शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

डाळीनंतर कांद्याने रडवले!

By admin | Published: August 26, 2015 1:45 AM

पालेभाज्यांचे भाव भिडले गगनाला!

अकोला : डाळी, कांदा भडकला असताना, पालेभाज्यांचे भावही गगनाला भिडल्याने सामान्य, गोरगरीब जनता या महागाईत भरडली जात आहे. तूर डाळ बाजारात १२0 रुपये किलोच्यावर पोहोचली असून, कांद्यासह भाज्यांचे किरकोळ भाव १00 रुपये प्रतिकिलोने पार केले आहेत. सलग पाच वर्षांपासून जिल्हय़ात पूरक पाऊस होत नसल्याने भाजीपाल्याच्या उत्पादनात घट होत असल्याने अकोलाच्या भाजीबाजारात पश्‍चिम महाराष्ट्र, नाशिक व इतर जिल्हय़ातील भाजीपाल्याची आवक वाढली आहे. कांदा उत्पादन घटल्याने कांद्याचे भाव सध्या कडाडले असून, सर्व डाळींचे भावही वधारले आहेत आणि भाजीपाल्यांचे दर गगनाला भिडल्याने सामान्यांच्या, गोरगरीब जनतेच्या जेवणात या वस्तू बाद होताना दिसत आहेत. भाजीबाराजारात टोमॅटोचे प्रती दहा किलोचे दर ४00 रुपये आहेत; पण हेच टोमॅटो किरकोळ बाजारात ६0 रुपये प्रतिकिलोच्यावर आहेत. किरकोळ बाजारात फुलगोबी ६0 रुपये प्रतिकिलो, तर भेंडी, बरबटी, मेथीचे दरही ६0 च्यावरच आहेत. मागील दोन महिन्यात संभाराचे भाव २00 रुपये किलोच्यावर गेले होते. ते आता ठोक बाजारात ५0 तर किरकोळ बाजारात ६0 रुपयाच्यावरच दर आहेत. लवंगी मिरचीचे दरही वाढलेले आहेत. इतरही सर्वच भाज्या कडाडल्या आहेत. मध्यम लसणाचे भाव ४८00 रुपये प्रतिक्विंटल पोहोचले आहेत. हे ठोक दर असल्याने किरकोळ बाजारातील दर १00 रुपयांपेक्षा अधिक आहे. धान्य बाजारात आजमितीस तूर डाळीचे घाऊक दर हे दहा ते बारा हजार रु. क्विंटलपर्यंत पोहाचले असून, मूग डाळ ९ ते १0 हजार क्विंटलच्यावर सरकत आहे. उडदाच्या डाळीचे भाव १0 हजारापर्यंत गेले असून, उडीद मोगरने साडेहजार रुपये क्विंटल्यावर पल्ला गाठला आहे. मठ आणि मठ मोगरचे दर ९ हजारापर्यंत पोहाचत आहेत. हरभरा डाळदेखील सहा हजाराच्यावर गेली आहे. सर्व गव्हाचे दर २१00 ते २८00 रुपये प्रतिक्विंटल असून, दादर ज्वारी २८00 रुपये प्रतिक्विंटलच्यावर आहेत. किरकोळ बाजारात दादर ज्वारीचे दर ३५ रुपये किलोच्यावर आहेत. या सर्व डाळी धान्याचे दर हे ठोक असून, किरकोळ बाजारातील दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत.