शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
3
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
4
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
5
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
6
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
7
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
8
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
9
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
10
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
11
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
12
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
13
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
14
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
15
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
16
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
17
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
18
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
19
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
20
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी

ऐ मौत तूने मुझे जमींदार कर दिया!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 10:30 IST

डॉ. महेबुब राही यांच्या ‘चाँदणी तखय्युल की’ या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी राहत इंदौरी बार्शीटाकळी येथे आले होते

अकोला : दो गज सहीमगर यह मेरी मिल्कियत तो हैऐ मौत तूनेमुझे जमींदार कर दिया....अशा एकापेक्षा एक सरस शेर असलेल्या अनेक गझल सादर करून मैफिली जिंकणारे जिंदादिली शायर डॉ. राहत इंदौरी यांचा पश्चिम वºहाडातील निवडक शायरांसोबत चांगलाच ऋणानुबंध होता. ४ फेब्रुवारी २०१२ रोजी प्रमिलाताई ओक हॉल येथे सायंकाळी झालेल्या कवी संमेलनात राहत इंदौरी यांनी रंगत आणली होती.अकोल्याच्या बार्शीटाकळी येथील डॉ. मेहबुब राही हे त्यांचे एक स्नेही. डॉ. राही यांनी त्यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा दिला.डॉ. महेबुब राही यांच्या ‘चाँदणी तखय्युल की’ या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी राहत इंदौरी बार्शीटाकळी येथे आले होते. डॉ. राही म्हणाले की, राहत इंदौरी हे भारतातील मोठे शायर. देश-विदेशात त्यांचे कार्यक्रम होतात. त्यामुळे त्यांचे मानधनही जास्तच असे. त्यांना कार्यक्रमाचे आमंत्रण दिले अन् मानधनाचा विषय आल्यावर त्यांनी कुठल्याही रकमेचा आग्रह न धरता केवळ माझ्यावरील प्रेमापोटी ते बार्शीटाकळीत आले.एवढा मोठा शायर; पण त्यांच्या वागण्या-बोलण्यात कुठेही मोठेपणाचा लवलेश नव्हता. शेर सादर करण्याची त्यांची वेगळी शैली हे त्यांचे खास वैशिष्ट्य, शेरची पहिली ओळ ते उंचावर नेत अन् दुसऱ्या ओळीमध्ये वेगळी कलाटणी घेऊन त्यांनी शब्द फेकले की मैफील एका वेगळ्या उंचीवर जात असे. देशातील अनेक प्रश्नांवरही त्यांची भूमिका रोखठोक असे.आजच्या घडीला मुनव्वर राणा अन् राहत इंदौरी या दोन शायरांनी संपूर्ण देशाात कमावलेली लोकप्रियता ही त्यांच्या लेखणीची ताकद आहे. राहत इंदौरी यांनी जातीवादावर प्रहार करणारेही लिखाण केले. त्यांचा एक शेर खूपच प्रसिद्ध आहेहमारा खुन भी सामील हैइसीकी मिट्टी में,किसी के बाप का हिंदोस्ता थोडी है.....अशी प्रखर भूमिका ते घेतमैं जब मर जाऊं तो मेरी अलग पहचान लिख देना,लहू से मेरी पैशानी पे हिन्दुस्तान लिख देना...असे म्हणणारा शायर आपल्या साहित्याने अजरामर राहील, अशा शब्दात डॉ. राही यांनी ‘लोकमत’कडे भावना व्यक्त केल्या.

राहत इंदौरी यांच्या समवेत १९७५ मध्ये मला कविता सादर करण्याचा योग आला अन् त्यानंतर अनेकवेळा कवी संमेलनात सोबतच सहभागी झालो. राहत इंदौरी हे ‘अदब’ आणि ‘तहजीब’चे कवी होते. त्याचा आत्मविश्वास त्यांना एका उच्च स्थानावर घेऊन गेला, त्यांच्या कविता उर्दू-हिंदी गझलच्या जगावर नेहमीच वर्चस्व कायम ठेवतील.-घनश्याम अग्रवाल, ज्येष्ठ कवी

इंदौरी यांना कलाश्रयाच्या मैफलीत ऐकण्याची संधी मिळाली. ती संध्याकाळ अजूनही डोळ्यासमोर तरंगते. त्यांच्या कवितेतुन राजकीय प्रासंगिकता, तसेच त्यांच्या शायरीमध्ये सर्वसामान्यांच्या भावना जुळवून घेण्याची क्षमता आहे, हे त्यांचे वैशिष्ट्य होते.-डॉ. रामप्रकाश वर्मा,साहित्यिक, अकोला

राहत इंदौरी यांची स्टाईल खूप वेगळी होती. कलाश्रय माध्यमातून त्यांना अकोल्यात बोलवण्याची संधी मिळाली. कवि संमेलनाची ती संध्याकाळ अकोल्याच्या साहित्यप्रेमींसाठी अजूनही संस्मरणीय आहे. मंचावर बरेच कवी होते पण राहतजी यांची शायरी सादर करण्याची शैली सर्वांचे मन जिंकणारी ठरली. त्यांच्या जाण्याने हिंदी-उर्दू साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.-डॉ. राजीव बियाणी, ज्येष्ठ पत्रकार

 

टॅग्स :Akolaअकोलाcultureसांस्कृतिक