शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
3
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
4
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
5
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
6
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
7
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
8
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
9
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
10
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
11
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
12
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
13
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
14
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
15
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
16
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
17
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
18
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
19
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
20
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ

राज्यात उद्दिष्टाच्या ३४ टक्केच घरकुलांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 2:43 PM

राज्यातील लाभार्थींना २ लाख ८९ हजार घरकुलांचे उद्दिष्ट असताना आतापर्यंत त्यापैकी केवळ ३४ टक्के घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे.

- सदानंद सिरसाटअकोला : ग्रामीण भागात प्रधानमंत्री आवास योजनेतून २०१९-२० या वर्षात राज्यातील लाभार्थींना २ लाख ८९ हजार घरकुलांचे उद्दिष्ट असताना आतापर्यंत त्यापैकी केवळ ३४ टक्के घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. आधी लोकसभा आणि त्यानंतर राज्याच्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लक्षात घेता घरकुलांच्या मंजुरीपासून हजारो-लाखो लाभार्थी वंचित राहण्याची शक्यता आहे.येत्या २०२२ पर्यंत सर्वांसाठी घरे ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केंद्र शासनाचा आहे; मात्र त्याची अंमलबजावणी करताना कमालीच्या अडचणींचा सामना यंत्रणेसह लाभार्थींना करावा लागत आहे. ग्रामीण भागासाठी २०१६-१७ मध्ये इंदिरा आवास योजनेची पुनर्रचना करून प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये रूपांतरण करण्यात आले. कच्चे घर व बेघर कुटुंबांना मूलभूत सुविधांसह २०२२ पर्यंत घरकुल देण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. गेल्या काही वर्षांत त्यासाठी घरकुल निर्मितीचे उद्दिष्ट देण्यात आले. त्यानंतर आता २०१९-२० मध्येही देण्यात आले. या वर्षात राज्यभरात २ लाख ८९ हजार ७०० घरकुलांचा लाभ द्यावयाचा आहे. आतापर्यंत त्यापैकी केवळ ९७४१६ घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. मंजुरीची ही टक्केवारी केवळ ३४ आहे. उर्वरित ६६ टक्के घरकुलांना विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी मंजुरी मिळणे आवश्यक आहे; मात्र जिल्हा परिषद, पंचायत समित्या, ग्रामपंचायत आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा स्तरावर ही प्रक्रिया मंद गतीने सुरू आहे. त्यामुळे २०२२ पर्यंत सर्वांसाठी घरे, ही संकल्पना प्रत्यक्षात येणे कठीण दिसत आहे.- १२ लाख लाभार्थींची प्रतीक्षा यादीसामाजिक, आर्थिक जात सर्वेक्षण २०११ च्या आधारे राज्यात घरकुलांसाठी १२ लाख ४३ हजार ३०१ कुटुंबांची कायमस्वरूपी प्रतीक्षा यादी आहे. त्यापैकी आतापर्यंत ३ लाख ३९ हजार १३६ घरकुले पूर्ण झाली आहेत. चालू वर्षात देण्यात आलेल्या उद्दिष्टापैकी किती घरकुले पूर्ण होतील, यावर शिल्लक लाभार्थींची संख्या ठरणार आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाgovernment schemeसरकारी योजना