शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

पीक विमा काढणाऱ्यांची संख्या ९८ हजारांनी घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 16:37 IST

गतवर्षी २ लाख ९६ हजार १२५ शेतकऱ्यांनी विविध खरीप पिकांना विमा कवच दिले होते.

लोकमत न्युज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या खरीप हंगामात पीक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या तब्बल ९८ हजारांहून अधिक प्रमाणात घटली आहे. गतवर्षी २ लाख ९६ हजार १२५ शेतकऱ्यांनी विविध खरीप पिकांना विमा कवच दिले होते, तर यंदा केवळ १ लाख ९८ हजार १२२ शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे. विविध तांत्रिक अडचणींमुळे अनेक शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होता आले नाही. जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या अमलबजावणीचे निर्देश २९ जून रोजी शासनाने दिले होते. विलंबाने निर्णय झाल्याने योजना राबविण्याबाबत योग्यरित्या नियोजन करता आले नाही. त्यात पुरेशी प्रचार, प्रसिद्धी होऊ शकली नाही. शिवाय काही बँकांकडून पीक विमा हफ्ता भरून घेण्यास दिलेला नकार, महाभूलेख पोर्टलवर सातबारात तांत्रिक दोष, तसेच नेट कनेक्टिव्हीटचा खोटा आदि कारणांमुळे शेतकऱ्यांना पीक विम्याचे अर्ज भरण्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे शेतकºयांचा पीक विमा योजनेत सहभाग वाढविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्र ारात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मूभाही दिली. तथापि, उपरोक्त अडचणींमुळे जिल्ह्यातील केवळ १ लाख ९८ हजार १२२ शेतकºयांना पीक विमा योजनेत सहभागी होता आले. त्यात कर्जदार शेतकऱ्यांची संख्या १४ हजार ५८९ आहे, तर १ लाख ८३ हजार ५३३ बिगर कर्जदार शेतकरी आहेत. गतवर्षी जिल्ह्यातील २ लाख ९६ हजार १२६ शेतकऱ्यांनी विविध खरीप पिकांना विमा कवच दिले होते. त्यात कर्जदार शेतकऱ्यांची संख्या ८६ हजार ४९८, तर २ लाख ९ हजार ६२७ बिगर कर्जदार शेतकरी होते.   पीक विमा योजनेत कर्जदार शेतकरी संख्येत मोठी घट जिल्ह्यात गतवर्षी ८६ हजार ४९८ कर्जदार शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग घेतला होता, तर यंदा केवळ १४ हजार ५८९ शेतकरी या योजनेत सहभागी होऊ शकले. कर्जदार शेतकऱ्यांचा विमा हफ्ता भरून घेण्यास विविध बँकांनी केलेली टाळाटाळ, हे त्यामागचे मुख्य कारण असल्याचे जिल्ह्यातील स्थितीवरून स्पष्ट होत आहे. 

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमा