शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेत असताना विरोधकांनी तिजो-यांचे सिंचन केले, मुख्यमंत्र्यांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2017 19:42 IST

सिंचनासाठी प्रकल्प प्रस्तावित झाले, याप्रकल्पांचे कामही सुरू झाले परंतू मागील सरकारने या प्रकल्पांना निधी दिला नाही. त्यांनी केवळ त्यांच्या तिजो-यांच्या सिंचन केले असा घणाघाती आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

अकोला -

विदभार्तील शेतकरी आत्महत्यांचे मुळे हे सिंचनाच्या कमतरतेमध्ये आहे. सिंचनासाठी प्रकल्प प्रस्तावित झाले, याप्रकल्पांचे कामही सुरू झाले परंतू मागील सरकारने या प्रकल्पांना निधी दिला नाही. त्यांनी केवळ त्यांच्या तिजो-यांचे सिंचन केले असा घणाघाती आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.प्रकल्पासाठी निधी कमी पडणार नाही -गडकरी

सिंचन प्रकल्पाच्या माध्यमातून हरित क्रांती होईल. शेतकºयाच्या बांधापर्यंत पाणी दिल्या जाईल त्यामुळे हे प्रकल्प वेळत पूर्ण करा, निधी कमी पडणार नाही अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. येणाºया काळात सिचंन प्रकल्पातून कालव्याद्वारे नव्हे तर जलवाहिनी द्वारे पाणी दिले जाईल त्यामुळे पाण्याचा वापर तिपटीने वाढेल असा दावा त्यांनी केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूतल परिवहन तथा जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांचे हस्ते गांधीग्राम येथे आयोजित समारंभात बळीराजा जलसंजीवनी योजनेंतर्गत जिल्ह्यातील ११ सिंचन प्रकल्पांच्या कामांचा प्रारंभ रविवारी झाला त्या वेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले की, विदभार्तील सिंचन प्रकल्पांसाठी तब्बल २० हजार कोटीची गरज होती. या निधीचा प्रस्ताव आम्ही पंतप्रधानांकडे दिल्यावर नितीनजी गडकरी यांनी एका दिवसात त्याचा पाठपुरावा केला म्हणून हा निधी उपलब्ध होऊ शकला. येणाºया कालावधीत या निधीचा पुर्ण विनियोग करून सर्व प्रकल्पांच्या माध्यमातून सिंचनाची व्यवस्था शेतकºयांना दिली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. सिंचन प्रकल्प पुर्ण करण्याची इच्छाशक्ती विरोधकांमध्ये नव्हती त्यांनी केवळ भ्रष्टाचार केला असा आरोप त्यांनी केला. यावेळी मंचावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर, अकोल्याचे पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील, जिल्हापरिषद अध्यक्ष संध्या वाघोडे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार बळीराम सिरस्कार, आ.हरिष पिंपळे, आ. रणधीर सावकर, महापौर विजय अग्रवाल, आदी उपस्थित होते. 

कर्जमाफीमध्ये विदर्भाला ७ हजार ५०० कोटी 

काँग्रेसने सन २००८मध्ये दिलेली कर्जमाफी ही केवळ ६ हजार कोटीची होती व त्यामध्ये विदभार्ला फक्त १५०० कोटी मिळाले मात्र भाजपा सरकारने दिलेल्या कर्जमाफीमध्ये विदभार्तील शेतकºयांना तब्ब ल ७ हजार ५०० कोटी दिले आहेत. शेवटच्या शेतकºयांचे कर्ज माफ होईपर्यंत ही योजना सुरू राहिल असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. सभेपुर्वी शेतकरी जागर मंच, शेतकरी संघटना तसेच शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी स्थानबद्ध करण्यात आले होते. सभा संपल्यावर त्यांना सोडून देण्यात आले.  

शिवसेना कार्यकर्ते उधळनार होते मुख्यमंत्र्यांची सभागांधीग्राम येथे.मुख्यमंत्री फडणवीस व केंद्रीय मंत्री गडकरी  साहेब यांचा कार्यक्रम दरम्यान बोन्ड अळी सोयाबीन ,मुंग, उडीद ,कापूस या पिकाचे नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झालेल्या असताना सरकार उद्घाटन करून फक्त जनतेची दिशाभूल करत आहेत याचा निषेध करण्याकरिता शिवसेनेचा वतीने आजची सभा उधडण्यासाठी आंदोलन करण्यात येत असताना गांधीग्राम येथे शिवसेनेचे कार्यकर्ते मुकेश निचळ, रोषण पर्वतकर, बजरंग गोतमरे, कार्तिक गावंडे ,संतोष जगताप, शंकर यादव नितीन गोलम यांना सभे दरम्यान घोषणा देताना , सोयाबीन फेकताना, बोन्ड अंडी दाखवून निषेध करतांना अटक करण्यात आली

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा