शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

वऱ्हाडातील ४८४ धरणात केवळ १४ टक्के जलसाठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 17:25 IST

अकोला : पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड)) मध्यम व लघु मिळून ४८४ (प्रकल्प)धरण आहेत. मे अखेर या धरणात केवळ १४.९५ टक्के जलसाठा शिल्लक असून, आठ धरणात शून्य तर ११ धरणातील जलसाठा शेवटच्या घटका मोजत आहे.

ठळक मुद्देतीन जिल्ह्यांतील १८ धरणांपैकी एक मोठा व आठ मध्यम धरणातील जिवंत जलसाठा संपला असून, या धरणांची पातळी शून्य टक्के आहे. तर १० मध्यम प्रकल्पात जलसाठा संपण्याच्या मार्गावर आहे. अकोलेकरांची लाइफ लाइन असलेल्या काटेपूर्णा धरणात तर आजचा उपयुक्त जलसाठा १.८० टक्केच आहे.

अकोला : पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड)) मध्यम व लघु मिळून ४८४ (प्रकल्प)धरण आहेत. मे अखेर या धरणात केवळ १४.९५ टक्के जलसाठा शिल्लक असून, आठ धरणात शून्य तर ११ धरणातील जलसाठा शेवटच्या घटका मोजत आहे. यामुळेच शेतकऱ्यांसह सर्वंच पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यातील धरणातील जलसाठ्याची स्थिती वाईट आहे. या तीन जिल्ह्यांतील १८ धरणांपैकी एक मोठा व आठ मध्यम धरणातील जिवंत जलसाठा संपला असून, या धरणांची पातळी शून्य टक्के आहे. तर १० मध्यम प्रकल्पात जलसाठा संपण्याच्या मार्गावर आहे. अकोलेकरांची लाइफ लाइन असलेल्या काटेपूर्णा धरणात तर आजचा उपयुक्त जलसाठा १.८० टक्केच आहे. यात अर्धा गाळ असल्याने अकोलेकरांवरील जलसंकट गडद झाले आहे. याच जिल्ह्यातील मोर्णा धरणात ८.६३ टक्के तर निर्गुणा व उमा धरणात शून्य टक्के जलसाठा आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणातील जलसाठा संपला असून, याच जिल्ह्यातील मस व कोराडी धरणातील जलसाठा शून्य टक्के आहे. आता तोेरणा व उतावळी धरणातील पातळी शून्य टक्क्यावर पोहोचली. वाशिम जिल्ह्यातील सोनल धरणात शून्य टक्के आहे. बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा या मोठ्या धरणात १३.५९ टक्के, पेनटाकळी धरणात ४.२२ टक्के, ज्ञानगंगा मध्यम प्रकल्पात २३.२८ टक्के, पलढगमध्ये ११.७२ टक्के, मन धरणात ७.६६ टक्के जलसाठा शिल्लक आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाणमध्ये १२.१६ टक्के तर एकबूर्जी धरणात ३.५१ टक्के जलसाठा शिल्लक आहे.  आठ धरणात शून्य साठा ;११ धरणतील साठा संपण्याच्या मार्गावरवऱ्हाडतील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्ह्यात ९ मोठे व २४ मध्यम धरण आहेत. अमरावती जिल्ह्यातील उर्ध्व वर्धा ३४.९० टक्के, अकोला जिल्ह्यातील वाण ६२.९७ टक्के मोठ्या धरणातील ही २०. २८ टक्के वारी आहे. २४ मध्यम प्रकल्पातील अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील पाच प्रकल्पात सरासरी २५ ते ३५ टक्के जलसाठा आहे. ४५२ लघु प्रकल्पात ७.०३ टक्के जलसाठा आहे. लघु प्रकल्पाचा जलसाठा पिण्यासाठी वापरला जात नसल्याने हा ७ टक्के जलसाठा १४.९५ टक्क्यातून वजा केल्यास जलसाठ्याचे चित्र भीषण आहे. अकोला, बुलडाणा व वाशिम या जिल्ह्यांची स्थिती मात्र प्रचंड वाईट आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाVidarbhaविदर्भDamधरण