शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

ऐ मौत तूने मुझे जमींदार कर दिया!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 10:30 IST

डॉ. महेबुब राही यांच्या ‘चाँदणी तखय्युल की’ या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी राहत इंदौरी बार्शीटाकळी येथे आले होते

अकोला : दो गज सहीमगर यह मेरी मिल्कियत तो हैऐ मौत तूनेमुझे जमींदार कर दिया....अशा एकापेक्षा एक सरस शेर असलेल्या अनेक गझल सादर करून मैफिली जिंकणारे जिंदादिली शायर डॉ. राहत इंदौरी यांचा पश्चिम वºहाडातील निवडक शायरांसोबत चांगलाच ऋणानुबंध होता. ४ फेब्रुवारी २०१२ रोजी प्रमिलाताई ओक हॉल येथे सायंकाळी झालेल्या कवी संमेलनात राहत इंदौरी यांनी रंगत आणली होती.अकोल्याच्या बार्शीटाकळी येथील डॉ. मेहबुब राही हे त्यांचे एक स्नेही. डॉ. राही यांनी त्यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा दिला.डॉ. महेबुब राही यांच्या ‘चाँदणी तखय्युल की’ या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी राहत इंदौरी बार्शीटाकळी येथे आले होते. डॉ. राही म्हणाले की, राहत इंदौरी हे भारतातील मोठे शायर. देश-विदेशात त्यांचे कार्यक्रम होतात. त्यामुळे त्यांचे मानधनही जास्तच असे. त्यांना कार्यक्रमाचे आमंत्रण दिले अन् मानधनाचा विषय आल्यावर त्यांनी कुठल्याही रकमेचा आग्रह न धरता केवळ माझ्यावरील प्रेमापोटी ते बार्शीटाकळीत आले.एवढा मोठा शायर; पण त्यांच्या वागण्या-बोलण्यात कुठेही मोठेपणाचा लवलेश नव्हता. शेर सादर करण्याची त्यांची वेगळी शैली हे त्यांचे खास वैशिष्ट्य, शेरची पहिली ओळ ते उंचावर नेत अन् दुसऱ्या ओळीमध्ये वेगळी कलाटणी घेऊन त्यांनी शब्द फेकले की मैफील एका वेगळ्या उंचीवर जात असे. देशातील अनेक प्रश्नांवरही त्यांची भूमिका रोखठोक असे.आजच्या घडीला मुनव्वर राणा अन् राहत इंदौरी या दोन शायरांनी संपूर्ण देशाात कमावलेली लोकप्रियता ही त्यांच्या लेखणीची ताकद आहे. राहत इंदौरी यांनी जातीवादावर प्रहार करणारेही लिखाण केले. त्यांचा एक शेर खूपच प्रसिद्ध आहेहमारा खुन भी सामील हैइसीकी मिट्टी में,किसी के बाप का हिंदोस्ता थोडी है.....अशी प्रखर भूमिका ते घेतमैं जब मर जाऊं तो मेरी अलग पहचान लिख देना,लहू से मेरी पैशानी पे हिन्दुस्तान लिख देना...असे म्हणणारा शायर आपल्या साहित्याने अजरामर राहील, अशा शब्दात डॉ. राही यांनी ‘लोकमत’कडे भावना व्यक्त केल्या.

राहत इंदौरी यांच्या समवेत १९७५ मध्ये मला कविता सादर करण्याचा योग आला अन् त्यानंतर अनेकवेळा कवी संमेलनात सोबतच सहभागी झालो. राहत इंदौरी हे ‘अदब’ आणि ‘तहजीब’चे कवी होते. त्याचा आत्मविश्वास त्यांना एका उच्च स्थानावर घेऊन गेला, त्यांच्या कविता उर्दू-हिंदी गझलच्या जगावर नेहमीच वर्चस्व कायम ठेवतील.-घनश्याम अग्रवाल, ज्येष्ठ कवी

इंदौरी यांना कलाश्रयाच्या मैफलीत ऐकण्याची संधी मिळाली. ती संध्याकाळ अजूनही डोळ्यासमोर तरंगते. त्यांच्या कवितेतुन राजकीय प्रासंगिकता, तसेच त्यांच्या शायरीमध्ये सर्वसामान्यांच्या भावना जुळवून घेण्याची क्षमता आहे, हे त्यांचे वैशिष्ट्य होते.-डॉ. रामप्रकाश वर्मा,साहित्यिक, अकोला

राहत इंदौरी यांची स्टाईल खूप वेगळी होती. कलाश्रय माध्यमातून त्यांना अकोल्यात बोलवण्याची संधी मिळाली. कवि संमेलनाची ती संध्याकाळ अकोल्याच्या साहित्यप्रेमींसाठी अजूनही संस्मरणीय आहे. मंचावर बरेच कवी होते पण राहतजी यांची शायरी सादर करण्याची शैली सर्वांचे मन जिंकणारी ठरली. त्यांच्या जाण्याने हिंदी-उर्दू साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.-डॉ. राजीव बियाणी, ज्येष्ठ पत्रकार

 

टॅग्स :Akolaअकोलाcultureसांस्कृतिक