शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

ऑनलाइन शिक्षणामुळे एकाग्रता भंग;विद्यार्थ्यांच्या डाेक्याचा भुगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 4:44 AM

काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्याच्या उद्देशातून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राज्य शासनाने खासगी शिकवणी वर्ग संचालकांना ऑनलाइन प्रणालीचा पर्याय दिला. ...

काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्याच्या उद्देशातून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राज्य शासनाने खासगी शिकवणी वर्ग संचालकांना ऑनलाइन प्रणालीचा पर्याय दिला. काेराेनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी एप्रिल महिन्यापासून लहान,माेठ्या विद्यार्थ्यांना प्रथमच ऑनलाइन शिक्षणासाठी सामाेरे जावे लागले. यामुळे शिक्षण क्षेत्रात माेठा बदल घडून आला. ऑनलाइनमुळे गुरूजन व विद्यार्थ्यांमधील भावनिक नातेच यामुळे संपुष्टात आल्याचे चित्र आहे. एरव्ही शिकवणी वर्गात पाच ते सहा तास बसून शिक्षकांकडून समस्या साेडवून घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेवर ऑनलाइन प्रणालीमुळे परिणाम झाला आहे. शिकवणीसाठी इयत्ता पहिल्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या हातातही नाइलाजाने अत्याधुनिक माेबाइल देण्याची वेळ पालकांवर ओढावली आहे. चिमुकल्या विद्यार्थ्यांपासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा ‘स्क्रिन टाइम’ वाढल्याने त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या आराेग्यावर हाेत असल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थ्यांमध्ये डाेकेदुखी, डाेळ्यांचे विकार वाढण्यासाेबतच लहान विद्यार्थ्यांमध्ये माेबाइलचे व्यसन जडण्याच्या धास्तीने पालक वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. इयत्ता ९वी,१० वी तसेच १२ वीचे वर्ग सुरु केल्याप्रमाणे इतरही विद्यार्थ्यांचे भविष्य व आराेग्य लक्षात घेता जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी ऑफलाइन पध्दतीने खासगी शिकवणी वर्ग सुरु करण्याची परवानगी द्यावी,अशी आग्रही मागणी अकाेलेकरांनी केली आहे.

लिखाणाचा विसर;‘स्क्रिन शाॅट’चा वापर

ऑफलाइन पध्दतीमध्ये शिकवणी वर्गात विद्यार्थ्यांना वहीत लिखाण करण्याशिवाय गत्यंतर नव्हते. ऑनलाइन प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांनी शाॅर्टकट शाेधला असून वहीत नाेंदी न करता त्याचा ‘स्क्रिन शाॅट’काढण्याचा मार्ग निवडला. यामुळे लिखाणाचा सराव बंद झाल्याने विद्यार्थी परीक्षेत लिखाणाचा कसा सामना करतील,या विवंचनेत पालक सापडले आहेत.

लाेकप्रतिनिधींच्या भूमिकेकडे लक्ष

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्य शासनाने इयत्ती ९ वी, १० वी व १२ वीचे वर्ग सुरु करण्याला परवानगी दिली आहे. साेशल डिस्टन्सिंगचे पालन करून खासगी शिकवणी वर्ग देखील सुरू करता येऊ शकतात. विद्यार्थ्यांचे हित पाहता यासंदर्भात स्थानिक लाेकप्रतिनिधींनी शासनाकडे पाठपुरावा करण्याची गरज आहे.