शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

वऱ्हाडातील ४८४ धरणात केवळ १४ टक्के जलसाठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 17:25 IST

अकोला : पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड)) मध्यम व लघु मिळून ४८४ (प्रकल्प)धरण आहेत. मे अखेर या धरणात केवळ १४.९५ टक्के जलसाठा शिल्लक असून, आठ धरणात शून्य तर ११ धरणातील जलसाठा शेवटच्या घटका मोजत आहे.

ठळक मुद्देतीन जिल्ह्यांतील १८ धरणांपैकी एक मोठा व आठ मध्यम धरणातील जिवंत जलसाठा संपला असून, या धरणांची पातळी शून्य टक्के आहे. तर १० मध्यम प्रकल्पात जलसाठा संपण्याच्या मार्गावर आहे. अकोलेकरांची लाइफ लाइन असलेल्या काटेपूर्णा धरणात तर आजचा उपयुक्त जलसाठा १.८० टक्केच आहे.

अकोला : पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड)) मध्यम व लघु मिळून ४८४ (प्रकल्प)धरण आहेत. मे अखेर या धरणात केवळ १४.९५ टक्के जलसाठा शिल्लक असून, आठ धरणात शून्य तर ११ धरणातील जलसाठा शेवटच्या घटका मोजत आहे. यामुळेच शेतकऱ्यांसह सर्वंच पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यातील धरणातील जलसाठ्याची स्थिती वाईट आहे. या तीन जिल्ह्यांतील १८ धरणांपैकी एक मोठा व आठ मध्यम धरणातील जिवंत जलसाठा संपला असून, या धरणांची पातळी शून्य टक्के आहे. तर १० मध्यम प्रकल्पात जलसाठा संपण्याच्या मार्गावर आहे. अकोलेकरांची लाइफ लाइन असलेल्या काटेपूर्णा धरणात तर आजचा उपयुक्त जलसाठा १.८० टक्केच आहे. यात अर्धा गाळ असल्याने अकोलेकरांवरील जलसंकट गडद झाले आहे. याच जिल्ह्यातील मोर्णा धरणात ८.६३ टक्के तर निर्गुणा व उमा धरणात शून्य टक्के जलसाठा आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणातील जलसाठा संपला असून, याच जिल्ह्यातील मस व कोराडी धरणातील जलसाठा शून्य टक्के आहे. आता तोेरणा व उतावळी धरणातील पातळी शून्य टक्क्यावर पोहोचली. वाशिम जिल्ह्यातील सोनल धरणात शून्य टक्के आहे. बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा या मोठ्या धरणात १३.५९ टक्के, पेनटाकळी धरणात ४.२२ टक्के, ज्ञानगंगा मध्यम प्रकल्पात २३.२८ टक्के, पलढगमध्ये ११.७२ टक्के, मन धरणात ७.६६ टक्के जलसाठा शिल्लक आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाणमध्ये १२.१६ टक्के तर एकबूर्जी धरणात ३.५१ टक्के जलसाठा शिल्लक आहे.  आठ धरणात शून्य साठा ;११ धरणतील साठा संपण्याच्या मार्गावरवऱ्हाडतील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्ह्यात ९ मोठे व २४ मध्यम धरण आहेत. अमरावती जिल्ह्यातील उर्ध्व वर्धा ३४.९० टक्के, अकोला जिल्ह्यातील वाण ६२.९७ टक्के मोठ्या धरणातील ही २०. २८ टक्के वारी आहे. २४ मध्यम प्रकल्पातील अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील पाच प्रकल्पात सरासरी २५ ते ३५ टक्के जलसाठा आहे. ४५२ लघु प्रकल्पात ७.०३ टक्के जलसाठा आहे. लघु प्रकल्पाचा जलसाठा पिण्यासाठी वापरला जात नसल्याने हा ७ टक्के जलसाठा १४.९५ टक्क्यातून वजा केल्यास जलसाठ्याचे चित्र भीषण आहे. अकोला, बुलडाणा व वाशिम या जिल्ह्यांची स्थिती मात्र प्रचंड वाईट आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाVidarbhaविदर्भDamधरण