतकऱ्यांपुढे संकट उभे ठाकले आहे.

अकोला : यावर्षी पाऊस कमी झाल्याने विदर्भातील फळ पिकांना झळ पोहोचत असून, मृग बहारातील संत्रा फळ गळती सुरू झाली आहे, तसेच रोगराई वाढत असल्याने यावर्षीही संत्रा उत्पादक शेतकऱ्यांपुढे संकट उभे ठाकले आहे.राज्यात सर्वाधिक १ लाख ५० हेक्टर संत्रा फळ पिकांचे क्षेत्र विदर्भात आहे; परंतु सतत बदलत असलेल्या हवामानाचा संत्रा फळ पिकांवर परिणाम होत आहे. मागील पंधरा ते सतरा वर्षांपासून विदर्भातील पावसाची अनिश्चितता जाणवत असून, एक, दोन वर्षे सोडले, तर यातील बहुतांश वेळी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. २००४-०५ मध्ये पाऊस खूपच कमी झाला होता. त्याचा परिणाम संत्रा फळे, झाडांवर झाला. शेतकºयांना संत्रा झाडे तोडावी लागली. जवळपास ४० ते ५० हजार हेक्टरवरील संत्र्यांची झाडे शेतकºयांनी तोडली होती. यावर्षी तेच चित्र असून, पाऊस नसल्याने आर्द्रता नाही, जमिनीतील पाण्याची पातळी घसरल्याने आवश्यक ओलावा नसल्याने आतापासूनच संत्र्याच्या आरोग्यावर कायिक परिणाम होत असल्याचे चित्र आहे. काही भागात मृग बहारातील संत्रा फळगळती सुरू झाल्याने संत्रा उत्पादक शेतकरी धास्तावला आहे.या सर्व प्रतिकूल वातावरणामुळे अगोदरच डिंक्या रोग येऊ नये म्हणून उपाययोजना करणाºया शेतकºयांकडे पाणीच नसल्याने मृग बहार हाती लागतो की नाही, हे संकट आहे. राज्यातील इतर फळ पिकांची अवस्था जवळपास अशीच आहे. रोजगार हमी योजना व नंतर राष्टÑीय फलोत्पादन अभियानांतर्गत राज्यात फळबाग लागवड योजना राबविण्यात आल्याने फळ क्षेत्र व उत्पादनात महाराष्टÑ देशात प्रथम क्रमांकावर आहे. म्हणूनच या राज्यात संत्रा १ लाख ५० हजार हेक्टर तसेच इतर फळांचे क्षेत्र आहे; परंतु सतत या ना त्या रोगाचा सामना करणारा संत्रा उत्पादक शेतकºयाला यावर्षी अपुरा पाऊस झाल्याने पुन्हा संकटाचा सामना करावा लागत आहे.

विहिरी, कूपनलिकांची पातळी घसरली!शेतकºयांकडे विहिरी, कूपनलिकांची व्यवस्था आहे. पाऊस नसल्याने या सर्व स्रोतांची पातळी खालावली आहे. विदर्भातील बुलडाणा, अमरावती जिल्ह्यातील स्थिती वाईट आहे.

सध्या मृग बहराचा संत्रा झाडावर आहे; पण पाणीच नसल्याने फळगळती सुरू झाली आहे. पाणी उपलब्ध असल्यास शेतकºयांनी सूक्ष्म सिंचनाचा वापर करू न फळे पिके जगविण्याची गरज आहे.डॉ. शरद निंबाळकर,माजी कुलगुरू ,डॉ. पंदेकृवि, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाVidarbhaविदर्भagricultureशेतीFarmerशेतकरी