शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

वऱ्हाडातील धरणांमध्ये केवळ १२ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 13:49 IST

अकोला शहराची जीवनरेखा काटेपूर्णा धरणात ११ टक्केच जलसाठा उपलब्ध असल्याने टंचाईचे चित्र आणखी गडद झाले.

ठळक मुद्देवºहाडातील पाच जिल्ह्यांतील धरणांतील जलसाठाही संपण्याच्या मार्गावर आहे.गतवर्षी अल्प पाऊस झाल्याने यातील बहुतांश धरणात अल्प जलसाठा संचयित झाला होता. आजमितीस या सर्व धरणांमध्ये १२.५१ टक्केच साठा आहे.

अकोला : हलक्या अल-निनोच्या प्रभावामुळे यावर्षी पुन्हा आठ ते दहा दिवस पाऊस लांबल्याचे भाकीत डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी हवामानशास्त्र विभागाच्यावतीने वर्तविल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली असताना वºहाडातील पाच जिल्ह्यांतील धरणांतील जलसाठाही संपण्याच्या मार्गावर आहे.आजमितीस या धरणांमध्ये केवळ १२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अकोला शहराची जीवनरेखा काटेपूर्णा धरणात ११ टक्केच जलसाठा उपलब्ध असल्याने टंचाईचे चित्र आणखी गडद झाले.वºहाडातील अकोला, वाशिम, बुलडाणा, अमरावती व यवतमाळ या पाच जिल्ह्यांत ९ मोठे, २४ मध्यम व ४६९ लघू प्रकल्प आहेत. तथापि, गतवर्षी अल्प पाऊस झाल्याने यातील बहुतांश धरणात अल्प जलसाठा संचयित झाला होता. आजमितीस या सर्व धरणांमध्ये १२.५१ टक्केच साठा आहे. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यात तर अपेक्षित पावसाच्या अर्धाही पाऊस झाला नसल्याने या जिल्ह्याची तहान सध्या टँकरवर भागविली जात आहे. बुलडाणा जिल्ह्यातील धरणांची स्थिती बघितल्यास पेनटाकळी व खडकपूर्णा ही मोठी धरण शून्य टक्क्यावर आहेत. नळगंगा मोठ्या धरणात केवळ ७.६३ टक्के जलसाठा शिल्लक आहे. मध्यम धरणातील मस, कोराडी व तोरणा शून्य टक्क्यावर आहे. ज्ञानगंगा धरणात ६.४८ टक्के, पलढग ८.९२ टक्के, मन १३.४७ टक्के, तर उतावळी धरणात १८.९० टक्के साठा आहे. अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा मोठ्या धरणात ११.४ टक्के, वाणमध्ये ३१.५१ तर मध्यम धरणातील निर्गुणा व घुगंशी बॅरेज शून्य टक्क्यावर आहे. उमा धरणात केवळ १.२८ टक्के तर मोर्णा धरणात १०.२३ टक्केच साठा आहे. वाशिम जिल्ह्यातील सोनल शून्य टक्के, अडाण ५.८६ तसेच एकबुर्जी धरणात केवळ ६.७७ टक्के जलसाठा आहे. अमरावती जिल्ह्यातील अपर वर्धा धरणाची पातळी खोल गेली असून, या धरणात केवळ १४.५७ टक्केच साठा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूस धरणात २३.०८,अरुणावतीमध्ये ८.९५ तर बेंबळा या धरणामध्ये १९.३८ टक्केच साठा आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाKatepurna Damकाटेपूर्णा धरणkhadakpurna prakalpa/sant chokhamela damखडकपूर्णा प्रकल्प/ संत चोखामेळा सागरwater scarcityपाणी टंचाई