शहरं
Join us  
Trending Stories
1
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
2
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
3
मोठी दुर्घटना: पुलावरच दोन बसची समोरासमोर धडक; एका नेपाळी महिलेचा मृत्यू, ३५ हून अधिक प्रवासी जखमी
4
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
5
Asia Cup Rising Stars 2025 : विदर्भकराची मॅच विनिंग फिफ्टी! भारतीय संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
6
डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
7
ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
8
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
9
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
10
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
12
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
13
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
14
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
16
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
17
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
18
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
19
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
20
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील संत्रा फळ पीक धोक्यात; फळ गळती सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 14:03 IST

अकोला : यावर्षी पाऊस कमी झाल्याने विदर्भातील फळ पिकांना झळ पोहोचत असून, मृग बहारातील संत्रा फळ गळती सुरू झाली आहे, तसेच रोगराई वाढत असल्याने यावर्षीही संत्रा उत्पादक शेतकऱ्यांपुढे संकट उभे ठाकले आहे.

अकोला : यावर्षी पाऊस कमी झाल्याने विदर्भातील फळ पिकांना झळ पोहोचत असून, मृग बहारातील संत्रा फळ गळती सुरू झाली आहे, तसेच रोगराई वाढत असल्याने यावर्षीही संत्रा उत्पादक शेतकऱ्यांपुढे संकट उभे ठाकले आहे.राज्यात सर्वाधिक १ लाख ५० हेक्टर संत्रा फळ पिकांचे क्षेत्र विदर्भात आहे; परंतु सतत बदलत असलेल्या हवामानाचा संत्रा फळ पिकांवर परिणाम होत आहे. मागील पंधरा ते सतरा वर्षांपासून विदर्भातील पावसाची अनिश्चितता जाणवत असून, एक, दोन वर्षे सोडले, तर यातील बहुतांश वेळी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. २००४-०५ मध्ये पाऊस खूपच कमी झाला होता. त्याचा परिणाम संत्रा फळे, झाडांवर झाला. शेतकºयांना संत्रा झाडे तोडावी लागली. जवळपास ४० ते ५० हजार हेक्टरवरील संत्र्यांची झाडे शेतकºयांनी तोडली होती. यावर्षी तेच चित्र असून, पाऊस नसल्याने आर्द्रता नाही, जमिनीतील पाण्याची पातळी घसरल्याने आवश्यक ओलावा नसल्याने आतापासूनच संत्र्याच्या आरोग्यावर कायिक परिणाम होत असल्याचे चित्र आहे. काही भागात मृग बहारातील संत्रा फळगळती सुरू झाल्याने संत्रा उत्पादक शेतकरी धास्तावला आहे.या सर्व प्रतिकूल वातावरणामुळे अगोदरच डिंक्या रोग येऊ नये म्हणून उपाययोजना करणाºया शेतकºयांकडे पाणीच नसल्याने मृग बहार हाती लागतो की नाही, हे संकट आहे. राज्यातील इतर फळ पिकांची अवस्था जवळपास अशीच आहे. रोजगार हमी योजना व नंतर राष्टÑीय फलोत्पादन अभियानांतर्गत राज्यात फळबाग लागवड योजना राबविण्यात आल्याने फळ क्षेत्र व उत्पादनात महाराष्टÑ देशात प्रथम क्रमांकावर आहे. म्हणूनच या राज्यात संत्रा १ लाख ५० हजार हेक्टर तसेच इतर फळांचे क्षेत्र आहे; परंतु सतत या ना त्या रोगाचा सामना करणारा संत्रा उत्पादक शेतकºयाला यावर्षी अपुरा पाऊस झाल्याने पुन्हा संकटाचा सामना करावा लागत आहे.

विहिरी, कूपनलिकांची पातळी घसरली!शेतकºयांकडे विहिरी, कूपनलिकांची व्यवस्था आहे. पाऊस नसल्याने या सर्व स्रोतांची पातळी खालावली आहे. विदर्भातील बुलडाणा, अमरावती जिल्ह्यातील स्थिती वाईट आहे.

सध्या मृग बहराचा संत्रा झाडावर आहे; पण पाणीच नसल्याने फळगळती सुरू झाली आहे. पाणी उपलब्ध असल्यास शेतकºयांनी सूक्ष्म सिंचनाचा वापर करू न फळे पिके जगविण्याची गरज आहे.डॉ. शरद निंबाळकर,माजी कुलगुरू ,डॉ. पंदेकृवि, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाVidarbhaविदर्भagricultureशेतीFarmerशेतकरी