शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

दहा मिनिटांत केली एक हजार कडूनिंबाची लागवड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 15:54 IST

ग्राम कुंभारी येथील जय बजरंग मंडळाच्यावतीने शनिवारी एक हजार वृक्षांची लागवड केली.

अकोला: राज्य शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवडीचा भाग म्हणून येथून जवळच असलेल्या ग्राम कुंभारी येथील जय बजरंग मंडळाच्यावतीने शनिवारी एक हजार वृक्षांची लागवड केली. जय बजरंग मंडळाच्या शाळा-महाविद्यालयाच्या परिसरात मान्यवरांसह सर्व विद्यार्थ्यांनी एकाच वेळी कडूनिंबाच्या रोपांची लागवड केली. अवघ्या दहा मिनिटांत एक हजार रोपे लावून मंडळाने केलेला संकल्प पूर्णत्वास नेला.जय बजरंग मंडळद्वारा संचालित जय बजरंग माध्यमिक व उच्च माध्यमिक, हनुमंत विद्यालय, श्री गणेश कला महाविद्यालय, जय बजरंग शारीरिक शिक्षण महाविद्यालय कुंभारीच्यावतीने मंडळाचे संस्थापक प्रा. तुकाराम बिडकर यांच्या मार्गदर्शनात मंडळाच्या परिसरात वृक्षारोपण केले. समारंभाचे अध्यक्ष जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, प्रमुख अतिथी अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपशिक्षणाधिकारी दिनेश तरोळे, जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर पांडे, सरपंच संतोष भटकर, जिल्हा शिक्षण समन्वयक प्रकाश अंधारे, भारत कृषी क्रांतीचे संस्थापक ए. एस. नाथन, मुख्याध्यापक संघटनेने प्रांताध्यक्ष प्राचार्य शत्रुघ्न बिडकर, मंडळाचे संचालक, ग्रामपंचायत सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण कार्यक्रम झाला.प्रा. बिडकरांनी आपल्या प्रास्ताविकातून वृक्षाची निगा राखण्याची पूर्ण जबाबदारी स्वीकारली. नाथन व पांडे यांनी विद्यार्थ्यांना वृक्ष संवर्धनाचे महत्त्व विशद केले. आपल्या अध्यक्षीय भाषणातून प्रकाश मुकुंद यांनी विद्यार्थी वृक्ष लागवड व पर्यावरण यांचा सहसंबंध सांगून वृक्ष लागवड हे राष्ट्रीय कार्य आहे. यामध्ये समाजातील प्रत्येक घटकाने सहभागी असावे, सर्व समाज घटकांना या राष्ट्रीय कार्यात सहभागी करून घेण्याची जबाबदारी ही प्रामुख्याने शिक्षक व विद्यार्थ्यांची आहे, असेही त्यांनी आपल्या मार्गदर्शनात नमूद केले.कार्यक्रमाचे संचालन प्रा. श्रीराम पालकर यांनी केले. राजदत्त मानकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता मंडळाचे संचालक मनोहर पांडव, काशीराम आगळे, डॉ. नारायण बिरकड, श्रीकृष्ण बिरकड, प्राचार्य विलास इंगळे, प्राचार्य डॉ. के. व्ही. मेहरे, प्राचार्य डॉ. मधुसुदन मारवाल, मुख्याध्यापक दिनकर धामणकर, जय बजरंग विद्यालय, हनुमंत विद्यालय, श्री गणेश कला महाविद्यालय, बी.पी.एड. कॉलेज येथील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. यावेळी मान्यवरांसह सर्व उपस्थितांनी कडूनिंब रोपांची लागवड शाळा-महाविद्यालयाच्या परिसरात केली. 

 

टॅग्स :AkolaअकोलाSchoolशाळाStudentविद्यार्थी