शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

वऱ्हाडातील ४८४ धरणात केवळ १४ टक्के जलसाठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 17:25 IST

अकोला : पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड)) मध्यम व लघु मिळून ४८४ (प्रकल्प)धरण आहेत. मे अखेर या धरणात केवळ १४.९५ टक्के जलसाठा शिल्लक असून, आठ धरणात शून्य तर ११ धरणातील जलसाठा शेवटच्या घटका मोजत आहे.

ठळक मुद्देतीन जिल्ह्यांतील १८ धरणांपैकी एक मोठा व आठ मध्यम धरणातील जिवंत जलसाठा संपला असून, या धरणांची पातळी शून्य टक्के आहे. तर १० मध्यम प्रकल्पात जलसाठा संपण्याच्या मार्गावर आहे. अकोलेकरांची लाइफ लाइन असलेल्या काटेपूर्णा धरणात तर आजचा उपयुक्त जलसाठा १.८० टक्केच आहे.

अकोला : पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड)) मध्यम व लघु मिळून ४८४ (प्रकल्प)धरण आहेत. मे अखेर या धरणात केवळ १४.९५ टक्के जलसाठा शिल्लक असून, आठ धरणात शून्य तर ११ धरणातील जलसाठा शेवटच्या घटका मोजत आहे. यामुळेच शेतकऱ्यांसह सर्वंच पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यातील धरणातील जलसाठ्याची स्थिती वाईट आहे. या तीन जिल्ह्यांतील १८ धरणांपैकी एक मोठा व आठ मध्यम धरणातील जिवंत जलसाठा संपला असून, या धरणांची पातळी शून्य टक्के आहे. तर १० मध्यम प्रकल्पात जलसाठा संपण्याच्या मार्गावर आहे. अकोलेकरांची लाइफ लाइन असलेल्या काटेपूर्णा धरणात तर आजचा उपयुक्त जलसाठा १.८० टक्केच आहे. यात अर्धा गाळ असल्याने अकोलेकरांवरील जलसंकट गडद झाले आहे. याच जिल्ह्यातील मोर्णा धरणात ८.६३ टक्के तर निर्गुणा व उमा धरणात शून्य टक्के जलसाठा आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणातील जलसाठा संपला असून, याच जिल्ह्यातील मस व कोराडी धरणातील जलसाठा शून्य टक्के आहे. आता तोेरणा व उतावळी धरणातील पातळी शून्य टक्क्यावर पोहोचली. वाशिम जिल्ह्यातील सोनल धरणात शून्य टक्के आहे. बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा या मोठ्या धरणात १३.५९ टक्के, पेनटाकळी धरणात ४.२२ टक्के, ज्ञानगंगा मध्यम प्रकल्पात २३.२८ टक्के, पलढगमध्ये ११.७२ टक्के, मन धरणात ७.६६ टक्के जलसाठा शिल्लक आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाणमध्ये १२.१६ टक्के तर एकबूर्जी धरणात ३.५१ टक्के जलसाठा शिल्लक आहे.  आठ धरणात शून्य साठा ;११ धरणतील साठा संपण्याच्या मार्गावरवऱ्हाडतील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्ह्यात ९ मोठे व २४ मध्यम धरण आहेत. अमरावती जिल्ह्यातील उर्ध्व वर्धा ३४.९० टक्के, अकोला जिल्ह्यातील वाण ६२.९७ टक्के मोठ्या धरणातील ही २०. २८ टक्के वारी आहे. २४ मध्यम प्रकल्पातील अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील पाच प्रकल्पात सरासरी २५ ते ३५ टक्के जलसाठा आहे. ४५२ लघु प्रकल्पात ७.०३ टक्के जलसाठा आहे. लघु प्रकल्पाचा जलसाठा पिण्यासाठी वापरला जात नसल्याने हा ७ टक्के जलसाठा १४.९५ टक्क्यातून वजा केल्यास जलसाठ्याचे चित्र भीषण आहे. अकोला, बुलडाणा व वाशिम या जिल्ह्यांची स्थिती मात्र प्रचंड वाईट आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाVidarbhaविदर्भDamधरण