शहरं
Join us  
Trending Stories
1
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
2
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
3
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
4
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
5
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
6
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
7
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
8
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
9
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
10
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
11
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
12
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
13
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
14
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
16
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
17
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
18
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
19
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
20
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप

मंदिरे उघडी करा, अन्यथा एक लाख वारकरी पंढरपुरात ठिय्या देणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 6:58 PM

पंढरपूरमध्ये ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा युवा विश्व वारकरी सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गणेश महाराज शेटे यांनी शनिवारी येथे दिला.

अकोला : कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पृष्ठभूमीवर ‘लॉकडाऊन’मध्ये राज्यातील मंदिरे बंद करण्यात आली आहेत; परंतु आता ‘अनलॉक’मध्ये मंदिरे उघडी करून, मंदिरांमध्ये किमान ५० भाविकांना भजन, कीर्तनाची परवानगी देण्यात यावी, अन्यथा ३१ आॅगस्ट रोजी राज्यातील १ लाख वारकरी श्रीक्षेत्र पंढरपूरमध्ये ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा युवा विश्व वारकरी सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गणेश महाराज शेटे यांनी शनिवारी येथे दिला.शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रामुख्याने वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर उपस्थित होते. कोरोना विषाणू संसर्गाच्या परिस्थितीत ‘लॉकडाऊन’मध्ये राज्यातील मंदिरे बंद करण्यात आली आहेत; परंतु आता ‘अनलॉक’मध्ये सर्व काही सुरू होत असताना, राज्यातील मंदिरे मात्र बंद आहेत. मंदिरे उघडी करून, किमान ५० भाविकांना भजन, कीर्तनाची परवानगी देण्यात यावी, यासाठी वारकऱ्यांनी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन, उपोषणे केली; मात्र सरकारला जाग आली नाही. त्यामुळे सरकारने वारकऱ्यांविषयी झोपेचे सोंग घेतल्याचा आरोप गणेश महाराज शेटे यांनी केला. राज्यातील मंदिरे सुरू करण्याची तारीख निश्चित करून, मंदिरांमध्ये किमान ५० भाविकांना भजन, कीर्तनाची परवानगी देण्यासंदर्भात सरकारने २६ आॅगस्टपर्यंत वारकºयांना लेखी पत्र द्यावे, अन्यथा ३१ आॅगस्ट रोजी राज्यातील १ लाख वारकरी श्रीक्षेत्र पंढरपूरमध्ये ठिय्या आंदोलन करणार असून, या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर सहभागी होतील, असेही गणेश महाराज शेटे यांनी सांगितले. 

टॅग्स :AkolaअकोलाCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर