जलजन्य आजारांच्या उद्रेकाचे प्रमाण घटले!
By Admin | Updated: June 17, 2015 02:11 IST2015-06-17T02:11:47+5:302015-06-17T02:11:47+5:30
आरोग्यविषयक दक्षता वाढली; साथरोगांमुळे होणा-या मृत्यूचे प्रमाण घटले.

जलजन्य आजारांच्या उद्रेकाचे प्रमाण घटले!
अकोला: पाण्यापासून पसरणार्या रोगांचा उद्रेक होण्याचे प्रमाण राज्यात अध्र्यावर आले आहे. गत तीन वर्षात आरोग्य विभागाने राबविलेल्या उपाययोजनांचे सकारात्मक परिणाम पुढे आले असून, लोकांमध्येही स्वच्छतेबाबतची दक्षता वाढल्याने जलजन्य आजारांपासून होणार्या मृत्यूचे प्रमाण घटत आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत जलजन्य आजारांचा उद्रेक थांबविण्यासाठी अनेक उपाययोजना राबविल्या जात आहेत. यात दूषित पाण्याचे स्रोत शोधणे, पाण्यात ब्लिचिंग पावडरचा वापर वाढविणे, आरोग्यविषयक जनजागृती शेवटच्या घटकापर्यंत करणे आणि उद्रेक झालाच तर पुरेशा प्रमाणात औषधांचा पुरवठा होईल याकडे लक्ष दिले जात आहे. परिणामी तीन वर्षात राज्यात जलजन्य आजारांच्या उद्रेकाचे प्रमाण घटले आहे. गॅस्ट्रो, तीव्र अतिसार, कॉलरा, कावीळ, लेप्टोपायरोसिस यासारख्या आजारांची लागण दूषित पाण्यामुळे होते. राज्यात २0१२ मध्ये वर्षभरात जलजन्य आजारांचा ११६२८ ठिकाणी उद्रेक झाल्याची नोंद आरोग्य विभागाकडे आहे. त्यानंतर २0१३ मध्ये ३७६१ ठिकाणी उद्रेक झाला होता. हे प्रमाण २0१४ मध्ये अध्र्यावर आले आहे. २0१४ मध्ये ११४८ ठिकाणी जलजन्य आजारांचा उद्रेक झाला होता. अतिसाराची लागण होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यापाठोपाठ टायफाईड होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. पावसाळ्य़ात या आजारांची लागण अधिक होत असल्याने यावर्षी आरोग्य विभागातर्फे आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश राज्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना देण्यात आले आहेत.
*दूषित पाण्याच्या स्रोतात अकोला आघाडीवर
राज्यातील दूषित पाण्याचे स्रोत शोधून तेथील पाणी पिण्यासाठी वापरले जाणार नाही, याबाबत काळजी घेतली जात आहे. शिवाय या स्रोतातील पाणी शुद्ध करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहे. ज्या ग्रामपंचायतींकडून दूषित पाण्याच्या स्रोताबाबत काळजी घेतली जात नाही, त्यांना आवश्यक त्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. असे असतानाही दूषित पाण्यासाठी रेड कार्ड मिळालेल्या ग्रामपंचायतींची संख्या अकोल्यात सर्वाधिक आहे. दूषित पाण्याच्या स्रोतांचे प्रमाण अधिक असलेल्या आघाडीच्या पाच जिल्ह्यात अकोल्याचा क्रम पहिला आहे. अकोला जिल्ह्यातील १३.६५ टक्के ग्रामपंचायतींच्या हद्दीत दूषित पाणी आहे. त्यापाठोपाठ ठाणे जिल्ह्यात ८.३७ टक्के, गडचिरोली ५.५७ टक्के गोंदिया ३.७८ आणि उस्मानाबाद जिल्ह्यात ३.३८ टक्के ग्रामपंचायतींच्या हद्दीत दूषित पाण्याचे स्रोत आहेत.