शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

उघड दार देवा आता...व्यवसाय सुरु; मंदिरे मात्र बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 11:32 IST

Temples are closed : जिल्ह्याचे आराध्यदैवत असलेल्या राजराजेश्वर मंदिराच्या गेटजवळच भाविक नतमस्तक होऊन दर्शन घेत आहेत.

अकोला : कोरोनामुळे दुसऱ्यांदा मंदिरे बंद ठेवण्यात आली आहे. आता निर्बंध शिथिल होत असून, सर्वच व्यवसाय सुरू झाले आहे; मात्र जिल्ह्यातील मंदिरे अद्यापही बंद आहे. त्यामुळे जिल्ह्याचे आराध्यदैवत असलेल्या राजराजेश्वर मंदिराच्या गेटजवळच भाविक नतमस्तक होऊन दर्शन घेत आहेत. राज्यात ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्गाचा वृद्धीदर कमी आहे, अशा जिल्ह्यांत निर्बंध शिथिल करण्यात येत आहे. त्यानुसार संसर्गाचा वृद्धीदर कमी असलेल्या जिल्ह्यात अकोल्याचा समावेश असल्याने जिल्ह्यात ‘अनलॉक’ करण्यात आले आहे. टप्प्याटप्प्याने सर्वच व्यवसायांना मुभा देण्यात आली आहे. वेळेचे बंधनही कमी करण्यात आले आहे. असे असले तरी अद्याप भक्तांचे श्रद्धास्थान असलेली मंदिरे बंद आहेत. मंदिरांमध्येही गर्दी टाळण्यासाठी त्या संदर्भात स्वतंत्र आदेश काढलेले नाहीत. त्यामुळे जिल्ह्याचे आराध्यदैवत असलेल्या राजराजेश्वराचे दर्शन करण्यासाठी भाविक येतात; परंतु मंदिर बंद असल्याने गेटजवळ नतमस्तक होऊन परत जातात. यामुळे मंदिर परिसरात असलेल्या व्यावसायिकांनाही फटका बसत आहे. त्यांचा व्यवसाय ठप्प झाला आहे.

 

किती दिवस कळसाचेच दर्शन?

कोरोनामुळे होणारी गर्दी पाहता सर्व मंदिरे बंद आहे. निर्बंध शिथिल झाल्याने भगवंताच्या दर्शनाची आस लागली आहे. त्यामुळे दर्शनासाठी गेल्यानंतर मंदिराजवळ जाऊनही केवळ कळसाचेच दर्शन करून परतावे लागते.

- मंगेश ताठे, भाविक

 

भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मंदिरांची दरवाजे केव्हा उघडणार अशी आस लागली आहे. कोरोनाची लाट ओसरत असल्याने देवस्थाने उघडण्यात यावी, आणखी किती दिवस दूर दर्शन करावे लागणार आहे.

- अजय राऊत, भाविक

 

आर्थिक गणित कोलमडले !

शहरातील सर्व मंदिर बंद आहे. यासोबत लग्न सोहळे, कार्यक्रमही बंद असल्याने फुलाला मागणी नाही. आता निर्बंध शिथिल झाले आहे. त्यामुळे थोड्या प्रमाणात व्यवसाय होत आहे; परंतु मंदिरे बंद असल्याने सर्व व्यवसाय बुडाला.

- मुकेश विटकर, फूलविक्रेता

मंदिरात भाविक आल्यावर व्यवसायास चालना मिळते. दुकानात सर्व पूजा साहित्य असल्याने मंदिर उघडे राहणे आवश्यक आहे. मंदिर बंद असल्याने व्यवसाय केवळ १५ टक्क्यांवर आला आहे. अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

- मोहन अंबारखाने, पूजा साहित्य विक्रेता

मंदिरात गेल्याने आत्मबळ मिळते !

निर्बंध हटल्यानंतर भाविक मंदिरात दर्शनासाठी जात आहे. मंदिर बंद असल्याने त्यांना दूर दर्शन करून परतावे लागते. भाविकांची श्रद्धा पाहता लवकरात लवकर मंदिर खुलणे गरजेचे आहे. कोरोनाचे नियम पाळून सर्व उघडत असताना मंदिर सुद्धा उघडायला हवी, मनुष्याला मंदिरात गेल्याने आत्मबळ प्राप्त होते.

- पंडित रविकुमार शर्मा, पुजारी

टॅग्स :Rajrajeshwar Templeराजराजेश्र्वर मंदिरAkolaअकोलाCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक