शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
2
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
3
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
4
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
5
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
6
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
7
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
8
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
9
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
10
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
11
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
12
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
13
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
14
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
15
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
16
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
17
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
18
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
19
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
20
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू

पाणीटंचाई निवारणाची केवळ ४७ कामे पूर्ण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 10:31 AM

पावसाळा सुरू झाला असून, उर्वरित ४७९ कामे अद्याप प्रलंबित आहेत.

- संतोष येलकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी कृती आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनांच्या कामांपैकी ५ जूनपर्यंत पाणीटंचाई निवारणाची केवळ ४७ कामे पूर्ण करण्यात आली असून, ६० कामे प्रगतिपथावर आहेत. पावसाळा सुरू झाला असून, उर्वरित ४७९ कामे अद्याप प्रलंबित आहेत.यावर्षीच्या गत उन्हाळ्यात जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी जिल्ह्यातील ४९१ गावांमध्ये विविध ५८६ उपाययोजनांची कामे कृती आराखड्यात प्रस्तावित करण्यात आली होती. त्यापैकी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांनुसार १३६ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी ११० उपाययोजनांच्या कामांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. प्रशासकीय मंजुरी देण्यात आलेल्या कामांपैकी ५ जूनपर्यंत जिल्ह्यातील केवळ ४५ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणाची ४७ कामे पूर्ण करण्यात आली असून, ६० उपाययोजनांची कामे प्रगतिपथावर आहेत. उन्हाळा संपला असून, पावसाळा सुरू झाल्याने, ३० जूनपर्यंतच पाणीटंचाई निवारणाची कामे करता येणार आहेत. त्यामुळे पाणीटंचाई निवारण कृती आराखड्यात प्रस्तावित जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाची उर्वरित प्रलंबित असलेली ४७९ कामे ३० जूनपर्यंत पूर्ण कशी होणार, यासंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पूर्ण केलेल्या कामांचा निधीही प्रलंबित!जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणासाठी ४५ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणाची ४७ कामे पूर्ण करण्यात आली; मात्र पूर्ण करण्यात आलेल्या या कामांचा ६२ लाख १६ हजार रुपयांचा निधीही अद्याप शासनामार्फत जिल्हा परिषदेला प्राप्त होणे प्रलंबित आहे. तसेच जिल्ह्यात सद्यस्थितीत सुरू असलेल्या पाणीटंचाई निवारणाच्या कामांचा निधीदेखील प्रलंबित आहे.

प्रगतिपथावर अशी आहेत कामे!जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणाची ६० कामे प्रगतिपथावर आहेत. त्यामध्ये ७ तात्पुरत्या पूरक नळयोजना, १८ नळयोजनांची विशेष दुरुस्ती, १५ नवीन विंधन विहिरी व २० हातपंपांची दुरुस्ती इत्यादी उपाययोजनांच्या कामांचा समावेश असून, सुरू असलेली ही कामे ३० जूनपर्यंत पूर्ण होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.गतवर्षीच्या पावसाळ्यात जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने उन्हाळ्यात पाणीटंचाईची तीव्रता कमी होती. त्यामुळे जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांची कमीत-कमी कामे करण्यात आली. ‘कोरोना’संकटाच्या पृष्ठभूमीवर पाणीटंचाई निवारणाच्या कामांसाठी निधीदेखिल उपलब्ध नाही.- किशोर ढवळेकार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभाग.

 

टॅग्स :Akolaअकोलाwater scarcityपाणी टंचाई